शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

ऊस तोडणी कामगारांच्या पदरात १६ टक्केच

By admin | Updated: November 2, 2015 00:35 IST

लवादाची मजुरी वाढ फसवी : कारखान्यांसमोर मजुरांचे संकट; राज्यातील कामगारांचे ११२ कोटी बुडणार

 वीरकुमार पाटील ल्ल कोल्हापूर ऊसतोडणी कामगार संघटनांच्या रेट्यामुळे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाने नेमलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्या लवादाने ऊस तोडणी कामगारांसाठी २० टक्के मजुरीवाढीची घोषणा केली आहे. मात्र, ही वाढ फसवी असून, प्रत्यक्षात १६ टक्केच वाढ पदरात पडणार असल्याने कामगार उसाला सहजासहजी कोयता लावतील, याची खात्री नाही. त्यामुळे आधीच साखरेच्या कमी भावामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखानदारीसमोर दुहेरी संकट उभारले आहे. यंदा दुष्काळाचे संकट आहे. त्यामुळे उसाचे एकरी उत्पादन घटणार आहे. त्यातच साखरेचे दर पडल्याने शासनाच्या नियमानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यायला साखर कारखानदार राजी नाहीत. तसेच ऊस तोडणी कामगारांची मजुरी व कमिशन वाढीची मागणी सरकार पूर्ण करू शकले नाही, असा आक्षेप संघटनांनी घेतला आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्या लवादाने ऊस तोडणी कामगारांसाठी २० टक्के वाढीची केलेली घोषणा फसवी आहे. कारण लवादाने सूचवलेली मजुरीवाढ ही पाच वर्षांसाठी आहे. म्हणजे वर्षाला ४ टक्के वाढ मिळणार आहे. ऊसतोड कामगार कल्याण मंडळ डिसेंबर २०१४ मध्ये स्थापन झाले. त्यामुळे या गळीत हंगामापासून कामगारांना मजुरीवाढ देणे संघटनांच्या मते अपेक्षित होते. मात्र, मागच्या वर्षी अशी कोणतीही वाढ मिळाली नाही. लवादाने सूचवलेली वाढ ही यंदाच्या हंगामापासून मिळणार असली तरी गत हंगामातील चार टक्के वाढ बुडाली आहे. २0१४-२0१५ च्या हंगामात साखर कारखान्यांनी टनाला तोडणी-ओढणी प्रतिटन १९0 रुपये व १८ टक्के कमिशन असे २२५ रुपये दिले आहेत. एक कामगार हंगामात सरासरी १५0 मे. टन ऊस तोडून ३३ हजार ७५0 रुपये मजुरी मिळवतो. या मजुरीवरील चार टक्के वाढ आणि कमिशन असे अंदाजे १४०० रुपये बुडाले आहेत. महाराष्ट्रात स्थानिक व स्थलांतरित असे आठ लाख ऊसतोड कामगार आहेत. या सर्वांचे मिळून सरासरी ११२ कोटी रुपये बुडाले आहेत. जिल्ह्यातील साधारण ३५ हजार कामगारांचे चार कोटी ९0 लाख बुडाले आहेत. अपेक्षित वाढ मिळणार नसल्याने कामगार काम करण्यास नाखूश आहे. त्यामुळे कामगारांना आणणे कारखानदारांसमोर मोठे आव्हान आहे. मुकादम आणि वाहनधारकांनाही याचा फटका बसणार आहे. गत साली ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चांगली मजुरीवाढ देण्याची घोषणा केली होती. ही वाढ गत हंगामापासून देणार, असे अपेक्षित धरून कामगारांनी मुकादमांना अंगावर असलेल्या बाकीतून वाढीची रक्कम वजा करण्याचे सुचविले आहे. वाहनधारकांचीही अशीच अवस्था आहे.