शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

‘आॅनलाईन मार्केटिंग’ फसवणुकीने ग्राहक हवालदिल

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

जनजागृतीचा अभाव : वर्षभरात ग्राहक पंचायतीकडे ५०हून अधिक तक्रारी

प्रवीण देसाई ल्ल कोल्हापूर ‘चमको’ पद्धतीने जाहिराती करून ‘आॅनलाईन मार्केटिंग’द्वारे आपली उत्पादने माथी मारणाऱ्या कंपन्यांच्या डामडौलाला बळी पडणारे ग्राहक फसवणुकीनंतर न्याय मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत. ग्राहक संरक्षण कायद्यात याबाबत तरतूद नसल्याने तसेच प्रशासनाच्या पातळीवर याबाबत जनजागृतीचा अभाव असल्याने हातावर हात धरून बसण्याशिवाय ग्राहकांकडे पर्याय नाही. वर्षभरात या संदर्भात सर्वाधिक म्हणजे ५०हून अधिक तक्रारी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे आल्या आहेत. सध्या धकाधकीचे जग आहे. प्रत्येकाला कामाच्या व्यापामुळे खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही; किंबहुना नेट सर्चिंग अथवा टी.व्ही.वर झळकणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून वस्तूंची खरेदी, विविध अभ्यासक्रमांना प्रवेश, नोकरी, आदींसाठी मोठ्या प्रमाणात ‘आॅनलाईन’चा वापर होत आहे. सद्य:स्थितीत बहुतांश ठिकाणी हे व्यवहार चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे बोलले जात आहे; परंतु काही ठिकाणी खरेदी केल्यावर ग्राहकांची फसवणूक झाल्याचे चित्र समोर आले आहे. याबाबत ‘ग्राहक’ या नात्याने ग्राहक न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे हा पर्याय असला तरी या ठिकाणी अशा तक्रारदारांना जाताच येत नाही. कारण ग्राहक संरक्षण कायद्याच्या कार्यकक्षेत ‘आॅनलाईन मार्केटिंग’ हा विषय अद्याप आलेला नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या ग्राहकांना हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे. आॅनलाईन खरेदीमुळे गॅरंटी-वॉरंटी कार्ड, खरेदीची पावती, आदी मिळत नाही; त्यामुळे ग्राहक न्यायालयात फसवणुकीची दाद मागायची म्हटल्यास त्याच बाबी पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जातात. ग्राहकांच्या फसवणुकीच्या येणाऱ्या एकूण तक्रारींच्या तुलनेत सर्वाधिक प्रमाण हे आॅनलाईन मार्केटिंगच्या फसवणुकीचे आहे. जिल्ह्यात वर्षभरात ५० हून अधिक तक्रारी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्यालयाकडे आल्या आहेत. या कार्यालयाकडून आपल्या पातळीवर प्रयत्न करून शक्य तितक्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु कायद्यात ठोस अशी कोणतीच तरतूद नसल्याने संघटनेलाही मर्यादा येत आहेत. त्या खालेखाल महावितरण, बीएसएनएलसंबंधी तक्रारी आहेत. दिल्ली, मुंबई, नागपूर, पुणे, आदी प्रातिनिधिक नावे आहेत. येथून खरेदी केल्यानंतर फसवणूक झाल्यास दाद मागायची कुठे, असा प्रश्न निर्माण होतो. त्याला दुसरा पर्याय म्हणजे ‘सायबर क्राइम’खाली दाद मागता येऊ शकते; परंतु ही प्रक्रिया इतकी क्लिष्ट आणि त्रासदायक आहे की त्यामुळे ‘भीक नको, कुत्रं आवर’ अशी वेळ ग्राहकांवर येते. कमी खर्चात व सुटसुटीत पद्धतीने ग्राहकांना न्याय देता यावा, यासाठी शासनाने ग्राहक न्यायालये निर्माण केली आहेत; परंतु त्यांत ही तरतूद नसल्याने आॅनलाईन खरेदीत फसवणूक झालेल्या ग्राहकांपुढे यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.