शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
3
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
4
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
5
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
6
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
7
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
8
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
9
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
11
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
12
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
13
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
14
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
15
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
16
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
17
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
18
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
19
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
20
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
Daily Top 2Weekly Top 5

‘ए-वन’ विद्यापीठाच्या पदरी निधींचा दुष्काळ

By admin | Updated: March 10, 2016 01:08 IST

शिवाजी विद्यापीठ : सुवर्णमहोत्सवी निधीतील ४५ पैकी धड तीन कोटीही नाहीत

कोल्हापूर : राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक) ‘ए-वन’ मूल्यांकनाच्या जोरावर गुणवत्तेचा केंद्रबिंदू दक्षिण महाराष्ट्राकडे सरकविणाऱ्या शिवाजी विद्यापीठाला सुवर्णमहोत्सवी निधीतील धड तीन कोटी रुपयेदेखील गेल्या चार वर्षांत मिळालेले नाहीत. जाहीर झालेला निधी देण्याबाबतची तत्कालीन आणि विद्यमान सरकारची भूमिका ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणाऱ्या विद्यापीठाच्या विकासाला मारक ठरत आहे.विद्यापीठाने १८ नोव्हेंबर २०११ रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. या वर्षात काही नवे विभाग सुरू करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने राज्य शासनाला ५० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला. त्यावर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने ४५ कोटी रुपयांचा निधी विद्यापीठाला मंजूर केला. त्यातील ४० कोटी ३३ लाख रुपये विद्याशाखांचे बांधकाम, यंत्रसामग्रीसाठी, तर विविध ११३ पदांसाठी चार कोटी ६७ लाख रुपये होते. त्यांपैकी गेल्या तीन वर्षांत अवघे दोन कोटी ७९ लाख ९९ हजार रुपये विद्यापीठाला मिळाले आहेत. त्यातील सुवर्णमहोत्सवी वर्ष झाल्यानंतर पहिल्या वर्षी दोन कोटी ४० लाख रुपये, दुसऱ्या वर्षी ३९ लाख ९९ हजार रुपये विद्यापीठाला मिळाले. त्यामुळे विद्यापीठाने हाती घेतलेले विभाग, प्रकल्पांची गती मंदावली आहे. हा निधी मिळविण्याबाबत विद्यापीठाने शासन दरबारी आतापर्यंत २५ पत्रे पाठविली आहेत. शिवाय मंत्रालयात विद्यापीठातील अधिकाऱ्यांसमवेत बैठका झाल्या आहेत. राज्यात भाजप-सेना सरकार सत्तेत आल्यानंतरही विद्यापीठाने मागणीनुसार वेळोवेळी निधीबाबतचे प्रस्तावही दिले आहेत. पत्रव्यवहार सुरू असून विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या महिना-दीड महिन्याला मंत्रालयात येरझाऱ्या सुरू आहेत. नियोजनाप्रमाणे संबंधित प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या उद्देशाने उर्वरित निधी विनासायास मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती पूर्णपणे फोल ठरली आहे. (प्रतिनिधी)लोकप्रतिनिधींचा आवाज नाहीकोल्हापूर, सांगली व सातारा असे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. या तिन्ही जिल्ह्यांतून ३० आमदार विधानसभा, विधान परिषदेत प्रतिनिधित्व करतात. ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी देणारे विद्यापीठ हे आपले असून त्याच्या विकासाला सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी विविध कार्यक्रमांत दिली आहे. मात्र, यातील एकाही लोकप्रतिनिधींनी गेल्या चार वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित असलेल्या सुवर्णमहोत्सवी निधी विद्यापीठाला मिळवून देण्याचा मुद्दा मांडला नसून आवाज उठविलेला नाही.सुवर्णमहोत्सवी निधी शासनदरबारी प्रलंबित राहिल्याने प्रस्तावित उपक्रम रखडले आहेत. निधीसाठी विद्यापीठाचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, दरवेळी निधी दिला जाईल, असे उत्तर सरकारकडून मिळत आहे. निधीबाबत सरकार सकारात्मक आहे; पण प्रत्यक्षात निधी लवकर मिळणे हे विविध उपक्रमांच्या पूर्ततेसाठी आवश्यक आहे.- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू