शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

‘ए-वन’ विद्यापीठाच्या पदरी निधींचा दुष्काळ

By admin | Updated: March 10, 2016 01:08 IST

शिवाजी विद्यापीठ : सुवर्णमहोत्सवी निधीतील ४५ पैकी धड तीन कोटीही नाहीत

कोल्हापूर : राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक) ‘ए-वन’ मूल्यांकनाच्या जोरावर गुणवत्तेचा केंद्रबिंदू दक्षिण महाराष्ट्राकडे सरकविणाऱ्या शिवाजी विद्यापीठाला सुवर्णमहोत्सवी निधीतील धड तीन कोटी रुपयेदेखील गेल्या चार वर्षांत मिळालेले नाहीत. जाहीर झालेला निधी देण्याबाबतची तत्कालीन आणि विद्यमान सरकारची भूमिका ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणाऱ्या विद्यापीठाच्या विकासाला मारक ठरत आहे.विद्यापीठाने १८ नोव्हेंबर २०११ रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. या वर्षात काही नवे विभाग सुरू करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने राज्य शासनाला ५० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला. त्यावर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने ४५ कोटी रुपयांचा निधी विद्यापीठाला मंजूर केला. त्यातील ४० कोटी ३३ लाख रुपये विद्याशाखांचे बांधकाम, यंत्रसामग्रीसाठी, तर विविध ११३ पदांसाठी चार कोटी ६७ लाख रुपये होते. त्यांपैकी गेल्या तीन वर्षांत अवघे दोन कोटी ७९ लाख ९९ हजार रुपये विद्यापीठाला मिळाले आहेत. त्यातील सुवर्णमहोत्सवी वर्ष झाल्यानंतर पहिल्या वर्षी दोन कोटी ४० लाख रुपये, दुसऱ्या वर्षी ३९ लाख ९९ हजार रुपये विद्यापीठाला मिळाले. त्यामुळे विद्यापीठाने हाती घेतलेले विभाग, प्रकल्पांची गती मंदावली आहे. हा निधी मिळविण्याबाबत विद्यापीठाने शासन दरबारी आतापर्यंत २५ पत्रे पाठविली आहेत. शिवाय मंत्रालयात विद्यापीठातील अधिकाऱ्यांसमवेत बैठका झाल्या आहेत. राज्यात भाजप-सेना सरकार सत्तेत आल्यानंतरही विद्यापीठाने मागणीनुसार वेळोवेळी निधीबाबतचे प्रस्तावही दिले आहेत. पत्रव्यवहार सुरू असून विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या महिना-दीड महिन्याला मंत्रालयात येरझाऱ्या सुरू आहेत. नियोजनाप्रमाणे संबंधित प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या उद्देशाने उर्वरित निधी विनासायास मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती पूर्णपणे फोल ठरली आहे. (प्रतिनिधी)लोकप्रतिनिधींचा आवाज नाहीकोल्हापूर, सांगली व सातारा असे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. या तिन्ही जिल्ह्यांतून ३० आमदार विधानसभा, विधान परिषदेत प्रतिनिधित्व करतात. ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी देणारे विद्यापीठ हे आपले असून त्याच्या विकासाला सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी विविध कार्यक्रमांत दिली आहे. मात्र, यातील एकाही लोकप्रतिनिधींनी गेल्या चार वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित असलेल्या सुवर्णमहोत्सवी निधी विद्यापीठाला मिळवून देण्याचा मुद्दा मांडला नसून आवाज उठविलेला नाही.सुवर्णमहोत्सवी निधी शासनदरबारी प्रलंबित राहिल्याने प्रस्तावित उपक्रम रखडले आहेत. निधीसाठी विद्यापीठाचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, दरवेळी निधी दिला जाईल, असे उत्तर सरकारकडून मिळत आहे. निधीबाबत सरकार सकारात्मक आहे; पण प्रत्यक्षात निधी लवकर मिळणे हे विविध उपक्रमांच्या पूर्ततेसाठी आवश्यक आहे.- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू