शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

‘वन टू का फोर’चे राजकारण गाडणार!

By admin | Updated: October 9, 2015 01:13 IST

नगरपरिषद पोटनिवडणूक : राजकीय वातावरण तापले; युतीचा संसार मोडला--रणसंग्राम

रत्नागिरी : कोणा एका व्यक्तीच्या पक्षातून जाण्यामुळे शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही. उमेश शेट्येंचा करिश्मा केव्हाच संपला आहे. त्यामुळे ते पालिका पोटनिवडणुकीत कोणताच चमत्कार घडवू शकणार नाहीत. त्यांच्या ‘वन टू का फोर’ व ‘बनेगा तो बादशहा’ हे राजकारण शिवसैनिक गाडून टाकतील व चारही जागांवर सेनाच विजयी होईल, असा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांनी आज (गुरूवारी) पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शिवसेनेतर्फे पोटनिवडणुकीसाठी चार उमेदवारांच्या नावाची घोषणा गुरुवारी करण्यात आली. शिवसेनेला मदत करताना पक्षांतर केलेल्या चार नगरसेवकांना न्यायालयाने अपात्र ठरवले. मात्र, त्यांचा सेनेसाठीचा त्याग शिवसेना विसरणार नाही. त्यामुळेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अपात्र झालेले बाळू साळवी, प्रीती सुर्वे, स्मितल पावसकर व मुनीज जमादार हे चारही नगरसेवक सांगतील त्यांनाच उमेदवारी देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसारच रत्नागिरीतील पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामधील पूर्वा सुर्वे या प्रीती सुर्वे यांच्या स्नुषा आहेत. उमेदवार ऋतुजा देसाई या स्मितल पावसकर यांच्या नातेवाईक आहेत. उमेदवार दिशा साळवी या बाळू तथा दत्तात्रय साळवी यांच्या पत्नी आहेत, तर उमेदवार तन्वीर जमादार हे मुुनीज जमादार यांचे पती आहेत. सेनेसाठी त्याग करणाऱ्यांच्या मागे सेना ठामपणे उभी राहते, असे यावेळी आमदार राजन साळवी, उदय सामंत व जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी सांगितले. आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.(प्रतिनिधी)