शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

एकाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही

By admin | Updated: November 24, 2015 00:22 IST

राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गडहिंग्लज : शिक्षण हक्क कायद्यानुसार २० पटाखालील शाळांसंबंधी चर्चा सुरू असली तरी कोणत्याही परिस्थितीत एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बुडणार नाही, याची दक्षता शासन घेईल, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत शाळा भेटीच्या निमित्ताने ते गडहिंग्लजला आले होते. येथील विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पटसंख्येच्या निकषामुळे संबंधित शाळा बंद झाली तरी नजीकच्या शाळेत आणून त्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाईल, असे स्पष्ट करतानाच अशा शाळांवरील गंडांतराला त्यांनी अप्रत्यक्षरीत्या दुजोराच दिला.सरकारी शाळा टिकविण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या पाल्यांना सरकारी शाळेतच शिकविण्याचा आग्रह लोकप्रतिनिधींकडून धरला जात आहे. त्याबाबत छेडले असता ते म्हणाले, नागरिकांप्रमाणे शासकीय नोकरांनाही स्वातंत्र्य आहे. असा आग्रह केवळ नैतिकदृष्ट्या बरोबर आहे. मात्र, घटनाबाह्य सक्ती त्यांच्यावर करता येणार नाही.गुणवत्तेला केवळ शिक्षकच जबाबदार नाही. ज्या समाजात त्याची जडणघडण झाली, त्या समाजव्यवस्थेचा दोष आणि अपयशही त्यास कारणीभूत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुलांच्या मागणीनुसारच स्वयंमअर्थसहाय्यित शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना ‘चॉईस्’ उपलब्ध झाला आहे. सर्वच शाळांचे अस्तित्व काळाच्या कसोटीवर अवलंबून असले तरी एकही मुल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याकडे शासनाचे कटाक्ष राहील.शाळाबाह्य मुलांच्या संख्येबाबत विचारले असता ते म्हणाले, या मोहिमेत एका बीड जिल्ह्यात ११,००० विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले आहे. ऊसतोडणी, दगडखाण आणि वीटभट्ट्यांवरील कामगारांच्या मुलांबरोबर भटक्या जाती-जमातीच्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असेही नंदकुमार यांनी स्पष्ट केले.यावेळी माध्यमिक शिक्षण संचालक एम. के. जरग, माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, गटशिक्षणाधिकारी गणपतराव कमळकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘दुंडगे’सारखी शाळा पाहिली नाहीप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंतच्या शाळांना भेटी दिल्या. मात्र, गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगेसारखी शाळा अजून पाहिली नव्हती. ही शाळा बघून धक्काच बसला. कन्नड भाषिक गाव असून, येथील पहिलीचा वर्ग खूप छान तयार झाला आहे. असाच प्रत्यय मला हेळेवाडी व नेसरीत आला. ज्ञानरचनावादी वर्गाचे काम गडहिंग्लज तालुक्यात चांगले झाले आहे, अशी प्रतिक्रिया नंदकुमार यांनी व्यक्त केली.