शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

एकतर्फी हद्दवाढ करणार नाही : मुख्यमंत्री

By admin | Updated: February 24, 2016 01:08 IST

जनसुनावणी होणार : पालकमंत्री घेणार लवकरच बैठक; जिल्ह्यातील तीन आमदारांना आश्वासन

कोल्हापूर/शिरोली : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करताना जनसुनावणी घेतली जाणार असून, यासंदर्भात एकतर्फी कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर जिल्ह्यातील आमदारांची बैठक लवकरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोल्हापूर शहराच्या नियोजित हद्दवाढीस १७ गावांतून विरोध होत आहे. त्यासाठी रास्ता रोको, गाव बंद अशी आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार अमल महाडिक, आमदार सुजित मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना हद्दवाढीच्या विरोधात निवेदन दिले. शहराच्या हद्दीत समाविष्ट व्हायला सर्व गावांतील नागरिकांचा तीव्र विरोध असून, त्यासाठी गेल्या चार दिवसांपासून विविध गावांतून आंदोलन सुरू आहे, गावांतील व्यवहार बंद आहेत. रास्ता रोकोसारखी आंदोलने होत आहेत, ही बाब आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. आमदार मिणचेकर म्हणाले, शिरोली आणि नागांव या दोन्ही गावांचा हद्दवाढीच्या प्रस्तावात समावेश केला आहे. गेल्या चार दिवसांपासून शिरोली बेमुदत बंद आहे. कोठ्यांवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शिरोलीकरांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन केले. तर मंगळवारपासून साखळी उपोषण सुरु आहे. शिरोली आणि नागांव ही हातकणंगले तालुक्यातील दोन गावे आहेत. नैसर्गिक दृष्ट्या ही शहरापासून वेगळी आहेत. गेल्या वीस वर्षापासून शिरोलीचा स्वतंत्र नगरपालिकेचा प्रस्ताव मंत्रालयात आहे. शिरोलीला नगरपालिका मंजूर करावी. यावेळी गेल्या चार दिवसांत वर्तमानपत्रात हद्दवाढीविरोधात आलेल्या बातम्यांची फाईलच मुख्यमंत्र्यांना मिणचेकर यांनी दाखविली. आमदार महाडिक म्हणाले, कोल्हापूर शहरात राहणाऱ्या जनतेला महापालिका योग्य सुविधा देऊ शकत नाही. आज ही शहरातील बऱ्याच उपनगरात रस्ते, गटारी, वीज या सुविधा मिळत नाहीत. मग या १७ वाढीव गावांना घेऊन काय साधणार आहे. शहराने अगोदर विकास करावा, मगच शेजारच्या गावांना हद्दवाढीस येण्यास आव्हान करावे. त्यामुळे हद्दवाढीला शिरोली, नागांवसह १७ गावांचा विरोध आहे, तरी जनतेवर हद्दवाढ लादू नये.आम. नरके म्हणाले, हद्दवाढीला ग्रामीण भागातील जनतेचा तीव्र विरोध आहे. हद्दवाढीमुळे ग्रामीण जनता भरडली जाणार. व्यापारांचे मोठे नुकसान होणार आहे. कृती समितीच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभारण्याची शक्यता आहे. त्यामुळे हद्दवाढ रद्द करावी.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हद्दवाढीसंदर्भात जनसुनावणी घेतली जाईल, एकतर्फी निर्णय घेतला जाणार नाही, असे सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे लवकरच आमदार अमल महाडिक, आमदार सुजित मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करतील, त्यातून मार्ग काढतील; परंतु चर्चा, जनसुनावणीशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)