शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

एकतर्फी हद्दवाढ करणार नाही : मुख्यमंत्री

By admin | Updated: February 24, 2016 01:08 IST

जनसुनावणी होणार : पालकमंत्री घेणार लवकरच बैठक; जिल्ह्यातील तीन आमदारांना आश्वासन

कोल्हापूर/शिरोली : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करताना जनसुनावणी घेतली जाणार असून, यासंदर्भात एकतर्फी कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर जिल्ह्यातील आमदारांची बैठक लवकरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोल्हापूर शहराच्या नियोजित हद्दवाढीस १७ गावांतून विरोध होत आहे. त्यासाठी रास्ता रोको, गाव बंद अशी आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार अमल महाडिक, आमदार सुजित मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना हद्दवाढीच्या विरोधात निवेदन दिले. शहराच्या हद्दीत समाविष्ट व्हायला सर्व गावांतील नागरिकांचा तीव्र विरोध असून, त्यासाठी गेल्या चार दिवसांपासून विविध गावांतून आंदोलन सुरू आहे, गावांतील व्यवहार बंद आहेत. रास्ता रोकोसारखी आंदोलने होत आहेत, ही बाब आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. आमदार मिणचेकर म्हणाले, शिरोली आणि नागांव या दोन्ही गावांचा हद्दवाढीच्या प्रस्तावात समावेश केला आहे. गेल्या चार दिवसांपासून शिरोली बेमुदत बंद आहे. कोठ्यांवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शिरोलीकरांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन केले. तर मंगळवारपासून साखळी उपोषण सुरु आहे. शिरोली आणि नागांव ही हातकणंगले तालुक्यातील दोन गावे आहेत. नैसर्गिक दृष्ट्या ही शहरापासून वेगळी आहेत. गेल्या वीस वर्षापासून शिरोलीचा स्वतंत्र नगरपालिकेचा प्रस्ताव मंत्रालयात आहे. शिरोलीला नगरपालिका मंजूर करावी. यावेळी गेल्या चार दिवसांत वर्तमानपत्रात हद्दवाढीविरोधात आलेल्या बातम्यांची फाईलच मुख्यमंत्र्यांना मिणचेकर यांनी दाखविली. आमदार महाडिक म्हणाले, कोल्हापूर शहरात राहणाऱ्या जनतेला महापालिका योग्य सुविधा देऊ शकत नाही. आज ही शहरातील बऱ्याच उपनगरात रस्ते, गटारी, वीज या सुविधा मिळत नाहीत. मग या १७ वाढीव गावांना घेऊन काय साधणार आहे. शहराने अगोदर विकास करावा, मगच शेजारच्या गावांना हद्दवाढीस येण्यास आव्हान करावे. त्यामुळे हद्दवाढीला शिरोली, नागांवसह १७ गावांचा विरोध आहे, तरी जनतेवर हद्दवाढ लादू नये.आम. नरके म्हणाले, हद्दवाढीला ग्रामीण भागातील जनतेचा तीव्र विरोध आहे. हद्दवाढीमुळे ग्रामीण जनता भरडली जाणार. व्यापारांचे मोठे नुकसान होणार आहे. कृती समितीच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभारण्याची शक्यता आहे. त्यामुळे हद्दवाढ रद्द करावी.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हद्दवाढीसंदर्भात जनसुनावणी घेतली जाईल, एकतर्फी निर्णय घेतला जाणार नाही, असे सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे लवकरच आमदार अमल महाडिक, आमदार सुजित मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करतील, त्यातून मार्ग काढतील; परंतु चर्चा, जनसुनावणीशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)