शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

एकतर्फी निर्णय झाल्यास उद्रेक होईल

By admin | Updated: June 18, 2016 00:40 IST

हद्दवाढविरोधी कृती समितीचा इशारा : बस बंद केल्यास पाणीपुरवठा, विमानतळाचा रस्ता बंद करू

कोल्हापूर : ग्रामीण जनतेचा शहराच्या हद्दवाढीला अनेक कारणांनी तीव्र विरोध आहे; म्हणूनच या जनतेच्या भावनेचा विचार न करता शहराच्या हद्दवाढीचा एकतर्फी निर्णय घेतला गेल्यास उद्रेक होईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल, असा गर्भित इशारा शुक्रवारी हद्दवाढविरोधी कृती समितीने शासनाच्या द्विसदस्यीय समितीला दिला. याचवेळी आमच्या गावातील बससेवा बंद केली तर शहराचा पाणीपुरवठा तसेच विमानतळाकडे जाणारा रस्ता बंद केला जाईल, असा इशाराही महानगरपालिकेला देण्यात आला. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय समितीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात हद्दवाढविरोधी कृती समितीचे म्हणणे ऐकून घेतले. कृती समितीच्या तीन आमदारांसह २७ जणांनी सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीत हद्दवाढ का होऊ नये, याची कारणे सांगितली. तसेच सुमारे ४०० पानांचा एक अहवालही सादर केला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत उपस्थित होते.शहरालगतची अठरा गावे आणि दोन औद्योगिक वसाहती यांचा शहराच्या हद्दवाढीत समावेश केला गेला तर ग्रामीण संस्कृती, शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होईल. आमच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. शहरात आल्यामुळे करांचा बोजा पडेल. त्यामुळे आमचे जगणे अडचणीचे होईल, अशी भीती बैठकीत अनेकांनी बोलून दाखविली. तसेच आधी शहरातील नागरिकांना, उपनगरांना चांगल्या सुविधा द्या, मग ग्रामीण भागाच्या विकासाचे बघा, अशी उपहासात्मक टीकाही यावेळी करण्यात आली. महानगरपालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. शहरातील रुग्णालये, शाळा बंद पडत आहेत, आरक्षणे उठविली जात आहेत. अशा परिस्थितीत नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांना विकासाच्या कोणत्या योजना देणार आहात, असा प्रश्नही उपस्थित केला गेला. हद्दवाढ झाल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही, असा बागुलबुवा करून केवळ ग्रामीण भागातील जागांवर महानगरपालिकेचा डोळा आहे; त्या लाटण्यासाठीच हद्दवाढीचा आग्रह धरला जात आहे, असा आरोपही बैठकीत करण्यात आला. आमचं मस्त चाललंयसमितीचे निमंत्रक नाथाजी पवार यांनी बैठकीत हद्दवाढ नको असल्याची कारणे स्पष्ट केली. प्रस्तावित हद्दवाढीच्या गावांतून १८६ कोटींचे कृ षी उत्पन्न मिळते. २२ कोटींचे उत्पन्न हे दुधाच्या व्यवसायातून मिळते. अठरा गावांतील शेतजमिनीतून येणाऱ्या उसाचे बिल १०० कोटींच्या वर आहे. या गावांना केंद्र, राज्य शासन तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ६६ कोटींचा निधी मिळाला आहे. चौदाव्या वित्त आयोगातर्फे आता थेट निधी मिळतो. त्यामुळे आमची गावे विकसित करायला आम्ही सक्षम आहोत. त्यासाठी आम्हाला कोणाच्या वळचणीला जायची गरज नाही. याउलट महानगरपालिकेच्या प्रशासनाने गेल्या ४६ वर्षांत एक रुग्णालय उघडले नाही, एक शाळा सुधारली नाही, भ्रष्टाचार बोकाळला आहे, करांचे ओझे लादले आहे; म्हणूनच आम्हाला शहरात यायचे नाही, असे पवार यांनी सांगितले. मीही उपोषणास बसणार : नरके शहराच्या हद्दवाढीसाठी विधानभवनासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. हद्दवाढ होऊ नये म्हणून मीसुद्धा आमरण उपोषणास बसणार आहे, असा इशारा आमदार नरके यांनी दिला. महानगरपालिकेवर असलेली कर्जे आणि त्यांचे उत्पन्न पाहता हद्दवाढ झाल्यानंतर जनतेला ते सुविधा देऊ शकणार नाहीत. हद्दवाढीमुळे ग्रामीण जनतेचे नुकसान होईल, म्हणूनच आमचा विरोध आहे, असे नरके म्हणाले. ...तर काळम्मावाडी योजना बंद करूजर ग्रामीण जनतेला देण्यात येणाऱ्या सुविधा बंद केल्या तर शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या काळम्मावाडी योजनेचे काम बंद पाडले जाईल, असा इशारा आमदार चंद्रदीप नरके यांनी दिला. ते म्हणाले की, पाणीटंचाईच्या काळात शहराला आम्ही तुळशी, धामणी धरणांतून पाणी दिले आहे हे लक्षात ठेवावे. शिंगणापूर पाणी योजनेला आम्ही जागा दिली आहे. या योजनेतून उपसा बंद केला तर चालेल का? शहरात येण्यास ग्रामीण जनतेचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे आमच्या मानसिकतेचा विचार करावा. जर तो केला नाही तर मोठा उद्रेक होईल. त्याची जबाबदारी शासनावर राहील.