शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

कोल्हापूर : साखरेची शंभर कोटींची उलाढाल मंदावली, माल वाहतूकदारांच्या संपाचा पाचवा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 18:09 IST

गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या माल वाहतूकदारांच्या संपामुळे जिल्ह्यातून देशभरात जाणाऱ्या हजारो टन साखरेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून १०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल मंदावली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून दूध, पेट्रोल, डिझेल, भाजीपाला, धान्य रोखण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

ठळक मुद्देसाखरेची शंभर कोटींची उलाढाल मंदावली, माल वाहतूकदारांच्या संपाचा पाचवा दिवस सिमेंट, कोळसा, पिग आर्यनची आवक बंद

कोल्हापूर : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या माल वाहतूकदारांच्या संपामुळे जिल्ह्यातून देशभरात जाणाऱ्या हजारो टन साखरेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून १०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल मंदावली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून दूध, पेट्रोल, डिझेल, भाजीपाला, धान्य रोखण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.गेले पाच दिवसांपासून सुरू असलेल्या देशव्यापी ‘चक्का जाम’मुळे कोल्हापुरातील बाजारपेठेसह उद्योगधंद्यांवरही काही अंशी परिणाम जाणवू लागला आहे. यात मार्केट यार्डच्या परिसरात येणाऱ्या मालट्रकवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याने येथील आवक-जावक बंद झाली आहे; तर शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित वसाहतीमधील फौंड्री उद्योगावरही याचा परिणाम जाणवू लागला आहे.

यात महत्त्वाचा घटक असलेले पिग आयर्न गोवा, होस्पेट, बेल्लारी, आदी ठिकाणांहून वाहतूकदारांच्या संपामुळे आलेले नाही. उपलब्ध असलेल्या साठा काही ठिकाणी संपत आला आहे; तर कोल्हापुरातील विविध साखर कारखान्यांतून राज्यासह देशात आयात व परदेशांत निर्यात केल्या जाणाऱ्या साखरेची उलाढाल मंदावली आहे.त्यानुसार १०० कोटींहून अधिक उलाढालींवर परिणाम झाला आहे.

विशेष म्हणजे कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद, केरळ, तमिळनाडू, गुजरात, आदी ठिकाणी जाणारी साखर गोदामामध्येच पडून आहे. दिवसाला ४०० ते ४५० ट्रक साखर कोल्हापुरातून बाहेर जाते. ही वाहतूक ठप्प झाली आहे. यासह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानकडे जाणाऱ्या गुळाचीही हीच स्थिती आहे. आंदोलनाचा परिणाम आज, बुधवारपासून जाणवू शकतो, असे मत अनेक व्यापाऱ्यानी व्यक्त केले.जयगड, मंगलोर बंदरांतून कोल्हापुरात येणाऱ्या एक हजार टन दगडी कोळशाची वाहतूक ठप्प झाली आहे. याचाही परिणाम फौंड्री उद्योगावर होत आहे. यासह बंगलोर, दिल्ली, तमिळनाडू, आदी ठिकाणांहून जिल्ह्यात येणारे विविध कंपन्यांच्या सिमेंटची वाहतूकही ठप्प झाली आहे.दरम्यान वाहतूकदारांच्या मागण्या सरकारने मंगळवारपर्यंत मान्य न केल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून दूध, भाजीपाला, पेट्रोल, डिझेल, आदींची वाहतूक रोखली जाईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानी मंगळवारी जिल्हा पोलीसप्रमुखांची भेट घेत महामार्गावर ठिय्या आंदोलनासाठी परवानगी मागितली.

यासह खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणीही केली. यावेळी सुभाष जाधव, भाऊ घोगळे, हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, प्रकाश भोसले, विजय भोसले, विजय पोवार, गोविंद पाटील, शिवाजी चौगुले, सतीश ढणाल, आदी उपस्थित होते.खडीसाखरेचा पुरवठा कमी झाला कोल्हापूर जिल्हा साखर उत्पादनाबरोबरच खांडसरी उद्योगही जगाच्या नकाशावर आहे. या खांडसरीमधून उत्पादित झालेली खडीसाखरही वाहतूकदारांच्या संपामुळे देशातील धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे तुळजापूर, पंढरपूर, शनीशिंगणापूर, नाशिक, तिरूपती, आदी ठिकाणी जाणाऱ्या खडीसाखरेचा पुरवठा कमी झाला आहे. 

जिल्ह्यातील सुरू असलेल्या वाहतूकदारांच्या संपामुळे जनजीवनावर परिणाम लक्षात घेता, मी बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. यात स्वत: मालवाहतूकदारांचा प्रतिनिधी म्हणून तोडगा काढावा, अशी विनंती करणार आहे. या संपाला माझा पाठिंबा आहे.- अमल महाडिक, आमदार

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा साखर उत्पादनात अग्रेसर आहे. त्यामुळे कोल्हापुरातून राज्यासह देशात व परदेशांत साखर पाठविली जाते. त्यामुळे वाहतूकदारांच्या संपामुळे सुमारे शंभर कोटींहून अधिक उलाढाल मंदावली आहे.- अतुल शहा, साखर व्यापारी

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामkolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी