शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

एकेरी उड्डाणपुलाने सांगली फाट्यावर गुंता

By admin | Updated: January 13, 2016 01:11 IST

दिवसभर वाहतुकीची कोंडी : सहा पदरीकरणावेळी मोठा आणि दुहेरी उड्डाणपूल होण्याची गरज--समस्यांचा महामार्ग

सतीश पाटील -- शिरोल सांगली फाटा येथे महामार्ग$ आणि कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात असते; पण येथे एकच दुपदरी उड्डाणपूल असून त्याखाली नेहमीच वाहतुकीचा बोजवारा उडालेला असतो. चौकातील वाहने आणि वडापची वाहने यामुळे हा चौक कायम ठप्प झालेला असतो. कागल-सातारा महामार्गाचे चौपदरीकरताना शिरोली- सांगली फाट्याचे नियोजन काहीसे बिघडले आहे. या मार्गावरील एक महत्त्वाची बाजारपेठेचे आणि रहदारीचे ठिकाण असून येथे कागल -सातारा आणि सांगली- कोल्हापूर राज्य मार्ग एकत्र जुडतात. परिणामी येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा ताण असतो. महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन पेट्रोल पंप, हॉटेल व्यावसाय ,वाळू मार्केट, मार्बल मार्केट, मोठा ट्रान्सपोर्ट व्यवसाय, गावची वर्दळ याने हा परिसर गजबजलेला असतो. महामार्गावरील एक बाजूची वाहतूक ही उड्डाणपुलावरून तर दुसऱ्याबाजूची वाहतूक खालून होते अशी विचित्र स्थिती या चौकात आहे.चौपदरीकरणाचे काम करत असताना या ठिकाणाच्या रहदारी बाबतचा फारसा विचार झालेला दिसत नाही. नागांव फाटा ते सांगली फाट्यापर्यंत उड्डाणपूल होते, पण ते रद्द का केले हेच आज पर्यंत न उलगडलेले कोडे आहे. घाईगडबडीने एकेरी उड्डाणपूल केले, पण सध्या कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने वाहने जातात, याच मार्गावरून कोल्हापूरहून सांगलीला ही वाहने याच उड्डाणपूलाखालून पास होतात, तर सांगलीहून पुण्याकडे जाण्यासाठी धोकादायक उड्डाणपूल पास करावे लागते. अशा या तांगड्यामुळे पुलाखाली अपघात घडले आहेत. अतिशय चुकीच्या पद्धतीचा सांगली फाटा येथील उड्डाणपूल झाला असून दिवसभर वाहतूकीची कोंडी असते. तसेच रात्री चौकात अंधाराचे साम्राज्य पसरते आणि चालकांना अंदाजावर वाहन चालवावे लागते. सेवा रस्त्यांची दुरवस्थागोकुळ शिरगाव ते टोप संभापूरपर्यंत सेवा रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या पट्यात सलग सेवा रस्ते नाही. अनेक ठिकाणी सेवा रस्ते कट झालेले आहेत. त्यामुळे सेवा रस्ते तुकड्या तुकड्यात आहेत. त्यांचा दर्जा देखील अत्यंत सुमार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मुख्य महामार्गावरूनच येजा करावी लागते. टोप ते शिये फाटा येथे सेवा रस्ता नसल्याने मुख्य मार्गावरच वाहतुकीचा ताण असतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. सेवा रस्त्यांची डागडुजी देखील वरचेवर केली जात नाही.शिरोली सांगली फाटा येथील सध्याचे दुपदरी उड्डाणपूल अतिशय चुकीच्या पद्धतीने झाला आहे. कोल्हापूरकडून येणाऱ्या वाहनांना पुण्याकडे जाताना देखील खालील मार्गाचा वापर करावा लागतो. यामुळे चौकात वाहतुकीचा बोजवारा उडालेला असतो. याठिकाणी सतत वाहतूक विस्कळीत असते. तसेच वरचेवर अपघात घडतात त्यामुळे सहापदरीच्या वेळी याठिकाणी उड्डाण पूल झालेच पाहिजे अन्यथा रस्ताच करून देणार नाही. - शशिकांत खवरे, माजी पंचायत समिती सदस्यधोकादायक नागाव फाटा चौकसांगली फाट्यावरील उड्डाणपुल जेथे संपतो तेथून काही मीटरवर नागाव फाटा आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा असलेला हा फाटा असुरक्षित असा आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ आणि अत्यावश्यक सुविधांचा अभाव यामुळे हा चौक जीवघेणा ठरत आहे. येथे अपघातांचे प्रमाण देखील जास्त आहे. सांगली फाट्यावरील उड्डाण पूल हा आणखी पुढे पर्यंत होणे गरजेचे होते.