शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

राजघराणे महिन्यातील एक दिवस जनतेला देणार

By admin | Updated: August 5, 2014 23:42 IST

राजेसाहेब खेमसावंत : लोकाग्रहास्तव निर्णय

सावंतवाडी : श्रीमंत पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज तसेच शिवरामराजे भोसले हे जसे जनतेला भेटून त्यांच्या सुखदु:खात सहभागी होत होते तसे आता राजेसाहेब खेमसावंत भोसले करणार आहेत. लवकरच ते महिन्यातील एक दिवस जनतेसाठी उपलब्ध करून देणार आहेत, अशी घोषणा त्यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार शिवराम दळवी उपस्थित होते.श्रीमंत पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व श्रीमंत शिवरामराजे भोसले हे प्रजेमध्ये जात. त्यांची सुख दु:खे जाणून घेत असत. राजे येणार म्हटल्यावर लोकांमध्ये प्रचंड उत्साह असे. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात राजे गेले की, त्यांची मोठी उठबस होत असे. प्रत्येकजण आपला राजा आला, असे म्हणत त्यांच्या प्रत्येक कामात हातभार लावत असे. मात्र, गेली कित्येक वर्षे जनता व राजघराणे यांच्यातील संपर्क थोडासा कमी झाला आहे.आजही अनेक भाविक पाटेकर देवस्थानात येत असतात. त्यावेळी ते पाटेकर मंदिरात जाऊन आल्यावर राणीसाहेब सत्वशीलादेवी भोसले यांच्याकडे नतमस्तक होतात. हजारो ग्रामस्थ राजवाड्यात येतात. त्याशिवाय बाहेरील पर्यटक राजवाड्यातील गंजिफासारखी कला पाहण्यास आले की, राजघराण्यापुढे आवर्जून नतस्मतक होतात. पण आता माजी आमदार शिवराम दळवी तसेच अनेक नागरिकांच्या आग्रहास्तव राजे खेमसावंत भोसले हे लोकांना भेटणार आहेत. याबाबतचा दिवस ते लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राजे खेमसावंत हे पुन्हा एकदा आपल्या प्रजेत जाणार असल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत राजेसाहेब खेमसावंत भोसले यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, लोकांमध्ये जायला आवडेल. आम्ही लोकांसाठी असल्यामुळे लोकांच्या समस्या जाणून घेऊ. २५ आॅगस्टच्या पाटेकर मंदिरातील कार्यक्रमाला स्वत: उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात अनेकजण भेटतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.सावंतवाडी संस्थानाने विशेषत: बापूसाहेब महाराजांनी १२ बलुतेदारांना संस्थानमध्ये मानाचे स्थान देऊन उभ्या महाराष्ट्रात नवा इतिहास घडवला आहे. त्यांचे कार्य श्रीमंत शिवरामराजे यांनीही सुरू ठेऊन इतिहास घडवून आणला. त्यांचे हे कार्य खेमसावंत भोसले सुरू ठेवणार आहेत. संस्थानच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाज घटकांना शासनाने दिलेल्या आरक्षणाचा लाभ होण्यासाठी आरक्षण जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे, असे शिवराम दळवी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)