शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राजघराणे महिन्यातील एक दिवस जनतेला देणार

By admin | Updated: August 5, 2014 23:42 IST

राजेसाहेब खेमसावंत : लोकाग्रहास्तव निर्णय

सावंतवाडी : श्रीमंत पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज तसेच शिवरामराजे भोसले हे जसे जनतेला भेटून त्यांच्या सुखदु:खात सहभागी होत होते तसे आता राजेसाहेब खेमसावंत भोसले करणार आहेत. लवकरच ते महिन्यातील एक दिवस जनतेसाठी उपलब्ध करून देणार आहेत, अशी घोषणा त्यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार शिवराम दळवी उपस्थित होते.श्रीमंत पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व श्रीमंत शिवरामराजे भोसले हे प्रजेमध्ये जात. त्यांची सुख दु:खे जाणून घेत असत. राजे येणार म्हटल्यावर लोकांमध्ये प्रचंड उत्साह असे. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात राजे गेले की, त्यांची मोठी उठबस होत असे. प्रत्येकजण आपला राजा आला, असे म्हणत त्यांच्या प्रत्येक कामात हातभार लावत असे. मात्र, गेली कित्येक वर्षे जनता व राजघराणे यांच्यातील संपर्क थोडासा कमी झाला आहे.आजही अनेक भाविक पाटेकर देवस्थानात येत असतात. त्यावेळी ते पाटेकर मंदिरात जाऊन आल्यावर राणीसाहेब सत्वशीलादेवी भोसले यांच्याकडे नतमस्तक होतात. हजारो ग्रामस्थ राजवाड्यात येतात. त्याशिवाय बाहेरील पर्यटक राजवाड्यातील गंजिफासारखी कला पाहण्यास आले की, राजघराण्यापुढे आवर्जून नतस्मतक होतात. पण आता माजी आमदार शिवराम दळवी तसेच अनेक नागरिकांच्या आग्रहास्तव राजे खेमसावंत भोसले हे लोकांना भेटणार आहेत. याबाबतचा दिवस ते लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राजे खेमसावंत हे पुन्हा एकदा आपल्या प्रजेत जाणार असल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत राजेसाहेब खेमसावंत भोसले यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, लोकांमध्ये जायला आवडेल. आम्ही लोकांसाठी असल्यामुळे लोकांच्या समस्या जाणून घेऊ. २५ आॅगस्टच्या पाटेकर मंदिरातील कार्यक्रमाला स्वत: उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात अनेकजण भेटतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.सावंतवाडी संस्थानाने विशेषत: बापूसाहेब महाराजांनी १२ बलुतेदारांना संस्थानमध्ये मानाचे स्थान देऊन उभ्या महाराष्ट्रात नवा इतिहास घडवला आहे. त्यांचे कार्य श्रीमंत शिवरामराजे यांनीही सुरू ठेऊन इतिहास घडवून आणला. त्यांचे हे कार्य खेमसावंत भोसले सुरू ठेवणार आहेत. संस्थानच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाज घटकांना शासनाने दिलेल्या आरक्षणाचा लाभ होण्यासाठी आरक्षण जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे, असे शिवराम दळवी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)