शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

झाली एकदाची ‘एमपीएससी’ची पूर्वपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोरोना, एसईबीसी आरक्षण या कारणांमुळे चार वेळा पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) विविध पदांसाठीची संयुक्त ...

कोल्हापूर : कोरोना, एसईबीसी आरक्षण या कारणांमुळे चार वेळा पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) विविध पदांसाठीची संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी कोल्हापुरातील ४१ उपकेंद्रांवर पार पडली. या केंद्रांवरून कोरोनाबाबतची आवश्यक ती दक्षता घेऊन एकूण ९,७८६ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. ३,६९६ जणांनी परीक्षेला दांडी मारली. झाली एकदाची परीक्षा, अशी प्रतिक्रिया बहुतांश परीक्षार्थींनी व्यक्त केली.

तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आरटीओ आदी वर्ग एक आणि दोनच्या पदांसाठी ‘एमपीएससी’च्या वतीने परीक्षा घेण्यात आली. कोल्हापुरातील केआयटी कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, आदी ४१ केंद्रांवरील ५६३ वर्ग खोल्यांमध्ये रविवारी सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५, अशा दोन सत्रांत परीक्षा झाली. पहिल्या सत्रात १०० प्रश्नांचा दोनशे गुणांचा सामान्य ज्ञान विषयाचा, तर दुसऱ्या सत्रात ८० प्रश्न आणि दोनशे गुणांचा सी-सॅट विषयाचा पेपर झाला. त्यासाठी सकाळी ७.३० वाजेपासून केंद्रांवर परीक्षार्थी येऊ लागले. काही जण पालकांसमवेत आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल गनने परीक्षार्थींचे तापमान तपासून, मास्क असल्याची खात्री करून, प्रवेशपत्र पाहून, त्यावरील क्यूआर कोड मोबाइलद्वारे स्कॅन करून विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला. ज्या परीक्षार्थींजवळ मास्क, सॅनिटायझर नव्हते, त्यांना ते प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. दोन्ही पेपर होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. परीक्षा केंद्रांमध्ये पोलीस बंदोबस्त होता. गेल्या अकरा महिन्यांत चार वेळा लांबणीवर पडलेली परीक्षा अखेर झाल्याने त्याबाबतचा आनंद परीक्षार्थींच्या चेहऱ्यावर दुसरा पेपर सुटल्यानंतर दिसून आला.

चौकट

परीक्षार्थी ताटकळत

शहरातील गर्ल्स हायस्कूल या केंद्रावर सकाळी ८.३० वाजेपासूनच परीक्षार्थी रांगेत उभे होते. त्यांची रिपोर्टिंगची वेळ ८.३० ते ९.३० होती. मात्र, प्रवेशपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन करण्यात तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे वेळेत येऊनही अर्ध्या तासाहून अधिक वेळ परीक्षार्थींना रांगेत ताटकळत उभे राहावे लागल्याचे सांगत काही पालकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली.