शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

एकदा फसलाय, पुन्हा फसू नका : राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:49 IST

भारत चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : देश एकदा फसलाय. २०१४ साली दाखविलेलं स्वप्न वाईट होतं ते आता ...

भारत चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : देश एकदा फसलाय. २०१४ साली दाखविलेलं स्वप्न वाईट होतं ते आता सोडून देऊ, पण दुसऱ्यांदा फसणार नाही याची खबरदारी घ्या. देशाच्या राजकीय क्षितिजावरून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हाकलून लावा, असे कळकळीचे आवाहन करतानाच, जर ही मंडळी परत सत्तेवर आली तर देशातील लोकशाहीचा ढाचा नष्ट होईल आणि दहा-पंधरा लोकांच्या हाती देशाची सत्ता एकवटेल, अशी भीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी रात्री येथील विराट जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली.काळा पैसा बाहेर काढणार म्हणून नोटाबंदी करणाºया भाजपकडे लोकसभा निवडणुकीत ओतण्यासाठी करोडो रुपये आले कोठून? काळ्या पैशांवर तुम्ही कोणत्या तोंडाने बोलताय,. अशी जळजळीत विचारणाही त्यांनी या सभेत केली.महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचा उमेदवार नसतानाही राज ठाकरे यांनी येथे सभा घेऊन इचलकरंजी आणि आसपासच्या परिसरातून आलेल्या जनसमुदायास नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीने देशातील तमाम जनतेला फसवण्याचे काम कसे केले हे आपल्या भाषणातून तसेच व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून सांगितले. मोदी आणि शहा यांना आपल्या ठाकरी भाषेत खोटारडे, थापाडे, लबाड अशी विशेषणे लावून ठाकरे यांनी त्यांची अवहेलना केली. या मंडळींनी गेल्या पाच वर्षात केवळ थापा मारण्याचे , जनतेला फसविण्याचे काम केले. आपल्या कुटील कारभारातून देशातील लोकशाही संपविण्याचे तसेच अर्थकारण बिघडवण्याचे काम केले. उद्या हीच मंडळी परत सत्तेत आली तर लोकशाहीचा ढाचा संपुष्टात येईल. उद्या त्यांच्या विरोधात आंदोलन करायला लागलात तर तुम्हाला मारुन टाकतील. अ‍ॅडॉल्फ हिटलर ज्या मार्गाने गेला त्याच मार्गाने मोदी यांची वाटचाल सुरु आहे, असे ठाकरे म्हणाले.ठाकरे यांनी आपल्या चाळीस मिनिटांच्या भाषणात मोदी व शहा यांच्या एकूण पाच व्हिडीओ क्लिप दाखविल्या. प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये देतो असे मोदींनी सांगितले तर शहा यांनी तो जुमला होता असे सांगून देशाच्या थोबाडीत मारले. ही माणसं तुम्हाला मुर्ख बनवून गेली. इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी कधीही पाहिला नाही, असे सांगून ठाकरे पुढे म्हणाले की, स्वच्छ भारत योजनेसाठी कर गोळा केला जातो. पण भारत काही स्वच्छ झाला नाही. गंगा साफ करणार होते ती केली नाही, मग २० हजार कोटी रुपये गेले कोठे? परदेशातील काळा पैसा आणतो म्हणून सांगितले तो आणला नाही. किती वेड बनवायचं या माणसांनं? केसाने गळा कापला आहे. ज्या सैनिकांच्या नावाने आता ही मंडळी मते मागत आहेत, त्याच सैनिकांचा मोदींनी कसा अवमान केला हे एका व्हिडीओ क्लिपद्वारे ठाकरे यांनी दाखविले. सैनिकांपेक्षा जर व्यापारी धाडशी असेल तर मग जा ना तिकडे सिमेवर अंबानी आणि अदानीला घेऊन. द्या त्यांच्या हातात बंदुका आणि लढा म्हणाव त्यांना. एकीकडे जवानांचा असा अवमान करायचा आणि आता निर्लज्ज पणाने त्यांच्या नावाने मत मागतायत. मोदी व शहा हे देशाला लागलेला कलंक आहे, असे ठाकरे म्हणाले.प्रारंभी युवराज यडुरे, गजानन जाधव, तानाजी सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, संदीप देशपांडे यांची भाषणे झाली. मोहन मालवणकर यांनी सूत्रसंचालन केले. राज ठाकरे यांचा चांदीची गदा देवून आणि पुष्पहार घालून स्वागत केले. राष्ट्रगीताने सांगता झाली. यावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, राजू पाटील, अभिजीत पानसे, यशवंत किल्लेदार, राजू दिंडोर्ले, आदी नेते उपस्थित होते.आसूड ठरले लक्षवेधीराज ठाकरे यांच्या सभेला सुरूवात होण्यापूर्वी सभेच्या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आसूड आणले होते. मैदानातच कार्यकर्ते हे आसूड ओढून घेत असताना क्षणभर व्यासपीठातील मंडळीही कुतुहलाने पाहत राहिले. हे आसूड लक्षवेधी ठरले.-------------इचलकरंजीचा वस्त्रोद्योगमहात्मा गांधी यांनी चरख्यावर सूत काढायला सुरू केले. त्याआधीच सन १९०४ साली इचलकरंजीकर सूत विणत होते, असा उल्लेख भाषणाच्या सुरूवातीला करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच नॅनोच्या आधी सन १९७० साली इचलकरंजीच्या एका उद्योजकाने ‘मीरा’ ही छोटी कार निर्माण केली होती, त्याचाही उल्लेख केला.पाच सेकंदाला सात शौचालये?मोदींनी बिहार राज्यातील एका भाषणात सांगितले, आम्ही एका आठवड्यात ८ लाख ५० हजार शौचालय बांधले. याचा व्हिडीओ दाखविला. त्याचा हिशेब आम्ही पाहिला असता एका मिनिटात ८४ म्हणजेच ५ सेकंदाला सात शौचालये बांधले गेले, असा निघतो. एवढ्या वेळात माणसाचे होत नाही, तर शौचालय कसे बांधून होईल, असा सवालही त्यांनी केला.