शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा लिसनर्स क्लबचा ‘स्मृतिगंध’ दरवळणार

By admin | Updated: January 22, 2017 00:50 IST

संगीताच्या अनवट सुरांचे रसग्रहण : जुन्या हिंदी-मराठी गीतांची रसिकांना मिळणार मेजवानी

समीर देशपांडे -- कोल्हापूरबारा वर्षे कोल्हापुरातील संगीत रसिकांना जुन्या हिंदी-मराठी गीतांची रसग्रहणासह मेजवानी देणाऱ्या लिसनर्स क्लबचा ‘स्मृतिगंध’ पुन्हा एकदा दरवळणार आहे. चार वर्षे हा कार्यक्रम स्थगित केला होता. पुन्हा एकदा आज, रविवारपासून हा कार्यक्रम सुरू होत आहे. निवृत्त प्राध्यापक श्रीकृष्ण कालगावकर हे संगीत समीक्षक. त्यांच्याकडे जुन्या ध्वनिमुद्रिकांचा मोठा संग्रह. २००० मध्ये संगीतकार नौशाद यांनी त्यांच्या येथील घरी हा संग्रह पाहण्यासाठी भेट दिली होती तेव्हा त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून प्रेरणा घेऊन लिसनर्स क्लबची स्थापना केली. एलआयसीमधील अधिकारी धनंजय कुरणे यांच्याकडेही गाण्यांच्या चार हजार जुन्या रेकार्डस् आहेत. त्यांना लेखक प्रभाकर तांबट यांची साथ मिळाली आणि स्मृतिगंध कार्यक्रमाची सुरुवात झाली. संगीताच्या रसग्रहणावर आधारित असा हा कार्यक्रम आहे. गाण्यातील सौंदर्यस्थळे समजावून घेऊन नंतर ते गाणे ऐकले तर त्याचा आस्वाद अधिक चांगल्या पद्धतीने घेता येतो. या कार्यक्रमात कोणी गाणे म्हणत नाही किंवा कोणी कुठलेही वाद्य वाजवत नाही. सुरुवातीला एखादे गाणे घेऊन त्याचे गीतकार कोण आहेत, कशा परिस्थितीत त्यांनी गीतलेखन केले, संगीतकार कोण, संगीत देताना घडलेल्या काही घटना, कोणत्या रागातील ते गाणे आहे अशा सर्व बाजूंनी रसिकांना माहिती दिली जाते. त्यानंतर मग ती ती गाणी ऐकवली जातात. त्यामुळे रसिकांना वेगळाच आनंद मिळतो. स्मृतिगंधने आतापर्यंत विविध विषय घेऊन ७१ कार्यक्रम सादर केले आहेत. प्रसिद्ध गायक, संगीतकार यांच्या कार्यक्रमांशिवाय हुस्नलाल-भगतराम, श्यामसुंदर, खेमचंद प्रकाश अशा अनवट विषयांवरही कार्यक्रम सादर केले आहेत. शिवाजी विद्यापीठ रोडवरील खरे मंगल कार्यालयामध्ये हे कार्यक्रम होत असत. चार वर्षांपूर्वी काही कारणांमुळे हा कार्यक्रम थांबविला. मात्र, आग्रहामुळे हा कार्यक्रम पुन्हा रूजू होत आहे. ‘भारत बंद’वेळीही झाली होती मोठी गर्दीसंगीतकार नौशाद यांच्या गीतांवरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि अचानक काही तरी दुर्दैवी घटना घडल्याने ‘भारत बंद’ची हाक दिली गेली. सर्व व्यवहार बंद झाल्याने रसिक श्रोते येणार नाहीत अशी अटकळ होती; परंतु ‘भारत बंद’ असतानाही तीनशेपेक्षा अधिक रसिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली....अन् जागा अपुरी पडलीसंगीतकार शंकर जय-किशन यांच्यावरील खास कार्यक्रमांचे आयोजन स्मृतिगंधने केले होते. राजकपूर यांच्या बहुतांशी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलेले. त्यामुळे अनेक लोकप्रिय गीते त्यांच्या नावावर. परिणामी रसिकांची मोठी गर्दी या कार्यक्रमासाठी झाली. जागा अपुरी पडल्याने अखेर रस्त्यावर लोकांनी उभे राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. ग्रामोफोनचा वापरअतिशय जुनी गाणी ही ग्रामोफोनच्या तबकडीवर असल्याने या कार्यक्रमात ग्रामोफोन आणला जातो. त्यावर ही जुनी गीते ऐकवली जातात. त्यामुळे या ठिकाणी वेगळाच माहोल तयार होतो.