शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१८१ वर्षांची परंपरा जपणारे ‘जुना बुधवार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 00:27 IST

प्रदीप शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : तब्बल १८१ वर्षांची परंपरा लाभलेल्या ‘जुना बुधवार पेठ तालीम’ मंडळाने सामाजिक ...

प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : तब्बल १८१ वर्षांची परंपरा लाभलेल्या ‘जुना बुधवार पेठ तालीम’ मंडळाने सामाजिक स्तरावर विविध प्रकारचे उपक्रम राबवत ‘माणुसकी जपणारी तालीम’ अशी ओळख प्रस्थापित केली आहे. तसेच कुस्तीसह विविध क्रीडाप्रकारांतही आपले नाव सर्वदूर पोहोचविले आहे.पंचगंगेच्या काठावर १८३८ मध्ये स्वातंत्र्यपूर्वकाळात जुना बुधवार पेठेत या तालमीची स्थापना झाली. तालमीच्या परिसरात सर्व जातिधर्मांचे नागरिक आजही गुण्यागोविंदाने राहतात. स्थापनेपासून सामाजिक बांधीलकी जपलेल्या या तालमीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्येक नागरिकाच्या सुख:-दु:खात धावून जातात.स्वातंत्र्यपूर्वकाळात तालमीने क्रांतिकारकांना नेहमीच आसरा दिला. स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. लाड, रत्नाप्पाण्णा कुंभार, दत्तोबा तांबट, हिवारे, आदी क्रांतिकारकांनी भूमिगत अवस्थेत तालमीच्या परिसरात आश्रय घेतला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तालमीचे पैलवान कै. शंकरराव तोरस्कर यांनी हौतात्म्य पत्करले आहे. प्रश्न कोल्हापुरातील टोलचा, खंडपीठाचा असो किंवा मराठा समाज आरक्षणाचा असो; यासारख्या सामाजिक प्रश्नांवर तालमीचे कार्यकर्ते प्रत्येक आंदोलनात पुढे असतात.२६ जानेवारी २०१८ रोजी शिवाजी पुलावरून नदीत कोसळलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर्समधील प्रवाशांना तालमीच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्रीच्या वेळी जिवाची पर्वा न करता पाण्यात उड्या घेऊन जीवदान दिले. आॅगस्टमध्ये आलेल्या महापुरामध्ये पूरग्रस्त भागातील नागरिकांची तालमीमध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पूर ओसरल्यानंतर प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तू देऊन कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. सामाजिक बांधीलकी जपत सर्व नागरिकांसाठी नाममात्र मानधनावर तालमीचे सभागृह उपलब्ध करून दिले जाते. जुना बुधवार तालीम ही हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. मुख्य इमारतीमध्ये झिमझिमसाहेबांचे जागृत देवस्थान आहे. तालमीतर्फे मोहरम, त्र्यंबोली यात्रा, गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.१९८५ सालापासून तालमीच्या पुढाकाराने पंचगंगा नदीवर दीपोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी त्यामध्ये वाढ होत आहे. खेळांसोबत परिसरातील मुलांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी तालमीमध्ये अभ्यासिका सुरू केली होती. तिचा लाभ घेऊन परिसरातील अनेकजण वकील, डॉक्टर, इंजिनिअर, शासकीय नोकरदार झाले आहेत.सर्व क्रीडाप्रकारांत अव्वलतालमीची कुस्तीपरंपरा मोठी आहे. पूर्वी तालमीमध्ये पै. आनंदराव डांगे, राजाराम वरुटे, पांडुरंग पाटील, शंकरराव तोरस्कर, यशवंतराव पाटील, रंगराव पाटील, गणपतराव दिंडे, महादेव कुंभार, दगडू पाडळकर, दादू वरेकर, विष्णुपंत हांडे, महादेव वरेकर, सखाराम दिंडे, विजयसिंह गायकवाड, माजी खासदार उदयसिंह गायकवाड, माजी आमदार संजयसिंह गायकवाड, नारायण जाधव, वसंत पाटील, इब्राहिम मुल्ला, नारायण पाटील यांचा समावेश होता. आॅल इंडिया विद्यापीठ चॅम्पियनशिप मिळविलेले बाळ बोडके हे याच तालमीचे. पूर्वी गुढीपाडव्यानिमित्त सायकल स्पर्धा होत असे. बुधवार पेठ तालीम ते केर्ली असा तिचा मार्ग असायचा. त्यामध्ये अन्य जिल्ह्यांतील सायकलपटू सहभागी होत असत. म्हशींच्या शर्यती घेतल्या जात असत. वैशिष्ट्य म्हणजे म्हशींच्या शर्यतीची रनिंग कॉमेंट्रीसुद्धा ऐकविली जायची. ही कॉमेंट्री कै. बाबूराव ढेरे करीत असत. बैलगाडीच्या शर्यतीमध्ये तालमीच्या परिसरातील बैलगाड्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. १९६५ साली तालमीचा फुटबॉल संघ नावारूपाला आला. तेव्हापासून फुटबॉल संघाने आजही दबदबा कायम ठेवला आहे. प्रभाकर डांगे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अवनी सावंत आणि ऋग्वेदा दळवी यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवरील जलतरण स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. नेमबाजीत मंजिल हकमी, बाळासाहेब पीरजादे, कुणाल मिस्त्री या युवकांनी यश मिळविले आहे. आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक महेश कदम येथीलच. अ‍ॅथलेटिक्समध्ये राजू माने यांनी भरीव कामगिरी केली आहे. हॉकीमध्ये विकास जाधव, जिम्नॅस्टिकमध्ये प्रतीक्षा शेखर, तृप्ती पाटील यांनी उल्लेखनीय यश मिळविले. आयर्नमॅनचा बहुमानही उत्तम फराकटे यांनी मिळविला आहे.कागदाच्या लगद्यापासून २१ फुटी गणेशमूर्तीतालमीने अनेक ज्वलंत विषयांवर तांत्रिक देखावे सुरू केले. तालमीने गणेशोत्सवादरम्यान विविध विषयांवर सामाजिक प्रबोधन केले. १९७७ साली कागदाच्या लगद्यापासून बनविलेली शहरातील पहिली २१ फुटी मूर्ती तालमीतीलच आदिनाथ भणगे यांनी बनविली होती. भारत-चीन युद्ध, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांविषयी इंदिरा गांधी यांनी केलेल्या भाषणाच्या प्रसंगावर हलता देखावा, तुका जाई वैकुंठाला आणि रेड्यामुखी वेद, मी शिवाजी पूल बोलतोय हे देखावे सादर केले. तत्कालीन खासदार सदाशिव मंडलिक यांनी त्याची दखल घेऊन नवा पूल बांधण्यासाठी प्रस्ताव दिला. अशा विविध नागरी समस्या व सामाजिक समस्यांवर आधारित देखावे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून साकारून या तालमीने सामाजिक बांधीलकी दाखवून दिली.