शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

पदभ्रमंतीचा जुना मार्ग-शिवा काशीद यांची समाधी-हिल रायडर्सची मोहीम गिनिज बुकमध्ये जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 10:55 PM

-संदीप आडनाईकशिवशौर्याने पावन झालेल्या पावनखिंडीच्या जुन्या मार्गाने काही संस्था ही मोहीम पूर्ण करतात. पांढरपाणी येथे जुनी फरसबंदी असलेली वाट साफ केली. इतिहास अभ्यासक व संशोधक डॉ. श्रीदत्त राऊत व शिवशौर्यच्या ट्रेकर्स श्रमदानाने कालांतराने लुप्त होत चाललेल्या पावनखिंड मार्गावर चालतात. या मार्गावर शिवकालीन मार्ग असा उल्लेख असलेला फलकही रस्त्याच्या कडेने लावण्यात ...

-संदीप आडनाईक

शिवशौर्याने पावन झालेल्या पावनखिंडीच्या जुन्या मार्गाने काही संस्था ही मोहीम पूर्ण करतात. पांढरपाणी येथे जुनी फरसबंदी असलेली वाट साफ केली. इतिहास अभ्यासक व संशोधक डॉ. श्रीदत्त राऊत व शिवशौर्यच्या ट्रेकर्स श्रमदानाने कालांतराने लुप्त होत चाललेल्या पावनखिंड मार्गावर चालतात. या मार्गावर शिवकालीन मार्ग असा उल्लेख असलेला फलकही रस्त्याच्या कडेने लावण्यात आला आहे. याच गावात शिवाजी महाराजांनी विहीर बांधून दिली त्याचाही नामफलक तेथे आहे.इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांनी टाकलाशिवा काशीद, बाजीप्रभूंच्या समाधीवर प्रकाशपन्हाळ्याचे भूषण असलेले इतिहास संशोधक कै. मु. गो. गुळवणी यांनी हयातभर इतिहास संशोधनाचे काम केले. शिवकाळातील अनेक वीररत्नांच्या समाधीचा शोध त्यांनीच लावला. नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांची विशाळगडावरील समाधी, जोत्याजी केसरकर यांची पुनाळ(ता. पन्हाळा) येथील समाधी, संभाजी महाराजांचे टेहळणीचे ठिकाण असलेले बारद्वारी (बादेवाडी), पेठवडगाव येथील सेनापती धनाजी जाधव, कोल्हापूरचे पहिले छत्रपती शिवाजीराजे यांची समाधी तसेच यशवंतराव थोरात यांचे मंदिर, जोतिबावरील बगाड ही त्यांची काही मौलिक संशोधने होय.शिवा काशीद यांची समाधीशिवा काशीद यांचे थेट वंशज बापूसाहेब केदारी काशीद यांच्याकडून इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांना प्राथमिक माहिती मिळाली. त्यांच्या घराण्यात पूर्वापार न्हावकीचा धंदा असून त्यांना सर्व्हे नंबर ४७ चा हिस्सा २, ३, ४, ५ क्षेत्र १७ गुंठे ही जमीन नेबापुरात इनाम मिळाली आहे. ती न्हावकीची जमीन म्हणून ओळखली जाते. यावरून गुळवणी गुरुजींनी शिवा काशीद यांची समाधी शोधून काढली. ही समाधी एका मोठ्या जांभ्या दगडावर व्यवस्थित फोडून केलेल्या बैठकीवर एकावर एक अशी दोन मोठी दगडे ठेवून बांधलेली आहे. त्यावर महादेवाची पिंडी असून त्यावर शिवा का असे लिहिलेले आढळते. आजही शिवा काशीद यांचे तेरावे थेट वंशज रघुनाथ बापू काशीद आणि आनंदा रघुनाथ काशीद हे नेबापुरात शिवा काशीद यांच्या समाधीच्या मागे असणाऱ्या घरात राहतात.हिल रायडर्सची मोहीम गिनिज बुकमध्ये जाणारइंदूमती गणेशपन्हाळगड-पावनखिंड मोहीम आता अनेक संस्थांकडून आयोजित केली जात असली तरी त्याची सुरुवात केली ती हिल रायडर्स या संस्थेने. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, त्यांचा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीला कळावा यासाठी सन १९८६ मध्ये मोहिमेला प्रारंभ झाला. पहिल्यावेळी शंभर मावळ्यांनिशी सुरू झालेला हा प्रवास आता ५१ वी मोहीम आणि एक हजार मावळ्यांवर आला आहे. या इतिहासाची उजळणी करताना समाजभान ठेवत वाटेवरील वाड्या-वस्त्यांचे, लहान गावांमधील जगण्याचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. संस्थेने चार गावे दत्तक घेतली असून तेथे आरोग्य सुविधा, स्वच्छतागृहे, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य अशा सोयी-सुविधा निर्माण केल्या आहेत. ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक, ‘माईल स्टोन’सह मोहिमेत सहभागी होणाºया युवक-युवतींसाठी संस्थेच्या पुढाकारामुळे मोठा हॉल बांधण्यात आला आहे. ही मोहीम जगाच्या नकाशावर आणण्यासाठी गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.महाराष्ट्रातील पहिली रात्र मोहीम केवळ स्वराज्याची गरज म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी जो धाडसी प्रयोग केला त्यासाठी त्यांनी निसर्गाचा पूर्ण अभ्यास केला होता. आषाढी पौर्णिमेची रात्र, तुफान पाऊस, जोडीला दाट धुके यामुळेच शत्रूला सुगावा लागण्याची शक्यता कमी. याच परिस्थितीचा फायदा उठवत शिवरायांनी विशाळगड गाठला. त्यांनी ज्या तिथीला रात्री हा प्रवास केला त्याच दिवशी गेली १५ वर्षे मैत्रेय प्रतिष्ठानची ‘किल्ले पन्हाळगड ते पावनखिंड’ ही महाराष्ट्रातील पहिली रात्रमोहीम आयोजित केली जाते. दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांनी ३५ वर्षांपूर्वी ही मोहीम सुरू केली. परंतु ती दिवसा होती. दोन दिवसांची होती. नंतर ती एक दिवसाची करण्यात आली; मात्र आता एका रात्रीत ४९ किलोमीटर अंतर कापणारी ही साहसी रात्रमोहीम लक्षवेधी ठरत आहे.

तयारी चार महिन्यांपासून आधीपन्हाळा ते पावनखिंड या मोहिमांची संख्या वाढत असताना त्यामध्ये सहभागी होणाºयांची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये महिला आणि युवतीही मागे नाहीत; मात्र यासाठी या संयोजक संस्थांना आधी चार महिन्यांपासून तयारी करावी लागते. संपूर्ण मार्ग पायाखाली पाहून कुठे काही धोकादायक नैसर्गिक परिस्थिती नव्याने निर्माण झाली का याचा आढावा घ्यावा लागतो. यानंतर वैद्यकीय सेवेपासून ते भोजनापर्यंतचे नियोजन करावे लागते. हिल रायडर्सचे प्रमोद पाटील म्हणाले, संपूर्णपणे आडवाटेने असणारी ही मोहीम असल्याने आम्हाला सर्वबाजूंनी दक्षता घ्यावी लागते; त्यामुळे आधीपासूनच नियोजन सुरू होते. दरवर्षी आम्ही जात असल्याने आता अनेक गावांमध्ये कार्यकर्ते तयार झाले आहेत. त्यांचे सहकार्य लाभते. मुक्कामाची सोय, मधूनच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पर्यायी वाहन व्यवस्था, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक यांची तयारी केली जाते.-समीर देशपांडे-