शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

म्हातारा धो-धो बरसला तरच ‘चिकोत्रा’ भरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:15 IST

रवींद्र येसादे।लोकमत न्यूज नेटवर्कउत्तूर : सगळीकडे दमदार पाऊस पडल्यामुळे धरणे भरत आहेत. मात्र, आजरा तालुक्यातील चिकोत्रा मध्यम पाटबंधारे प्रकल्प त्यास अपवाद ठरला. म्हातारा पाऊस धो-धो बरसला तरच चिकोत्रा प्रकल्प भरणार आहे. म्हातारीच्या पठारावरील पाण्याचा ओघ सुरू झाल्याने प्रकल्प ४० टक्केच भरला आहे.बहुचर्चित भुदरगड तालुक्यातील म्हातारीचे पठार येथे वनखात्याच्यावतीने बांधण्यात आलेला ...

रवींद्र येसादे।लोकमत न्यूज नेटवर्कउत्तूर : सगळीकडे दमदार पाऊस पडल्यामुळे धरणे भरत आहेत. मात्र, आजरा तालुक्यातील चिकोत्रा मध्यम पाटबंधारे प्रकल्प त्यास अपवाद ठरला. म्हातारा पाऊस धो-धो बरसला तरच चिकोत्रा प्रकल्प भरणार आहे. म्हातारीच्या पठारावरील पाण्याचा ओघ सुरू झाल्याने प्रकल्प ४० टक्केच भरला आहे.बहुचर्चित भुदरगड तालुक्यातील म्हातारीचे पठार येथे वनखात्याच्यावतीने बांधण्यात आलेला बंधारा सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरला असून, पाणी बांधावरून वाहत आहे. चिकोत्रा प्रकल्प ४० टक्के, तर मेघोली प्रकल्प ७५ टक्के इतका भरला आहे.आजरा, भुदरगड, कागल तालुक्यांतील ५२ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी अपुरा पाणीपुरवठा होतो. गेल्यावर्षी धरण केवळ ६३ टक्के इतकेच भरले होते. चिकोत्रा धरणात पुरेसा पाणीसाठा होत नसल्याने चार वर्षांपूर्वी म्हातारीचे पठार येथील वनविभागाच्या हद्दीत साधारणत: २०० मीटर लांबीचा बांध घालण्यात आला.त्यामुळे येथून वाहून जाणारे पाणी अडविण्यात येऊन बंधाऱ्यातील पाणी २०० मीटर लांबीची चर काढून चिकोत्रा नदीपात्राच्या दिशेने सोडण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात चिकोत्रा धरण भरण्यासाठी येथील पाण्याचा उपयोग होऊ लागला; पण हे पाणी अडविल्यामुळे मेघोली प्रकल्प भरणार नाही या गैरसमजुतीतून मेघोलीच्या अज्ञात ग्रामस्थांनी हा बांध फोडला. यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी अन्यत्र वाहून गेले.प्रांताधिकारी व वनविभागाचे अधिकारी व दोन्हीकडील लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत फोडलेल्या बंधाºयाचा बांध नव्याने घालून पावसाळ्यात बंधारा भरल्यानंतर पाणीपातळी ९८ तलांकावर आल्यानंतर पाणी चिकोत्रा व मेघोली असे दोन्हीकडे सोडण्याचे ठरविण्यात आले.गतवर्षी तेथून चिकोत्राकडे येणारे पाणी अडविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळीही गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा वनविभागाकडून देण्यात आला आहे.यावर्षी हा बंधारा संततधार पडणाºया पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरला आहे. पिंपळगाव वनविभागाचे वनपाल के. एच. पाटील, वनरक्षक ए. एम. चौगले यांनी पठारावर भेट देऊन पाणीसाठा व दोन्हीकडे जाणाºया पाण्याची पाहणी केली. चिकोत्राकडे जाणाºया चर मार्गात कोणत्याही प्रकारचा अडथळा नसून पाणी प्रमाण वाढत आहे. तसेच मेघोलीच्या दिशेनेही पाणी जात आहे. सध्या पठारावर पावसाचे प्रमाण जास्त असल्याने बंधाºयातील पाणी पातळी दररोज वाढत आहे.मेघोलीमध्ये ७० टक्के पाणीसाठासाधारणत: ९८.२३ द. ल. घ. मी. इतकी क्षमता असलेला मेघोली लघुपाटबंधारे प्रकल्प ७० टक्के भरला आहे. मागील वर्षी जुलैमध्ये हा प्रकल्प ६० टक्के भरला होता. म्हातारीच्या पठारावर पाऊस जोरदार पडत असल्याने जुलै महिनाअखेर प्रकल्प पूर्ण भरेल.चिकोत्रात ४० टक्के पाणीसाठा : पावसामुळे दीड टीएमसी इतकी क्षमता असलेल्या चिकोत्रा धरणातील पाणी वाढण्यास मदत झाली आहे. सध्या धरणात ६३०द. ल. घ. मी. इतका पाणीसाठा झाला आहे. म्हणजेच धरण ४० टक्के इतके भरले आहे.