शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या सरकारची टोलबाबत जुनी नीती

By admin | Updated: January 8, 2015 00:38 IST

सरकारचीच री नव्या सरकारने ओढल्यास कोल्हापुरात टोलप्रश्नावरून पुन्हा उद्रेक ठरलेला आहे,

कोल्हापूर : कोल्हापूर व खारघर येथील टोलचा प्रश्न समान आहे. दोन्ही ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे जनतेचा टोल देण्यास विरोध आहे. मागील सरकारच्या धोरणामुळेच कोल्हापूरचा टोलप्रश्न जटील बनला. आता नव्या सरकारनेही खारघरबाबत जुन्या सरकारचीच भूमिका घेत, कोल्हापूरप्रमाणेच टोलवसुलीसाठी पोलीस संरक्षण पुरविले आहे. मागील सरकारचीच री नव्या सरकारने ओढल्यास कोल्हापुरात टोलप्रश्नावरून पुन्हा उद्रेक ठरलेला आहे, असा इशारा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.खारघर येथील टोलबाबत तेथील जनतेच्या भावनाही कोल्हापूरप्रमाणेच तीव्र अहेत. मात्र, सरकारची टोलकडे पाहण्याची पद्धती व भावना यांमध्ये साम्य दिसत आहे. निकृष्ट दर्जामुळे खारघरच्या जनतेचा टोलसाठी विरोध आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करून टोलवसुली व पोलीस संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूरप्रमाणेच सरकारने ठेकेदाराचे हित पाहिल्याचे या प्रकरणातून दिसून येते. शासनाने यासाठी मूल्यांकन समिती नेमली आहे. समितीच्या अहवालप्राप्तीनंतर येत्या दोन महिन्यांत संपूर्ण टोलमुक्तीची कोल्हापूरकरांना आस लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तशी कोल्हापूरकरांना ग्वाही दिली आहे. नवे सरकार कोल्हापूरच्या संपूर्ण टोलमुक्तीच्या आश्वासनाला जागले नाही, तर प्रचंड जनक्षोभ होईल.असा इशारा साळोखे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)राज्य शासनाने नेमलेल्या मूल्यांकन समितीच्या अहवालानंतर येत्या दोन महिन्यांत कोल्हापूर टोलमुक्त होण्याची आशा आहे. आज टोलविरोधी आंदोलन पूर्णपणे शांत झालेले दिसत असले तरी ही शांतता वरवरची आहे. संपूर्ण टोलमाफी न झाल्यास पुन्हा आंदोलनाची धग पेटेल. -निवास साळोखे,निमंत्रक, कृती समिती