शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

नव्या सरकारची टोलबाबत जुनी नीती

By admin | Updated: January 8, 2015 00:38 IST

सरकारचीच री नव्या सरकारने ओढल्यास कोल्हापुरात टोलप्रश्नावरून पुन्हा उद्रेक ठरलेला आहे,

कोल्हापूर : कोल्हापूर व खारघर येथील टोलचा प्रश्न समान आहे. दोन्ही ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे जनतेचा टोल देण्यास विरोध आहे. मागील सरकारच्या धोरणामुळेच कोल्हापूरचा टोलप्रश्न जटील बनला. आता नव्या सरकारनेही खारघरबाबत जुन्या सरकारचीच भूमिका घेत, कोल्हापूरप्रमाणेच टोलवसुलीसाठी पोलीस संरक्षण पुरविले आहे. मागील सरकारचीच री नव्या सरकारने ओढल्यास कोल्हापुरात टोलप्रश्नावरून पुन्हा उद्रेक ठरलेला आहे, असा इशारा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.खारघर येथील टोलबाबत तेथील जनतेच्या भावनाही कोल्हापूरप्रमाणेच तीव्र अहेत. मात्र, सरकारची टोलकडे पाहण्याची पद्धती व भावना यांमध्ये साम्य दिसत आहे. निकृष्ट दर्जामुळे खारघरच्या जनतेचा टोलसाठी विरोध आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करून टोलवसुली व पोलीस संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूरप्रमाणेच सरकारने ठेकेदाराचे हित पाहिल्याचे या प्रकरणातून दिसून येते. शासनाने यासाठी मूल्यांकन समिती नेमली आहे. समितीच्या अहवालप्राप्तीनंतर येत्या दोन महिन्यांत संपूर्ण टोलमुक्तीची कोल्हापूरकरांना आस लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तशी कोल्हापूरकरांना ग्वाही दिली आहे. नवे सरकार कोल्हापूरच्या संपूर्ण टोलमुक्तीच्या आश्वासनाला जागले नाही, तर प्रचंड जनक्षोभ होईल.असा इशारा साळोखे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)राज्य शासनाने नेमलेल्या मूल्यांकन समितीच्या अहवालानंतर येत्या दोन महिन्यांत कोल्हापूर टोलमुक्त होण्याची आशा आहे. आज टोलविरोधी आंदोलन पूर्णपणे शांत झालेले दिसत असले तरी ही शांतता वरवरची आहे. संपूर्ण टोलमाफी न झाल्यास पुन्हा आंदोलनाची धग पेटेल. -निवास साळोखे,निमंत्रक, कृती समिती