शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

‘महसूल’च्या आज आॅफलाईन बदल्या

By admin | Updated: May 31, 2016 01:17 IST

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : कर्मचाऱ्यांमध्ये घालमेल; गुणवत्ता, योग्यता तपासली जाणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील महसूल आस्थापनेतील बदल्या आॅनलाईन ऐवजी आॅफलाईन पद्धतीने आज, मंगळवारी होणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सोमवारी हे स्पष्ट केले. तहसीलदारांकडून त्यांच्याकडील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी मागविण्यात आली असून, त्यानुसार प्रत्येकाची गुणवत्ता व योग्यता पाहूनच योग्य त्या ठिकाणी या बदल्या केल्या जाणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा व अभ्यासाचा उपयोग प्रशासनाच्या कामात कशा पद्धतीने होईल? यादृष्टीने या बदल्यांचे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.मे महिना म्हणजे महसूल आस्थापनेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम. या बदल्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या ‘आॅनलाईन’ पद्धतीचा यावर्षी अवलंब न करता ‘आॅफलाईन’ पद्धतीने बदल्या करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यानुसार ठरल्याप्रमाणे सोमवारी बदल्या होणे अपेक्षित होते; परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे या बदल्या झाल्या नाहीत. त्या आता आज, मंगळवारी होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.बदल्यांमध्ये १६ नायब तहसीलदार, ६२ मंडल अधिकारी व अव्वल कारकून, तसेच ७६ लिपिकांचा समावेश आहे. एकाच ठिकाणी तीन वर्षे काम केलेल्या नायब तहसीलदारांच्या बदल्या जिल्ह्यांतर्गतच होणार आहेत. त्याचबरोबर महसूल विभागातील लिपिक, अव्वल कारकून, मंडल अधिकारी या पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी मुख्यालयात सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या तसेच सध्याच्या पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या व बदलीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. तहसीलदारांकडून बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी मागून घेण्यात आली आहे. बदल्यांच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची घालमेल वाढली आहे. सोमवारी बदल्या होणार होत्या; परंतु त्या न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कर्मचारी याबाबत गटा-गटाने चर्चा करताना दिसत होते. आॅनलाईन पद्धतीऐवजी आॅफलाईनद्वारे बदल्या होणार असल्याने कोण कुठे जाणार? हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या घालमेलीत भर पडली आहे. (प्रतिनिधी)महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या आज, मंगळवारी होणार आहेत. त्यानुसार सर्व तहसीलदारांकडून बदलीस पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मागवून घेण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची योग्यता, गुणवत्ता, आदी माहितीही मागविली आहे. यंदा आॅनलाईनऐवजी आॅफलाईन पद्धतीनुसारच बदल्या होणार आहेत. ज्या ठिकाणी व्यक्तीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी त्या योग्यतेच्या व्यक्तीला पाठवून त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेऊन प्रशासनाच्या कामात सुलभता आणणे, हा ‘आॅफलाईन’ मागील उद्देश आहे. -डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी.