शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

‘महसूल’च्या आज आॅफलाईन बदल्या

By admin | Updated: May 31, 2016 01:17 IST

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : कर्मचाऱ्यांमध्ये घालमेल; गुणवत्ता, योग्यता तपासली जाणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील महसूल आस्थापनेतील बदल्या आॅनलाईन ऐवजी आॅफलाईन पद्धतीने आज, मंगळवारी होणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सोमवारी हे स्पष्ट केले. तहसीलदारांकडून त्यांच्याकडील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी मागविण्यात आली असून, त्यानुसार प्रत्येकाची गुणवत्ता व योग्यता पाहूनच योग्य त्या ठिकाणी या बदल्या केल्या जाणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा व अभ्यासाचा उपयोग प्रशासनाच्या कामात कशा पद्धतीने होईल? यादृष्टीने या बदल्यांचे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.मे महिना म्हणजे महसूल आस्थापनेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम. या बदल्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या ‘आॅनलाईन’ पद्धतीचा यावर्षी अवलंब न करता ‘आॅफलाईन’ पद्धतीने बदल्या करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यानुसार ठरल्याप्रमाणे सोमवारी बदल्या होणे अपेक्षित होते; परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे या बदल्या झाल्या नाहीत. त्या आता आज, मंगळवारी होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.बदल्यांमध्ये १६ नायब तहसीलदार, ६२ मंडल अधिकारी व अव्वल कारकून, तसेच ७६ लिपिकांचा समावेश आहे. एकाच ठिकाणी तीन वर्षे काम केलेल्या नायब तहसीलदारांच्या बदल्या जिल्ह्यांतर्गतच होणार आहेत. त्याचबरोबर महसूल विभागातील लिपिक, अव्वल कारकून, मंडल अधिकारी या पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी मुख्यालयात सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या तसेच सध्याच्या पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या व बदलीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. तहसीलदारांकडून बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी मागून घेण्यात आली आहे. बदल्यांच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची घालमेल वाढली आहे. सोमवारी बदल्या होणार होत्या; परंतु त्या न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कर्मचारी याबाबत गटा-गटाने चर्चा करताना दिसत होते. आॅनलाईन पद्धतीऐवजी आॅफलाईनद्वारे बदल्या होणार असल्याने कोण कुठे जाणार? हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या घालमेलीत भर पडली आहे. (प्रतिनिधी)महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या आज, मंगळवारी होणार आहेत. त्यानुसार सर्व तहसीलदारांकडून बदलीस पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मागवून घेण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची योग्यता, गुणवत्ता, आदी माहितीही मागविली आहे. यंदा आॅनलाईनऐवजी आॅफलाईन पद्धतीनुसारच बदल्या होणार आहेत. ज्या ठिकाणी व्यक्तीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी त्या योग्यतेच्या व्यक्तीला पाठवून त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेऊन प्रशासनाच्या कामात सुलभता आणणे, हा ‘आॅफलाईन’ मागील उद्देश आहे. -डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी.