शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

अधिकारी-पदाधिकारी हतबल

By admin | Updated: May 27, 2016 23:23 IST

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या : व्यसनी, कामचुकारांचा संघटनेच्या आडून दबाव

संजय पारकर -राधानगरी -जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याचे सत्र सुरू असताना ज्या शिक्षकांवर लोकांच्या गंभीर तक्रारी आहेत अशांच्या मात्र बदल्या होत नाहीत. शिक्षक संघटनांनी आपल्याला हवे तसे कायदे करून घेतल्याने स्थानिक अधिकारी, पदाधिकारी याबाबत हतबल झाल्याचे दिसत आहेत. मात्र, व्यसनी, कामचुकार, ज्यांना शिकवताच येत नाही, जे केवळ पाट्या टाकण्याचे काम करून भरमसाट पगार घेतात अशा शिक्षकांना बदलीची भीतीच नाही. यामुळे अनेक पिढ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.सध्या सर्वत्र खासगी इंग्रजी शाळांचे पेव फुटत आहे. सरकारी प्राथमिक शाळाच्या पटसंख्येवर त्याचा परिणाम होत आहे. मात्र, तरीही ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांना जिल्हा परिषेदेच्या शाळेशिवाय पर्याय नाही. शासन यासाठी मोठा खर्च करते. जिल्हा परिषद या शाळा गुणवत्तापूर्ण व्हाव्यात यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत आहे. शाळेसाठी अहोरात्र राबणाऱ्या शिक्षकांनी असे अनेक प्रयोग यशस्वी करून आपले, शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. इमानेइतबारे काम करणारे अनेक शिक्षक आहेत. अशा शिक्षकांच्या गावातून बदल्या होऊ नयेत म्हणून काही ठिकाणी पालक-ग्रामस्थ प्रयत्नशील असतात.दुसऱ्या बाजूला काही मोजके शिक्षक या सर्वाला गालबोट लावतात. दारू पिऊन शाळेत येणे, मटका-जुगार याच्या आहारी जाणे, शाळेत मुलांना शिकविण्याऐवजी नको ते धंदे करणे, सतत मोबाईलवर बोलणे, शिकवताच येत नसल्याने केवळ पाट्या टाकण्याचे काम करणे, कामचुकारपणा करणे अशा प्रकारच्या तक्रारी या शिक्षकांबाबत आहेत. पूर्वी बदल्यांबाबत काही अधिकार पंचायत समिती स्तरावर सभापतींना होते. त्यावेळी तक्रारी असणाऱ्या किंवा स्थानिक अडचणीनुसार बदल्या व्हायच्या. त्यामुळे अशा शिक्षकांना थोडी भीती असायची. शिक्षकांच्या राज्यस्तरावर मजबूत संघटना आहेत. त्यांचा राजकारण्यावर प्रभाव आहे. त्यामुळे बदल्याबाबत काही कायदे त्यांनी आपल्याला हवे तसे करून घेतले आहेत. अर्थात बदल्याच्या अधिकाराचा गैरवापर थांबविण्याचा यात हेतू असला तरी त्याचा काही ठिकाणी मुलांना फटका बसत आहे. सध्या शिक्षकांना एकाच शाळेत पाच वर्षे पूर्ण झाल्याशिवाय त्याची बदली करता येत नाही. तक्रार झाल्यास चौकशी करून त्याला निलंबित करता येते. मात्र, अशी कारवाई करण्याचे धाडस फारच कमी वेळा केले जाते. अशावेळी त्याच्या कुटुंबाचा विचार केला जातो; मात्र मुलांच्या भवितव्याकडे दुर्लक्ष केले जाते. वारंवार तक्रारी करूनही अशा शिक्षकांच्या बदल्याचे अधिकार नसल्याची हतबलता अधिकारी व्यक्त करतात, तर पालकांना मात्र आपल्या मुलाच्या भवितव्याची चिंता लागून राहते. पदोन्नतीव्यतिरिक्त शिक्षकांची एकाच ठिकाणी पाच वर्षे सेवा झाल्याशिवाय बदली करता येत नाही. तक्रार असल्यास त्याची चौकशी करून अहवाल जिल्हा परिषद व तेथून विभागीय आयुक्तांना पाठवावा लागतो. त्याच्या मंजुरीनंतर बदली होते. निलंबनाचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहेत. -एम. एस. मांडे, गटशिक्षणाधिकारी राधानगरीकाही शिक्षकांबद्दल गंभीर तक्रारी असतात. त्यांच्या बदल्या न झाल्यास पाच वर्षे एकाच शाळेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. अशावेळी स्थानिक पातळीवर पूर्वीप्रमाणे काहीतरी अधिकार असणे आवश्यक आहे. -गोविंदराव चौगले, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सोन्याची शिरोली (ता. राधानगरी)