शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कचरा उठावासाठी पदाधिकारी आक्रमक

By admin | Updated: September 9, 2016 01:12 IST

वाहने नादुरुस्तच्या कारणाने संतप्त : अधिकाऱ्यांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा

कोल्हापूर : गणेशोत्सवासारखा अत्यंत महत्त्वाचा सण सुरू असल्याने शहरातील कचरा दररोज उचलला जावा, अशी अपेक्षा असताना महानगरपालिका प्रशासनाकडून वाहने नादुरुस्त असल्याचे कारण दिले जात असल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, तसेच वर्कशॉप प्रमुख रावसाहेब चव्हाण यांना चांगलेच फैलावर घेतले. येत्या दोन दिवसांत जर शहरातील कचरा उठाव झाला नाही तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कचरा टाकण्याचा इशारा महापौर अश्विनी रामाणे यांनी यावेळी दिला. कचरा उठावाची सर्व वाहने तातडीने दुरुस्त करून घ्यावीत, असे आदेश महापौर रामाणे यांनी प्रशासनाला दिले. गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिकेची कचरा उठाव करणारी सहा ते सात आर. सी. वाहने बंद आहेत. त्यामुळे कचरा उठाव करण्याच्या कामात विस्कळीतपणा येत आहे. प्रभागात जेथे कंटेनर आहेत, त्यामध्ये कचरा साचून दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होत आहे. कचरा उठाव करा म्हणून नगरसेवकांनी सांगितले तरी वाहने उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, महिला व बालकल्याण सभापती वृषाली कदम, कॉँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक राहुल माने, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, मधुकर रामाणे, आश्पाक आजरेकर, आदींनी सुभाष स्टोअर येथे जाऊन वर्कशॉपचे प्रमुख रावसाहेब चव्हाण यांच्याकडून माहिती घेतली. त्यावेळी सुटे भाग उपलब्ध नसल्याने पाच आर. सी. वाहने नादुरुस्त असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनाही त्या ठिकाणी बोलावून घेण्यात आले. रावसाहेब चव्हाण यांच्याकडून कामाचाअनुभव चांगला नाही; त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे शारंगधर देशमुख यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सुटे भाग उपलब्ध नसल्याचे अतिशय बालिश उत्तर दिल्यामुळे पदाधिकारी चांगलेच खवळले. त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. जर दोन दिवसांत शहरातील कंटेनरमधून साचलेल्या कचऱ्याचा उठाव झाला नाही तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कचरा टाकण्यात येईल, असा दमच महापौरांनी दिला.