शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ नावाचा महासागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 01:02 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एरव्ही दत्तदर्शनासाठी नृसिंहवाडीला जाण्याची ओढ अनेकांना असते. वाडीची दोन-चार किलो वांगी ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एरव्ही दत्तदर्शनासाठी नृसिंहवाडीला जाण्याची ओढ अनेकांना असते. वाडीची दोन-चार किलो वांगी घेतल्याशिवाय आणि कुरुंदवाडच्या बासुंदीची चव चाखल्याशिवाय भाविक, पर्यटक इथून बाहेर पडतच नाहीत. त्याच नृसिंहवाडी, कुरुंदवाडसह २५ हून अधिक गावांना आता कृष्णा-पंचगंगेनं अशी काही मगरमिठी मारली आहे की ती सुटता सुटेनाशी झाली आहे. शेकडो किलोमीटर पाहावं तिकडं पाणीच पाणी. शिरोळ नावाचा समुद्रच निर्माण झाल्याजोगी ही परिस्थिती.कोल्हापूरजवळच्या आंबेवाडी, चिखलीमधील परिस्थिती थोडी नियंत्रणात आली आहे, असे म्हणत असतानाच शिरोळ तालुक्यातील पुराचा पाण्याचा वेढा पडलेल्या गावांची संख्या वाढू लागली. म्हणूनच रविवारी दिवसभर शिरोळ तालुक्याचा दौरा केला तर महापुराने उडविलेली हजारो ग्रामस्थांची दैना पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात जोरात पाऊस कोसळू लागला. धरणे भरली, विसर्ग सुरू झाले. जुलै अखेरीला मात्र पुन्हा पूर येण्याची चिन्हे दिसू लागली आणि तो तसा आलाच. तो आला तो इतक्या धडाक्याने आला की अंगावरच्या कपड्यांनिशी अनेकांवर बाहेर पडण्याची वेळ आली.गोठ्यातील जनावरं सोडायची की बांधूनच ठेवायची हेही कळेना.जेवढं काही हाताला लागेल ते घेऊन, पोराबाळांना घेऊन आलेल्या बोटीतून बाहेर पडण्यासाठी अनेकांची धांदल उडाली. ज्यांना आत्मविश्वास होता की २००५ चा महापूर आम्ही बघितलाय, त्यात काय होतंय, असं म्हणणाऱ्यांना मग व्हॉट्स अ‍ॅपवरून जिल्हा प्रशासनाला मेसेज पाठवायची वेळ आली.तोपर्यंत पाणी वाढलं. घरं पाण्याखाली गेली. गावातील दोन-तीन मजली घरांचा आसरा घ्यावा लागला. जनावरेही टेरेसवर नेऊन बांधावी लागली. त्यांच्या धारा काढायलाही माणसं नाहीत, अशी अवस्था. ज्यांना शक्य होतं त्यांनी आपल्यासमवेत जनावरंही छावणीत आणली आणि आता प्रतीक्षा पाणीपातळी कमी होण्याची आहे. छावण्यांमध्ये जेवणाची सोय आहे. चहापाणी आहे. अनेकजणांचा मदतीचा हात आहे. मात्र प्रश्न आहे तो परत घरी गेल्यावरचा. नेमकं कुठून सुरुवात करायची, हे कळेनासं होणार आहे.