शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

शिरोळ नावाचा महासागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 01:02 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एरव्ही दत्तदर्शनासाठी नृसिंहवाडीला जाण्याची ओढ अनेकांना असते. वाडीची दोन-चार किलो वांगी ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एरव्ही दत्तदर्शनासाठी नृसिंहवाडीला जाण्याची ओढ अनेकांना असते. वाडीची दोन-चार किलो वांगी घेतल्याशिवाय आणि कुरुंदवाडच्या बासुंदीची चव चाखल्याशिवाय भाविक, पर्यटक इथून बाहेर पडतच नाहीत. त्याच नृसिंहवाडी, कुरुंदवाडसह २५ हून अधिक गावांना आता कृष्णा-पंचगंगेनं अशी काही मगरमिठी मारली आहे की ती सुटता सुटेनाशी झाली आहे. शेकडो किलोमीटर पाहावं तिकडं पाणीच पाणी. शिरोळ नावाचा समुद्रच निर्माण झाल्याजोगी ही परिस्थिती.कोल्हापूरजवळच्या आंबेवाडी, चिखलीमधील परिस्थिती थोडी नियंत्रणात आली आहे, असे म्हणत असतानाच शिरोळ तालुक्यातील पुराचा पाण्याचा वेढा पडलेल्या गावांची संख्या वाढू लागली. म्हणूनच रविवारी दिवसभर शिरोळ तालुक्याचा दौरा केला तर महापुराने उडविलेली हजारो ग्रामस्थांची दैना पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात जोरात पाऊस कोसळू लागला. धरणे भरली, विसर्ग सुरू झाले. जुलै अखेरीला मात्र पुन्हा पूर येण्याची चिन्हे दिसू लागली आणि तो तसा आलाच. तो आला तो इतक्या धडाक्याने आला की अंगावरच्या कपड्यांनिशी अनेकांवर बाहेर पडण्याची वेळ आली.गोठ्यातील जनावरं सोडायची की बांधूनच ठेवायची हेही कळेना.जेवढं काही हाताला लागेल ते घेऊन, पोराबाळांना घेऊन आलेल्या बोटीतून बाहेर पडण्यासाठी अनेकांची धांदल उडाली. ज्यांना आत्मविश्वास होता की २००५ चा महापूर आम्ही बघितलाय, त्यात काय होतंय, असं म्हणणाऱ्यांना मग व्हॉट्स अ‍ॅपवरून जिल्हा प्रशासनाला मेसेज पाठवायची वेळ आली.तोपर्यंत पाणी वाढलं. घरं पाण्याखाली गेली. गावातील दोन-तीन मजली घरांचा आसरा घ्यावा लागला. जनावरेही टेरेसवर नेऊन बांधावी लागली. त्यांच्या धारा काढायलाही माणसं नाहीत, अशी अवस्था. ज्यांना शक्य होतं त्यांनी आपल्यासमवेत जनावरंही छावणीत आणली आणि आता प्रतीक्षा पाणीपातळी कमी होण्याची आहे. छावण्यांमध्ये जेवणाची सोय आहे. चहापाणी आहे. अनेकजणांचा मदतीचा हात आहे. मात्र प्रश्न आहे तो परत घरी गेल्यावरचा. नेमकं कुठून सुरुवात करायची, हे कळेनासं होणार आहे.