शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अवकाळीने कोट्यवधींचा फटका

By admin | Updated: March 1, 2015 23:18 IST

व्यवसायावर पाणी : कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पिकांचे मोठे नुकसान

कोल्हापूर : गेले दोन दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. ऊस तोडणी व वाहतूक ठप्प झाल्याने साखर कारखाने, गुऱ्हाळघरे बंद पडली, तर वीज नसल्याने उद्यमनगरसह कोल्हापूर शहरातील विविध छोट्या-मोठ्या उद्योगांची चाके थंडावली. एकाच दिवसात जिल्ह्यात १३७.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात दमदार पावसाने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर परिणाम झाला आहे. उसाची तोडणी व वाहतूक यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली असून त्यामुळे कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ढगाळ हवामान व पाऊस यामुळे उसाची रिकव्हरी कमी पडणार असल्याने त्याचा फटकाही कारखान्यांना बसणार आहे. ढगाळ हवामान व पावसाचा मोठा फटका भाजीपाल्याला बसला आहे. वेलवर्गीय पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. काढणीस आलेल्या गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गुऱ्हाळघरांचा हंगामही अंतिम टप्प्यात आहे. अचानक आलेल्या पावसाने गुऱ्हाळमालकांची चांगलीच तारांबळ उडाली. उसाच्या तोडण्या थांबल्या, जळण भिजले आहे. त्यातच खराब हवामानामुळे गुळाच्या रंगावर परिणाम झाल्याने गुऱ्हाळमालकांचे मोठे नुकसान झाले आहे. खराब हवामानाचा आंब्यासह इतर फळांच्या मोहरावर परिणाम झाला आहे. या पावसाचा फटका वीट व्यावसायिकांनाही बसला. (प्रतिनिधी)साताऱ्यात आंबा, द्राक्षाचे नुकसानसातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले. महाबळेश्वर, पाटण, कऱ्हाड, फलटण, जावळी, वाई, खंडाळा, माण, खटाव परिसरात रात्रभर व रविवारी दिवसभर पाऊस पडत होता. आंब्याचा मोहर गळाला असून द्राक्ष बागा, स्ट्रॉबेरी, गहू आले, ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. वाई, महाबळेश्वर, पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरीचे मोठे उत्पादन घेतले जाते. हे पीक आता हातातोंडाशी आले असतानाच शनिवारपासून पडत असलेल्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या पिकांना माती लागली आहे. त्यामुळे फळाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जावळी, सातारा, कऱ्हाड, वाई तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे गहू, ज्वारी झोपली आहे.