शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अवकाळीने कोट्यवधींचा फटका

By admin | Updated: March 1, 2015 23:18 IST

व्यवसायावर पाणी : कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पिकांचे मोठे नुकसान

कोल्हापूर : गेले दोन दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. ऊस तोडणी व वाहतूक ठप्प झाल्याने साखर कारखाने, गुऱ्हाळघरे बंद पडली, तर वीज नसल्याने उद्यमनगरसह कोल्हापूर शहरातील विविध छोट्या-मोठ्या उद्योगांची चाके थंडावली. एकाच दिवसात जिल्ह्यात १३७.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात दमदार पावसाने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर परिणाम झाला आहे. उसाची तोडणी व वाहतूक यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली असून त्यामुळे कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ढगाळ हवामान व पाऊस यामुळे उसाची रिकव्हरी कमी पडणार असल्याने त्याचा फटकाही कारखान्यांना बसणार आहे. ढगाळ हवामान व पावसाचा मोठा फटका भाजीपाल्याला बसला आहे. वेलवर्गीय पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. काढणीस आलेल्या गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गुऱ्हाळघरांचा हंगामही अंतिम टप्प्यात आहे. अचानक आलेल्या पावसाने गुऱ्हाळमालकांची चांगलीच तारांबळ उडाली. उसाच्या तोडण्या थांबल्या, जळण भिजले आहे. त्यातच खराब हवामानामुळे गुळाच्या रंगावर परिणाम झाल्याने गुऱ्हाळमालकांचे मोठे नुकसान झाले आहे. खराब हवामानाचा आंब्यासह इतर फळांच्या मोहरावर परिणाम झाला आहे. या पावसाचा फटका वीट व्यावसायिकांनाही बसला. (प्रतिनिधी)साताऱ्यात आंबा, द्राक्षाचे नुकसानसातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले. महाबळेश्वर, पाटण, कऱ्हाड, फलटण, जावळी, वाई, खंडाळा, माण, खटाव परिसरात रात्रभर व रविवारी दिवसभर पाऊस पडत होता. आंब्याचा मोहर गळाला असून द्राक्ष बागा, स्ट्रॉबेरी, गहू आले, ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. वाई, महाबळेश्वर, पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरीचे मोठे उत्पादन घेतले जाते. हे पीक आता हातातोंडाशी आले असतानाच शनिवारपासून पडत असलेल्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या पिकांना माती लागली आहे. त्यामुळे फळाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जावळी, सातारा, कऱ्हाड, वाई तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे गहू, ज्वारी झोपली आहे.