शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

अवकाळीने ऊसतोड मजुरांचे हाल

By admin | Updated: November 17, 2016 00:36 IST

निवाऱ्यासाठी शाळा, मंदिरांचा आधार : संसारोपयोगी साहित्याचे नुकसान; रात्र जागून काढली

जयसिंगपूर/ दानोळी : मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसात दानोळी, कवठेसार, उदगाव, चिंचवाड, कुरुंदवाड, हेरवाड, तेरवाड, कोथळीसह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने ऊसतोड कामगारांच्या झोपड्यांत पाणी शिरले. या परिसरात काळी जमीन असल्याने ऊसतोड मजुरांना रात्रभर जागावे लागले. मात्र, मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने शिरोळ तालुक्यातील ऊसतोड मजुरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये ऊसतोड मजुरांच्या झोपडी परिसरात पावसाचे पाणी शिरून धान्याची पोती, संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ऊसतोड मजुरांनी ट्रॅक्टरच्या खाली बसून रात्र घालविली. तसेच जवळपास असलेल्या शाळा, मंदिरांत निवाऱ्यासाठी आधार घेतला होता. तुरंबे : राधानगरी तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेली पिके, जनावरांची वैरण, गुऱ्हाळघरे आणि ऊसतोड मजुरांचे मोठे नुकसान झाले. रब्बी पिके आणि ऊसशेतीला हा पाऊस काहीसा दिलासा देणारा आहे. काही ठिकाणी वीज पडून झाडे उन्मळून पडली, तर वीज दाब वाढल्याने इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाली.राधानगरी तालुक्यात काल रात्री वीज-वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे काही लोकांचे नुकसान झाले, तर काही शेतकऱ्यांना पावसाचा फायदा झाला. अचानक आलेल्या या पावसाने साऱ्यांचीच तारांबळ उडाली.परराज्यातून ऊस तोडणी आणि मजुरीसाठी आलेले मजूर झोपडी बांधून राहिलेले होते. अचानक झालेल्या वादळ-वाऱ्याच्या पावसाने झोपड्यांच्या वर घातलेले कागद उडाले. त्यांचे संसारोपयोगी साहित्य भिजल्याने नुकसान झाले. सावरवाडी : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात मंगळवारी रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे हवेतील उष्मा कमी झाला. तुरळक स्वरूपात पडलेल्या पावसामुळे ऊसतोड मजुरांची तारांबळ उडाली.गेल्या आठवड्यापासून हवेत उष्मा वाढलेला होता. थंडीचे प्रमाण कमी झाले. अवकाळी पावसामुळे गोवऱ्या, विटा बनविणाऱ्या व्यावसायिकांचे नुकसान झाले. ऊस व इतर पिकांना हा पाऊस वरदान ठरला. गुऱ्हाळ व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली होती.शिरगाव : राधानगरी तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट झाली. अनेकांचे भात, नाचणा, भुईमूग शेंगा भिजून चिंब झाल्या, तर ऊसपीक पार कोलमडून पडले. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सायंकाळी विजांच्या कडकडाटासह शिरगाव व परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अनेक ठिकाणी गाड्या घसरून किरकोळ अपघात घडले. या पावसाने ऊसपीक काही ठिकाणी पूर्णपणे कोलमडून पडले आहे. शासनाने ताबडतोब या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.झोपडीत पाणीऊसतोड मजुरांच्या झोपडी परिसरात पावसाचे पाणी शिरून धान्याची पोती, संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. अनेकांनी ट्रॅक्टरच्या खाली बसून रात्र घालविली. तसेच जवळपास असलेल्या शाळा, मंदिरांत निवाऱ्यासाठी आधार घेतला.