शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

प्रसंगी नव्या सत्ताधाऱ्यांविरोधातही लढू

By admin | Updated: October 31, 2014 01:12 IST

राजू शेट्टी : ऊसदरासाठी संघर्ष ही संघटनेची जबाबदारीच, पहिल्या उचलीची घोषणा उद्या करणार

कोल्हापूर : स्वाभिमानी संघटना महायुतीचा घटक पक्ष असल्याने यंदाच्या हंगामात ऊसदरासाठी संघटना आंदोलन करणार की नाही, अशी शंका आमच्या काही मित्रांना वाटू लागली आहे; परंतु राजकारण हा काही आमचा धंदा नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळावे यासाठीच संघटनेची स्थापना झाली असून, प्रसंगी त्यासाठी नव्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढावे लागले तर त्यासाठीही आमची तयारी असल्याचे संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी आज, गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.संघटनेने आंदोलन केले की, आमची दिवाळी खराब केली म्हणायचे आणि आता मात्र संघटना आंदोलन करणार की गप्प बसणार? असा प्रश्न उपस्थित करून शंका व्यक्त करायची, असे सध्या सुरू आहे. त्यामुळे आमचीही स्थिती जरा गाढव विकायला निघालेल्या शेतकऱ्यांसारखी झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.साखर कारखानदारीशी आमचा लढा हा चांगला ऊसदर व तिच्यातील अपप्रवृत्ती दूर करण्यापुरताच मर्यादित आहे. सरसकट साखर उद्योगाविरोधात संघटना कधीच नव्हती व नाही. या उद्योगाला बरोबर घेऊनच त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले असून यापुढेही तसेच प्रयत्न केले जातील, असे शेट्टी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘यंदाची पहिली उचल किती असेल याची घोषणा जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत करू. गेल्यावर्षी २६५० रुपयांचा तोडगा निघाला; परंतु तेवढी रक्कम मिळविण्यात आम्हांला अपयश आले; कारण कायद्याने एफआरपी एवढी रक्कम मिळविणे शक्य होते; परंतु त्यापुढील कारखानदारांशी तोडग्यातून ठरलेली रक्कम वसूल करता येणे शक्य होत नाही. यासाठी ऊसदर मंडळ हा पर्याय चांगला आहे. केंद्र शासनाने आता साखरेचा आयातकर वाढविल्याने देशाबाहेरून साखर येणार नाही हे स्पष्टच आहे; परंतु गेल्या काही वर्षांत हंगामाच्या तोंडावर साखरेचे दर पाडून शेतकऱ्याला ऊसदर मिळणार नाही, असा अनुभव येत आहे. किरकोळ बाजारात साखर ३६ रुपये किलो असताना कारखान्यांकडून मात्र ती २४०० रुपये क्विंटलने खरेदी केली जाते. म्हणजे ग्राहकांचे खिसे कापायचे आणि शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ नाही, असे हे षड्यंत्र आहे. त्यावर टाच आणावी यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासंदर्भात केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पास्वान यांची भेट घेतली आहे. आपल्याच सहकाऱ्याकडून एक कोटी कसे मागेन...?जो माणूस स्वत: लोकवर्गणी काढून निवडून आला, तो आपल्या सहकाऱ्याकडून निवडणूक लढविण्यासाठी एक कोटी रुपये कसा मागेल ? अशी विचारणा खासदार शेट्टी यांनी यावेळी केली. शिरोळ मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार व संघटनेचे कार्यकर्ते उल्हास पाटील यांनी निवडणूक प्रचारात असा आरोप केला होता. उल्हास पाटील यांना पहिल्यांदा उमेदवारी देतानाच पुढील निवडणुकीत तुम्हाला थांबावे लागेल, असे सांगितले होते; परंतु त्यांनी शब्द पाळला नाही व रात्रीत पक्ष बदलला, असे शेट्टी यांनी सांगितले. मशागत आमची, पीक भाजपलागेली पंधरा वर्षे दोन्ही काँग्रेसच्या सरकारविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातत्याने संघर्ष केला. त्यांच्याविरोधात वातावरण तयार करण्यात आम्ही यशस्वी झालो; परंतु प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र संघटनेच्या उमेदवारांना यश मिळाले नाही. ज्या सहा मतदारसंघात संघटनेच्या विरोधात शिवसेना विजयी झाली तिथे राष्ट्रवादीला एकदम कमी मते आहेत व ज्या पाच मतदारसंघात राष्ट्रवादी विजयी झाली तिथे शिवसेनेला अगदीच कमी मते आहेत. हे सहजासहजी घडलेले नाही. त्यामुळे संघटनेचा पराभव झाला. पराभव झाला तरी भाजपच्या मतांमध्ये आमच्या सर्वांमुळे (संघटना, रासप व आठवले गट) वाढ झाली आहे. मशागत आम्ही केली; परंतु पीक भाजपच्या हाताला लागले. त्यामुळे त्यातील थोडा वाटा संघटनेला देण्याचा शब्द आता भाजपने पाळावा, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)