शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘सिग्नल’ला बसथांब्यांचा अडथळा

By admin | Updated: May 20, 2017 00:33 IST

वाहतूक कोंडी : शहरातील सात ठिकाणचे बसथांबे अन्यत्र हलविण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विस्कळीत वाहतूक व्यवस्था, अरुंद रस्ते आणि वाढत्या वाहनांमुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यात परत वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांची संख्या जास्त आहे. वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरातील बंद असलेले काही सिग्नल सुरू करण्यात आले. मात्र, यापैकी काही सिग्नलजवळच बसथांबे असल्याने हेच बसथांबे आता वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शहरातील अनेक वर्षे बंद असलेले काही सिग्नल पूर्ववत सुरू करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीस काही प्रमाणात शिस्त लागत आहेत. मात्र, काही सिग्नलजवळच के.एम.टी., एस.टी.चे बसथांबे आहेत. या ठिकाणी एकाच वेळी एस.टी., के.एम.टी. व रिक्षा थांबत असल्याने सिग्नल सुटल्यानंतर वाहतुकीची कोंडी होत आहे. या बसथांब्यांजवळ आजूबाजूलाच प्रवासी व रिक्षांची गर्दी होते. काहीवेळाला रस्त्याच्या मध्यभागीच के.एम.टी. व एस. टी. थांबत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा होतो. या प्रकारामुळे वाहनधारक व एस.टी., केएमटी, रिक्षाचालकांच्यात नेहमीच वाद होत आहेत. बसथांबे सिग्नलपासून काही अंतर पुढे किंवा मागे हलवावेत, अशी वाहनधारकांमधून मागणी होत आहे.वादाचे प्रसंग...सिग्नलजवळ असलेल्या बसथांब्यांवर के.एम.टी., एस.टी., रिक्षा हे प्रवासी घेण्यासाठी थांबतात. मात्र, त्याचवेळी सिग्नल सुटल्याने प्रत्येक वाहनधारकांना पुढे जाण्याची गडबड असते. त्यामुळे हे बसथांबे आता वाहतुकीस अडथळा बनताहेत. त्यामध्ये दुसऱ्या बाजूचा सिग्नल सुटल्याने पुन्हा वाहतुकीची मोठी कोंडी होते. अनेकवेळा त्यामुळे वाहनधारकांमध्ये वाद होतात. तसेच प्रवासी के.एम.टी. किंवा एस.टी. बस पकडण्यासाठी गाडीमागे धावत असतात. यावेळी अपघात होण्याची शक्यता आहे.सिग्नलजवळ वाहतुकीस अडथळे होणारे के.एम.टी. व एस.टी.चे बसथांबे अन्यत्र स्थलांतरित करावे, असे पत्र वाहतूक शाखेच्यावतीने संबंधित विभागास दिले आहे. यासह काही ठिकाणी बसथांबे स्थलांतरित करणे शक्य नाही. त्या ठिकाणी एका बाजूला बस, के.एम.टी. थांबवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे.- अशोक धुमाळ, वाहतूक पोलीस निरीक्षक येथील बसथांबे हलविण्याची गरजशहरातील माळकर तिकटी, व्हीनस कॉर्नर, कावळा नाका, सायबर चौक, माऊली चौकजवळील सिग्नलजवळच के.एम.टी. बसथांबे आहेत. या ठिकाणी के.एम.टी.सह रिक्षा नेहमी लागलेल्या असतात. यासह टाऊन हॉल बागव लक्ष्मीपुरी कोंडा ओळ येथे एस.टी. बसेस थांबतात. या ठिकाणी असणारे प्रवासी थांबे हलविण्याची गरज आहे.