शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील जनसुनावणीत १५६ शेतकऱ्यांच्या हरकती

By संदीप आडनाईक | Updated: March 26, 2024 18:27 IST

एकाच वेळी उच्च न्यायालयात याचिका करा : न्या. नलवडे

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गात जमीन घरे खासगी मालमत्ता जाणाऱ्या अनेक बाधितांनी शाहू स्मारक भवनात झालेल्या जनसुनावणीमध्ये आपल्या अनेक समस्यांना वाचा फोडली. यावेळी १५६ शेतकऱ्यांनी आपल्या हरकती आणि कैफियती तोंडी आणि लेखी स्वरुपात समितीसमोर सादर केल्या. एकाच वेळी शेतकऱ्यांनी उठाव करुन लवकरात लवकर उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, मी त्यासाठी विनामूल्य सल्ला देईन असे आश्वासन उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश टी. व्ही. नलवडे यांनी दिले.

अखिल भारतीय किसान सभेने शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने मंगळवारी नलवडे यांच्या अध्यक्षतेखालील प्राचार्य टी. एस. पाटील आणि डॉ. बी. एम हिर्डेकर यांच्या त्रिसदस्यीय तज्ञ समितीपुढे ही जनसुनावणी घेण्यात आली. शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या हरकती, अडचणी, व्यथा एकत्रित करुन त्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. हा अहवाल अंतिम झाल्यावर प्रकाशित करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष उदय नारकर यांनी प्रास्तविक केले. ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर म्हणाले, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, गोवा याठिकाणी अनेक रस्ते झालेले आहेत, आता नव्या महामार्गाची आवश्यकता नाही. हा रस्तेप्रकल्प घातक आहे. शेती, पर्यावरण आणि जैवविविधता वाचवा असे आवाहन डॉ. बाचूळकर यांनी केले.

आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई,अंबरिश घाटगे यांनी या प्रकल्पाला आमचा विरोधच राहिल असे जाहीर केले. अतिग्रे येथील संजय सूर्यवंशी, जयसिंग मुसळे या शेतकऱ्यांनीही कैफियत मांडली. सीटूचे सचिव सुभाष जाधव, शिवाजी मगदूम, विक्रांत पाटील, योगेश कुळवमोडे आदींनीही विचार मांडले. अमोल नाईक यांनी आभार मानले.