शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

के.पीं.विरोधात मोट

By admin | Updated: August 13, 2014 23:32 IST

कॉँग्रेस कार्यकर्ते आक्रमक : विधानसभेत पराभव करण्याचा निर्धार

कोल्हापूर : राधानगरी, भुदरगड तालुक्यांत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आतापर्यंत ज्यांनी गाडण्याचे काम केले त्या आमदार के. पी. पाटील यांना आधी गाडण्याचे काम आपण सगळेजण मिळून करुया आणि नंतर कोण आमदार व्हायचे ते ठरवूया, असा पराकोटीचा निर्धार राधानगरी, भुदरगड तालुक्यांतील कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी आज, बुधवारी येथे झालेल्या मेळाव्यात केला. कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांच्या समोरील अडचणी आता आणखी बिकट झाल्या आहेत.  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका काय असावी, यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी राधानगरी, भुदरगड तालुक्यांतील कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आज, बुधवारी दुपारी गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील सभागृहात मेळावा आयोजित केला होता. मेळाव्याला दोन्ही तालुक्यांतून किमान अडीचशे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी दूध संघाचे संचालक अरुणकुमार डोंगळे यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला आणि कार्यकर्त्यांनी आपली भूमिका अगदी स्पष्टपणे मांडावी, अशी विनंती केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षावर घणाघाती टीका केली. गेल्या वीस वर्षांत राधानगरी, भुदरगड तालुक्यांतून कॉँग्रेस हद्दपार झाली असून, कार्यकर्ते मृतावस्थेत असल्यासारखी परिस्थिती आहे. कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळत प्रत्येकवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसला मदत करायची आणि निवडणुका जिंकल्या की कॉँग्रेस कार्यकर्त्यांना गाडायचे काम करायचे ही निती राष्ट्रवादीची राहिली आहे. त्यामुळे आता वेळ आलीच तर आधी त्यांना गाडण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करुया, अशा संतप्त भावना यावेळी व्यक्त झाल्या.राष्ट्रवादी हा आपला खरा शत्रू आहे. तरीही आम्ही के. पीं.ना विजयी करत आलो; पण त्यांनी आमची कामे केली नाहीत. यामुळे कॉँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होऊ लागले आहे. म्हणूनच त्यांची यापुढे फार भीडभाड ठेऊ नये. आपण सगळे आधी एक होऊन आपली एकी शेवटपर्यंत कायम ठेवली पाहिजे. राधानगरी तालुक्यातील पाच नेत्यांनी आधी एकत्र बसून पुढे कोणी निवडणूक लढवायची हे ठरवा. कार्यकर्ते त्या निर्णयावर ठाम राहून काम करतील, असा विश्वासही काहींनी दिला. मेळाव्याला तालुक्यातील कॉँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. अरुणकुमार डोंगळे, हिंदुराव चौगुले, उदयसिंह पाटील कौलवकर, पी. डी. धुंदरे, विजयसिंंह मोरे, नंदकुमार सूर्यवंशी, सदाशिव चरापले, अभिजित तायशेटे, नंदकिशोर सूर्यवंशी, सुभाष नाना पाटील, सुधाकर साळोखे, डी. एस. पाटील, जगदीश लिंग्रस, रमेश वारके, आदींनी मेळाव्याचे संयोजन केले होते.