शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

‘ओबीसीं’ना संसदेत बोलू दिले जात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:55 IST

वामन मेश्राम : भारत मुक्ती मोर्चाचे बारा बलुतेदार संमेलन

कोल्हापूर : ‘ओबीसी’ लोकप्रतिनिधींना आपल्या जातीच्या प्रश्नावर संसदेत बोलू दिले जात नाही, त्यांचे राजकीय पक्ष व व्यवस्था हे त्यांना करूदेत नाही, असा जोरदार आरोप भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे केला.‘भारत मुक्ती मोर्चा’तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या समारोप कार्यक्रमांतर्गत दसरा चौक मैदानावर बारा बलुतेदार जातींचे राज्यस्तरीय संमेलन आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण हेंद्रे, डॉ. सूरज पवार, डॉ. संदीप पाटील, अ‍ॅड. नीता मगदूम, बबन रानगे, बसवंत पाटील, केरबा सुतार, विश्वास सुतार, राजेंद्र ढवळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.वामन मेश्राम म्हणाले, बारा बलुतेदार फक्त महाराष्ट्रात नाही तर ते देशभरात ‘जजमानी’ या नावाने परिचित आहेत. या बलुतेदारांचे अशा स्वरूपाचे संमेलन भरविण्यामागील उद्देश म्हणजे या ८५ टक्केलोकांसाठी सोशल नेटवर्किंगचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून सहा हजार जातींच्या लोकांना जागे करण्याचे काम करणे, त्यानंतर त्यांना जोडणे, त्यांच्यात शक्ती निर्माण करणे, या शक्तींचा संचय करणे, या संचयित शक्तीचा प्रयोग व उपयोग करणे अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असणार आहे.ते पुढे म्हणाले, ओबीसी तसेच भटक्या विमुक्त जातींचे नेतृत्व करणाऱ्यांनाच संविधान नीट समजलेले नाही. कारण या जातींमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी या जातींच्या प्रश्नांवर संसदेत अथवा विधिमंडळात कधीही बोलताना दिसत नाहीत. जर ते बोलत नसतील तर ते या जातीचे प्रतिनिधी कसले? त्यांना काय चाटायचे आहे? तसेच ओबीसी जातीच्या लोकप्रतिनिधींना संसदेत बोलूही दिले जात नाही. त्यांना रोखले जाते. यामागे त्यांचा पक्ष व व्यवस्थेचा दबाव कारणीभूत असतो. बहुदा त्यांना संविधानाने दिलेल्या बोलण्याच्या मौलिक अधिकाराची जाणीव नसावी.डॉ. हेंद्रे म्हणाले, कठोर परिश्रम व शिक्षण याशिवाय आपल्याला पर्याय नाही; परंतु ते करणे आपल्या हातात आहे. बबन रानगे म्हणाले, बारा बलुतेदारांमध्ये नेतृत्व निर्माण करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी शैक्षणिक वसतिगृहे स्थापन केली. यावेळी विश्वास सुतार, बी. डी. सुतार, बसवंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)