शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

‘ओबीसीं’ना संसदेत बोलू दिले जात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:55 IST

वामन मेश्राम : भारत मुक्ती मोर्चाचे बारा बलुतेदार संमेलन

कोल्हापूर : ‘ओबीसी’ लोकप्रतिनिधींना आपल्या जातीच्या प्रश्नावर संसदेत बोलू दिले जात नाही, त्यांचे राजकीय पक्ष व व्यवस्था हे त्यांना करूदेत नाही, असा जोरदार आरोप भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे केला.‘भारत मुक्ती मोर्चा’तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या समारोप कार्यक्रमांतर्गत दसरा चौक मैदानावर बारा बलुतेदार जातींचे राज्यस्तरीय संमेलन आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण हेंद्रे, डॉ. सूरज पवार, डॉ. संदीप पाटील, अ‍ॅड. नीता मगदूम, बबन रानगे, बसवंत पाटील, केरबा सुतार, विश्वास सुतार, राजेंद्र ढवळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.वामन मेश्राम म्हणाले, बारा बलुतेदार फक्त महाराष्ट्रात नाही तर ते देशभरात ‘जजमानी’ या नावाने परिचित आहेत. या बलुतेदारांचे अशा स्वरूपाचे संमेलन भरविण्यामागील उद्देश म्हणजे या ८५ टक्केलोकांसाठी सोशल नेटवर्किंगचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून सहा हजार जातींच्या लोकांना जागे करण्याचे काम करणे, त्यानंतर त्यांना जोडणे, त्यांच्यात शक्ती निर्माण करणे, या शक्तींचा संचय करणे, या संचयित शक्तीचा प्रयोग व उपयोग करणे अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असणार आहे.ते पुढे म्हणाले, ओबीसी तसेच भटक्या विमुक्त जातींचे नेतृत्व करणाऱ्यांनाच संविधान नीट समजलेले नाही. कारण या जातींमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी या जातींच्या प्रश्नांवर संसदेत अथवा विधिमंडळात कधीही बोलताना दिसत नाहीत. जर ते बोलत नसतील तर ते या जातीचे प्रतिनिधी कसले? त्यांना काय चाटायचे आहे? तसेच ओबीसी जातीच्या लोकप्रतिनिधींना संसदेत बोलूही दिले जात नाही. त्यांना रोखले जाते. यामागे त्यांचा पक्ष व व्यवस्थेचा दबाव कारणीभूत असतो. बहुदा त्यांना संविधानाने दिलेल्या बोलण्याच्या मौलिक अधिकाराची जाणीव नसावी.डॉ. हेंद्रे म्हणाले, कठोर परिश्रम व शिक्षण याशिवाय आपल्याला पर्याय नाही; परंतु ते करणे आपल्या हातात आहे. बबन रानगे म्हणाले, बारा बलुतेदारांमध्ये नेतृत्व निर्माण करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी शैक्षणिक वसतिगृहे स्थापन केली. यावेळी विश्वास सुतार, बी. डी. सुतार, बसवंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)