शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

पोषण आहारात आता ‘स्नेहभोजन’

By admin | Updated: August 18, 2015 22:13 IST

शिक्षण विभागाचा उपक्रम : लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न

प्रकाश पाटील- कोपार्डे  -शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी व कुपोषण मुक्तता करण्यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली आहे. या योजनेत लोकसहभाग वाढवून ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ‘स्नेहभोजन’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम सुरू होणार आहे. शालेय पोषण आहार योजनेत समाजाचा सहभाग वाढविण्याच्या हेतूने विशेष दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना चांगला आहार देण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. आहारातील पौष्टिकता वाढविण्यास मदत होईल, विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण अन्नपदार्थांची चव चाखता यावी तसेच सामाजिक बंधुता, एकतेची भावना, सामाजिक बांधीलकी वाढण्यास मदत होईल. या अनुषंगाने लोकसहभागातून ‘स्नेहभोजन’ उपक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र, हा उपक्रम ऐच्छिक स्वरूपाचा राहणार आहे. यात मान्यवर व्यक्तींचे वाढदिवस, सुवर्णमहोत्सव, अमृतमहोत्सव, जन्मशताब्दी, लग्नसमारंभ, धार्मिक सप्ताह, राष्ट्रीय सण, स्थानिक पातळीवरील सण आदी बाबी या उपक्रमांतर्गत विशेष दिनाच्या औचित्यामध्ये समाविष्ट राहतील. स्नेहभोजनाचे आयोजन शाळेने करावयाचे आहे. त्यासाठी शाळेने वर्षभराचे नियोजन करावयाचे आहे. यामध्ये आवश्यक बदल करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस आहेत. त्यासाठी ग्रामसभा, शालेय व्यवस्थापन समितीची सभा, पालक सभेद्वारे जनजागृती करण्याचे काम करताना ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांना प्रक्रियेत सहभागी करून घ्यावयाचे आहे. ‘स्नेहभोजन’ उपक्रमांतर्गत कोणत्या तारखेस भोजन होणार व कोणत्या पदार्थाचा समावेश करणार याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व वितरकाने एकत्रित निर्णय घ्यायचा आहे. शाळेच्या कामकाजावर परिणाम नाहीस्नेहभोजन उपक्रमांतर्गत शाळांना रोख रक्कम न देता खाद्यपदार्थ किंवा इतर आवश्यक पदार्थ उदा. पाण्याचे पिंप, ग्लास, ताटे, चमचे, चटई, पाणी शुद्धिकरण यंत्रही देता येईल. खाद्यपदार्थ हे ताजे व पौष्टिक असावेत, तसेच ते मुलांना शाळेतच तेही भोजनाच्या वेळेतच देण्याची अट आहे. भोजनातून अनुचित प्रकार घडू नये याची जबाबदारी वितरकाची राहणार आहे. स्नेहभोजनाने शाळेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही याची काळजीही घेणे शाळांना बंधनकारक आहे.