शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पोषण आहाराला धान्यच मिळेना...

By admin | Updated: January 8, 2016 00:52 IST

दरवाढीचा फटका : शाळांचा पोषण आहार बंद

प्रकाश पाटील--कोपार्डे -योजना तशी चांगली, पण वेशीला टांगली हा अनुभव सध्या शालेय पोषण आहाराच्या बाबत पहायला मिळत आहे. शाळांना शालेय पोषण आहारासाठी देण्यात येणारे धान्य उपलब्ध न झाल्याने हा आहार शिजवण्याचा ठेका घेणाऱ्या महिला बचत गटांना पदरमोड करण्याची वेळ आली. मात्र, हे ओझे पेलवेनासे झाल्याने बचत गटांनीही आता मान टाकली आहे.जिल्हा परिषदांच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घट हा चिंतनाचा विषय आहे. त्याचबरोबर देशातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शाळेचा ओढा वाढावा याचबरोबर कुपोषित मुलांचे प्रमाण कमी व्हावे, हा उद्देश ठेवून राज्यशासनाद्वारे शालेय पोषण आहार ही योजना अंमलात आणली. यासाठी शासनाने कडक नियमावली तयार केली. मुलांना ठरलेल्या प्रमाणात व वेळेवर तो मिळालाच पाहिजे, अन्यथा यासाठी मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात आले. मुख्याध्यापकांनीही याबाबत थोडी नाकुशीने का असेना पण आदेशाचे पालन करण्यासाठी आहार शिजविण्याचा ठेका देण्यात आलेल्या महिला बचत गटाकडून तो योग्य प्रमाणात व वेळेत मिळावा यासाठी प्रयत्न केले. ही पोषण आहार योजना चांगली सुरू होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून धान्य पुरवठ्यांची अनियमितता सुरू आहे. उशिरा का असेना, पण धान्य मिळते व रोजगाराचे साधन बंद होऊ नये म्हणून बचतगट स्वत:च्या खर्चातून धान्य उपलब्ध करून देत होते. मात्र, गेली दोन महिने तो मिळालाच नसल्याने बचत गटांनीही तो देणे बंद केला आहे. धान्य पुरवण्याच्या ठेक्याची मुदत संपलीशालेय पोषण आहार पुरवण्यासाठी ज्या मार्केटिंग फेडरेशनला ठेका दिला होता त्याची मुदत डिसेंबर २०१५ ला संपली आहे. मात्र, शासनाने या ठेक्याची मुदत संपण्यापूर्वीच नवीन करार अथवा ठेकेदार नेमणे गरजेचे होते, परंतु त्यासाठी विलंब झाला. त्यामुळे धान्य मिळाले नसल्याचे सांगण्यात येते. वेळेत धान्य मागणी न केल्यास कारवाईशालेय पोषण आहाराबाबत शासनाने कडक नियमावली तयार केली आहे. धान्याची मागणी वेळेत करणे व योग्य प्रकारे पोषण आहार मुलांना मिळावा याची मुख्याध्यापकांवर जबाबदारी आहे. २० नोव्हेंबर २०१५ पूर्वीच मुख्याध्यापकांनी लागणाऱ्या पोषण आहाराची मागणी केल्याची माहिती आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एक मुख्याध्यापकाने सांगितले. तरीही तो मिळाला नाही. मग आता कारवाई कोणावर, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. दरवाढीचाही फटकापोषण आहारात तूरडाळीचा समावेश आहे. मात्र, सध्या तूरडाळ १८० ते २०० रुपयांवर पोहोचली आहे, तर शासन यासाठी ८७ रुपये प्रतिकिलो देते. मग तोट्यात धंदा कोण करणार असे म्हणत ठेकेदार वाटाणा व चवळी आमटीसाठी पुरवतात. मात्र, ही आमटी खाण्यायोग्य नसते. त्यामुळे मुले हे खात नाहीत.स्नेहभोजन योजनेबाबतही उदासीनतामुलांना सुग्रास जेवणाचा लाभ व्हावा म्हणून शासनाने स्नेहभोजनाची संकल्पना आणली. गावातील संस्था, राजकीय व्यक्ती यांच्या वाढदिवस कार्यक्रमानिमित्त भोजन व्यवस्था असेल तर त्या गावातील शाळेतील मुलांना हे जेवण मिळावे म्हणून शिक्षण समिती, मुख्याध्यापक व ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न व्हावेत. या निमित्ताने मुलांना सुग्रास जेवणाचा लाभ मिळेल, पण याबाबतही शाळा पातळीवर उदासीनता दिसते.