शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

हागणदारी मुक्तीत जिल्हा राज्यात नंबर एक

By admin | Updated: February 9, 2016 00:57 IST

\चार तालुके शंभर टक्के : संपूर्ण हागणदारी मुक्तीचे जिल्हा परिषदेचे नियोजन

कोल्हापूर : हागणदारीमुक्त ग्रामपंचायत अभियानात राज्यात कोल्हापूर जिल्हा नंबर एकवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील १०२९ पैकी ६१३ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. आता संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने व्यापक नियोजन केले आहे. दरम्यान, गगनबावडा, आजरा, पन्हाळा, भुदरगड हे चार तालुके शंभर टक्के हागणदारीमुक्त झाले आहेत.राज्य शासनाने पहिल्यांदा ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानानंतर आता हागणदारीमुक्त ग्रामपंचायत अभियान राबविले जात आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजनेतून जिल्ह्यात हागणदारीमुक्त अभियानाची सुरुवात १५ आॅगस्ट २०१५ पासून झाली आहे. गावात कोठेही मानवी विष्ठा दिसणार नाही, वैयक्तिक व सामूहिक ठिकाणी सुरक्षित तांत्रिक पर्यायांद्वारे विष्ठेची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे, स्थलांतरित कुटुंबांनाही शौचालयाची सुविधा असणे, किमान ९० टक्के कुटुंबांकडे शौचालय असणे, प्रत्येक व्यक्तीकडून शौचालयांचा वापर करणे, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, शाळा येथे चांगल्या स्थितीमध्ये शौचालय असणे, असे निकष हागणदारीमुक्त ग्रामपंचायतीसाठी आहेत. हे निकष पूर्ण केल्यानंतर ग्रामपंचायतीने स्वत:च गावसभेत हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करावयाची आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्णातील ६१३ ग्रामपंचायतींनी हागणदारीमुक्तीची घोषणा केली आहे. हागणदारीमुक्त ग्रामपंचायती करण्यात कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात नंबर वनवर पोहोचली आहे. आता संपूर्ण जिल्हाच हागणदारीमुक्त करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी ग्रामस्थ, जिल्हा परिषद पदाधिकारी यांचे सहकार्य मिळत आहे.- अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.पहिले पाच जिल्हे..राज्यातील हागणदारीमुक्त जिल्हे व कंसात ग्रामपंचायतींची संख्या अशी : कोल्हापूर (६१३), सातारा (६०४), सिंधुदुर्ग (४१९), रत्नागिरी (३७६), पुणे (२७४).