शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

जिल्ह्यात उद्योगांची संख्या पावणे तीन लाख

By admin | Updated: June 28, 2015 23:13 IST

सांख्यिकी विभागाचे सर्वेक्षण : शासनाकडे अहवाल सादर; सर्व्हेचे काम वाढल्याने विभागावर ताण--सांख्यिकी दिनानिमित्त

अंजर अथणीकर -सांगली --एका व्यक्तीपासून अगदी हजार लोकांना रोजगार देणाऱ्या छोट्या-मोठ्या उद्योगांची सर्वंकष गणना करण्याचे काम सांगली जिल्ह्यात पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणानुसार सांगली जिल्ह्यात २0१५ मध्ये सुमारे २ लाख ७0 हजार उद्योगांची नोंद झाली आहे. हा अहवाल नुकताच सादर झाला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सांगली जिल्ह्यातील उद्योगांची गणना करण्याचे काम सांख्यिकी विभागाला देण्यात आले होते. पापड उद्योगापासून ते मोठ्या साखर कारखान्यापर्यंत सर्व प्रकारच्या उद्योगांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या उद्योगांची आर्थिक स्थिती, त्यांना लागणाऱ्या सुविधा, किती रोजगार यावर अवलंबून आहेत, याचा अहवाल नुकताच या विभागाने केंद्र शासनाकडे सादर केला आहे. या सर्व्हेचा अहवाल गोपनीय असल्यामुळे तो उघड करण्याचा अधिकार सांख्यिकी विभागाला नाही. यावर आता केंद्र शासनच निर्णय घेणार आहे. या अहवालावरच आता जिल्ह्यातील उद्योगांचे आगामी धोरण ठरणार आहे. जनतेच्या विकासासाठी शासन विविध उपक्रम राबवत असते; मात्र याचा मूळ पाया असलेला सांख्यिकी विभाग दुर्लक्षित राहत आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय, साक्षरता, कामगार, मजुरी, रोजगार आदी सर्व प्रकारचे सर्व्हे तर या विभागाकडे नेहमीचेच असतात. आता नव्याने यामध्ये काही सर्वेक्षणांची भर पडत चालली आहे. यामुळे हा विभाग आता संपूर्ण वर्षभर कामाच्या ओझ्याखाली राहत आहे. त्याचबरोबर या विभागाने नुकतेच जिल्ह्यातील शेततळ्यांचे मूल्यमापन केले आहे. या शेततळ्यांमुळे होत असलेला विकास, त्यांची गरज आदींची माहिती यामध्ये आहे. हा अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. या अहवालावरच आता आगामी अनुदान व नियोजनाची दिशा ठरणार आहे. आता नुकताच शासकीय व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा सर्व्हे करण्याचा आदेश या विभागाला प्राप्त झाला आहे. या सर्व्हेमध्ये कर्मचाऱ्यांची आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती, निवासस्थाने, मुलांची शैक्षणिक परिस्थिती याचा सर्वंकष विचार यामध्ये केला जाणार आहे. हा अहवाल सादर करण्यास सहा महिन्यांचा अवधी सांख्यिकी विभागाला देण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या वेतन आयोगाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबरोबरच कामगार, मजूर, शेतकरी, उद्योग, साक्षरता, शिक्षण आदीचा सर्व्हे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे काम या विभागाला कायमस्वरुपी देण्यात आले आहे. सांख्यिकी दिनानिमित्त सोमवारी कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या विभागाकडून उद्योगाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आता शासकीय कर्मचाऱ्यांचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. विविध शासकीय कार्यालयांच्या मदतीनेच आम्ही आमचा सर्व्हे पूर्ण करून ज्या-त्या शासनाला आमचा अहवाल सादर करतो. या अहवालावरच शासन निर्णय घेत असते.- ग. स. धनवडे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी विभाग दुर्लक्षितचकेंद्र व राज्य शासनाला महत्त्वपूर्ण माहिती पुरवणारा व ज्याच्या अहवालावर भविष्यातील शासनाचे नियोजन ठरत असते, तो विभाग मात्र दुर्लक्षित राहत आहे. सांगली जिल्हा सांख्यिकी कार्यालयाला बारा कर्मचारी मंजूर असताना, आठच कर्मचारी काम करीत आहेत. चार जागा गेल्या दोन वर्षांपासून रिक्तच आहेत. या विभागाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतानाही, अनेक सुविधा या कार्यालयाला नाहीत.