शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कोरोना रुग्णसंख्या आली दहा हजारांच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:18 IST

कोल्हापूर : गेल्या वीस दिवसात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार १५ ...

कोल्हापूर : गेल्या वीस दिवसात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार १५ वरून ९ हजार २४१ पर्यंत खाली आल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु मृत्युदर खाली येत नसल्याने प्रशासनाची ही चिंता अजूनही कायम आहे.

मे २०२१ मध्ये एका महिन्यात तब्बल ५० हजारांहून अधिक नागरिक कोरोना पाॅझिटिव्ह आले होते. हा महिना घातक महिना ठरला होता. त्यानंतरही जून महिन्यात सुरुवातीपासूनच रुग्णसंख्या वाढतीच राहिली आहे. मृत्यू पावलेल्यांचीही संख्या अपवादात्मक दिवस सोडले तर ३०च्या वरच राहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आठ दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी चाचण्या वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. निर्बंध आणखी कडक करा, असेही सांगितले होते. त्यानुसार चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या ही कमी येत नसल्याने एक दिलासादायक परिस्थिती दिसून येत आहे. यात सातत्य राहिल्यास पुढील महिन्यात कोरोनाचे रुग्ण आणखी मोठ्या प्रमाणावर कमी आल्याचे चित्र पहावयास मिळू शकते.

३१ मे २०२१ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात १६ हजार ०१५ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत होते. परंतु त्यानंतर किमान दहा दिवस नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत गेल्याने सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात ९ हजार २४१ रुग्ण सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले. ३ जूनला कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा १९.२३ टक्के इतका होता. तो. १८ जून रोजी १०.९ टक्के इतका कमी झाला आहे. सोमवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासात हा दर १०.५३ इतका नोंदवण्यात आला आहे.

एकूणच गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्हिटी दर कमी येत असल्याचे चित्र आहे. १ जून ते १६ जून या सोळा दिवसात कोरोना पॉझिटिव्हिटी तर हा १२ टक्क्यांपेक्षा कधीच कमी आला नव्हता. मात्र आता गेले तीन दिवस हाच दर ११ टक्क्यांहून खाली आला आहे.

चौकट

दिनांक चाचण्या पॉझिटिव्ह टक्केवारी

१५ जून ७९२७ ११८१ १४.९

१६ जून ८७४५ १४१७ १६.२

१७ जून ९०६१ ११६४ १२.८५

१८ जून ९४६४ १०३२ १०.९

१९ जून ९६७३ १०४१ १०,७६

चौकट

दिनांक कोरोना मृत्यू

१५ जून २८

१६ जून ३४

१७ जून ३९

१८ जून ३४

१९ जून ३७

२० जून ३६

२१ जून ३३

चौकट

नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

ही संख्या जरी कमी येत असली तरी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. प्रशासनाने नियम शिथिल केले आहेत याचा अर्थ सरसकट कुणीही, कुठेही, कितीही वेळ फिरावे असा होत नाही. मास्कच्या बाबतीतही हलगर्जीपणा दिसून येत आहे. अनेकजण लावायचा म्हणून मास्क लावतात. हे घातक आहे. त्यामुळे प्रशासन एकीकडे त्यांचे काम करत असताना नागरिकांनीही तितकीच दक्षता घेण्याची गरज आहे.

चौकट

दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान.....असे नको

राजकीय नेते मंडळी एकीकडे सर्व नियम पाळा म्हणून सांगतात आणि दुसरीकडे त्यांनीच आयोजित केलेले कार्यक्रम टीकेचे विषय ठरत आहेत. त्यामुळे जनतेला आपण काही सूचना पाळायला सांगत असताना त्या आपल्यालाही लागू होतात याचेही भान सर्वांनी ठेवायला हवे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात पुन्हा नियम कडक करावे लागतील, असा इशारा दिला होता आणि तिकडे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालय उद्घाटनाला हजारो कार्यकर्त्यांनी अशी गर्दी केली की त्यातून अजित पवार यांना वाटही काढताना दमछाक झाली. या विरोधाभासाची चर्चा सुरू आहे.