शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सुन्न आणि अस्वस्थ भोवताल

By admin | Updated: February 17, 2015 00:06 IST

सिटी टॉक--

एखादी सकाळ प्रसन्नपणे उगवते पण क्षणात काहीतरी होतं आणि ती सकाळ अस्वस्थ वर्तमानाची जाणीव करून देते. कुणीतरी असंख्य सुयांनी टोचून-टोचून घायाळ करत राहतं. कालही असंच झालं. पानसरे सरांवरील हल्ल्याची बातमी आली आणि सुन्न व्हायला झालं. एका आठवड्यापूर्वीचं चिंचवडच्या साहित्य संमेलनातले त्यांचे भाषण आठवले. महात्मा गांधीजींच्या हत्येचा निषेध करताना पानसरे सरांनी तिथे काढलेल्या महात्मा गांधीजींच्या रांगोळीचा संदर्भ देत नथुराम गोडसेच्या रांगोळ्या घालण्याची वेळ येऊ नये, अशी इच्छा व्यक्त केली. ते सारंचं आठवत राहिलं...तेव्हाच आठवली अशीच एक रात्र तेवीस-चोवीस वर्षांपूर्वीची...२१ मे १९९१... मी एकटीच रात्री अभ्यास करत बसले होते...गेट वाजलं म्हणून मी खिडकीतून पाहिलं तर कुणीतरी बाबांना हाक मारत होतं. ‘आॅफिसातून आलोय...सरांना उठवा...’ मी लाईट लावला आणि बाबांना उठवलं.. दोघेजण बाबांच्या आॅफिसातील पत्रकार होते...‘साहेब, बातमी वाईट आहे..श्रीपेरूंबद्दूर येथे राजीव गांधींची हत्या झाली आहे...’ अरे काय सांगतोस..? ‘बाबा मटकन खालीच बसले. दादा, आई दोघेही तोवर जागे झाले होते...त्याकाळी आजच्यासारखे फोन, ब्रेकिंग न्यूज काहीच नव्हते...क्षणात वडील सावरले. आईने आणून दिलेले पाणी प्यायले आणि कपडे घालून तयार झाले. ‘तुम्ही निघा, मी येतोच..’ म्हणत त्यांनी दादाला गाडी काढायला सांगितली. आईला आणि मला सावधगिरीच्या सूचना देऊन ते आॅफिसला गेले. बाबा नागपुरातील एका अग्रणी वृत्तपत्राचे संपादक असल्यामुळे त्यांचे काम आता सुरू होणार होते...सगळा मजकूर बदलून टाकून पुन्हा नव्याने लिहिणे भाग होते. अग्रलेख, पहिलं पान...आजच्यासारखे संगणकावर मजकूर लिहिला जात नव्हता, हाताने सर्व लिहावे लागायचे...बाबांना यायला पहाट झाली...आणि थोड्याच वेळात दारात वृत्तपत्रही हजर झालं...ती सगळी सकाळ उदासवाणी गेली...भारताच्या राजकीय पटलावरचं एक उमदं नेतृत्व अतिरेक्यांच्या हल्ल्यात नाहीसं झालं होतं...वातावरणात एक अस्वस्थ करणारी शांतता होती...लोकांच्या मनात काहीच वर्षांपूर्वी झालेल्या इंदिराजींच्या हत्येवेळी देश हळहळला होता...इंदिराजींचं पार्थिव लोकांनी दूरदर्शनवर पाहिलं होतं, पण राजीव गांधींच्या मारेकऱ्यांनी एक क्रूर खेळी खेळली होती...नेत्याच्या मृत्यूनंतर त्याचा चेहरा पाहून नेत्यांचे चाहते स्फूर्ती घेतात, लोकांच्या आठवणीत तोच चेहरा राहतो. पण राजीव गांधींचा चेहरा बॉम्बने उद्ध्वस्त केला होता. त्यामुळे लोकांना त्यांच्या पार्थिवाचे दर्शन नाही घेता आले....त्यांच्या मुलांना आणि पत्नीला कदाचित सगळ्यात याच गोष्टीचे दु:ख झाले असेल...आपल्या मृत वडिलांचा चेहराही शेवटी पाहता येऊ नये यासारखे दु:ख ते कोणते...समाज ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांच्या शब्दाला मानतो आणि ज्यांच्या विचारांवर आयुष्याची दिशा बदलतो त्या माणसांची काही लोकांना अडचण होते...अशा लोकांना विचारांनी थोपवता येत नसले की त्यांची हत्या होते. सॉक्रिटिस, येशू ख्रिस्त, संत तुकाराम महाराज, महात्मा गांधी, जॉन एफ. केनेडी ही यादी बरीच मोठी आहे, त्यात भरच पडत राहणार आहे, अशी भीती दाटून येऊ लागली आहे...विचारवंत, कलाकार, चित्रकार, लेखक, लोकनेते यांचा विचारांनी मुकाबला होणार की त्यांना अतिरेकी विचारांच्या, भ्याड राक्षसाच्या पिस्तुलातील गोळ्यांचा बळी व्हावे लागेल हाच येणाऱ्या काळातील महत्त्वाचा मुद्दा असेल. जगातले वातावरण बदलते, कुण्या मलालावर हल्ला झाला की आपण हळहळतो, पण ही गोष्ट आपल्या आसपास घडते तेव्हा आपली झोप उडते, तरीही काही लोक याचा आपल्याशी काही संबंध नसल्यासारखे वागतात. उच्चभ्रू वस्त्यांमध्ये तर आपल्याला काय करायचे, अशी मानसिकता दिसते, तरीही सर्वांनाच या असंवेदनशीलतेचे चटके सोसावे लागतात. रस्त्यात एखादा माणूस अपघात होऊन जखमी झालेला दिसत असेल तर आपण ‘बघ्याची भूमिका’ घेतो आणि आॅफिसला उशीर होतो म्हणून गाडीचा वेग वाढवतो. शेजारच्या घरातून स्त्रीच्या रडण्याचा आवाज येत असेल, तर आपण आपल्या टीव्हीचा आवाज मोठा करतो आणि हा त्यांचा घरचा मामला आहे म्हणून कान झाकून घेतो. भोवताल असा असंवेदनशील असताना काही माणसे उगाच जगाची काळजी करतात, लोकांना चांगल्या-वाईटमधील फरक समजावू इच्छितात. हीच सहृदयी, वेगळी माणसे स्वत:साठी काट्यांची वाट निवडतात...पानसरे सर त्यातलेच एक...! या क्षणी त्यांच्यासाठी सगळेजण प्रार्थना करूया..आपल्याला जगण्याचा नवा अर्थ उमगतो का पाहूया.... - प्रिया दंडगे