शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
6
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
7
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
8
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
9
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
10
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
11
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
12
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
13
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
14
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
15
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
16
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
17
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
18
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
19
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
20
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख

आता लक्ष्य निवडणूक तारखेकडे

By admin | Updated: May 29, 2015 00:06 IST

३३ पैकी १७ गावांत महिला सरपंच म्हणून विराजमान होणार आहेत. सरपंचपदाच्या आरक्षणानंतर आता इच्छुकांचे लक्ष निवडणूक कार्यक्रमाकडे

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला व पुरूष सरपंचपद आरक्षण निश्चित झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. ३३ पैकी १७ गावांत महिला सरपंच म्हणून विराजमान होणार आहेत. सरपंचपदाच्या आरक्षणानंतर आता इच्छुकांचे लक्ष निवडणूक कार्यक्रमाकडे लागले आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोणत्याही दिवशी लागतील, हे गृहीत धरून तालुक्यात उमेदवारांच्या चाचपणीबरोबरच गटातटाची फेर जुळवाजुळव सुरू झाली आहे. आॅक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची किनार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कितपत दिसून येणार का, हा चर्चेचा विषय बनला आहे. गोकुळ व केडीसीसी निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकारण चांगलेच तापणार आहे. केंद्र व राज्य पातळीवर भाजप व शिवसेना एकत्र आले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींत दोन्ही पक्षांची ताकद वाढविण्यासाठी या पक्षातील नेते व पदाधिकारी कशी व्यूहरचना आखतात हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. यात कॉँग्रेस, राष्ट्रवादीपक्षांतर्गत असणारे सा. रे. पाटील गट, यड्रावकर गट, माने गट, आवाडे गट तसेच शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी व स्वाभिमानी यांची याची राजकीय रणनीती कशी ठरणार याबाबतही उत्सुकता आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थानिक गट पातळीवर होत असतात. मात्र, शिरोळ तालुक्यातील राजकारण अतिशय संवेदनशील बनले असल्याने तालुका पातळीवरील नेते या निवडणुकीत नक्कीच लक्ष घालतील असेच चित्र आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे कोणत्याही दिवशी निवडणुका जाहीर होतील, असे गृहीत धरून तालुक्यातील ३३ गावांत राजकीय हलचाली गतिमान झाल्या आहेत. प्रभागात सक्षम उमेदवार देण्याबरोबरच सत्ता कशी काबीज करता येईल, यासाठी गुप्त बैठकांना जोर आला आहे. ५० टक्के महिलांचा समावेश असल्याने महिला राज सर्वच गावांत दिसून येणार आहे. कोणत्याही दिवशी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांनी लागणारी कागदपत्रांची जमाजमव करण्यास सुरूवात केलेली आहे. उमेदवारीसाठी इच्छुक असणारी मंडळी गटनेत्यांचे हुंबरे झिजवत आहेत. एकूणच ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच वाजू लागले आहेत.निवडणूक होणाऱ्या ३३ पैकी १७ महिला वर्गाकडे सरपंचपद निश्चित झाले आहे. आरक्षण सोडतीमुळे या गावातील इच्छुक पुरूष उमेदवारांची मोठी निराशा झाली. असे असले तरी आपल्या सौभाग्यवतींना या निवडणुकीत उतरविण्यासाठी पतीराजाकडून आत्तापासून फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. सरपंचपद आरक्षण निश्चितीमुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकिय ईर्षा पेटणार आहे. (प्रतिनिधी)३३ ग्रामपंचायतींची निवडणूकसरपंच पदाची लॉटरी फुटल्यानंतर निवडणुकीच्या आचार संहितेकडे ३३ गावांचे लक्ष्य लागून राहिले आहे. आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये या ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार आहेत. जुलै महिन्यात निवडणुका जाहीर होतील, असेही संकेत मिळत आहेत. यामुळे ती शक्यता गृहीत धरून प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.