शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष्य निवडणूक तारखेकडे

By admin | Updated: May 29, 2015 00:06 IST

३३ पैकी १७ गावांत महिला सरपंच म्हणून विराजमान होणार आहेत. सरपंचपदाच्या आरक्षणानंतर आता इच्छुकांचे लक्ष निवडणूक कार्यक्रमाकडे

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला व पुरूष सरपंचपद आरक्षण निश्चित झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. ३३ पैकी १७ गावांत महिला सरपंच म्हणून विराजमान होणार आहेत. सरपंचपदाच्या आरक्षणानंतर आता इच्छुकांचे लक्ष निवडणूक कार्यक्रमाकडे लागले आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोणत्याही दिवशी लागतील, हे गृहीत धरून तालुक्यात उमेदवारांच्या चाचपणीबरोबरच गटातटाची फेर जुळवाजुळव सुरू झाली आहे. आॅक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची किनार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कितपत दिसून येणार का, हा चर्चेचा विषय बनला आहे. गोकुळ व केडीसीसी निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकारण चांगलेच तापणार आहे. केंद्र व राज्य पातळीवर भाजप व शिवसेना एकत्र आले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींत दोन्ही पक्षांची ताकद वाढविण्यासाठी या पक्षातील नेते व पदाधिकारी कशी व्यूहरचना आखतात हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. यात कॉँग्रेस, राष्ट्रवादीपक्षांतर्गत असणारे सा. रे. पाटील गट, यड्रावकर गट, माने गट, आवाडे गट तसेच शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी व स्वाभिमानी यांची याची राजकीय रणनीती कशी ठरणार याबाबतही उत्सुकता आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थानिक गट पातळीवर होत असतात. मात्र, शिरोळ तालुक्यातील राजकारण अतिशय संवेदनशील बनले असल्याने तालुका पातळीवरील नेते या निवडणुकीत नक्कीच लक्ष घालतील असेच चित्र आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे कोणत्याही दिवशी निवडणुका जाहीर होतील, असे गृहीत धरून तालुक्यातील ३३ गावांत राजकीय हलचाली गतिमान झाल्या आहेत. प्रभागात सक्षम उमेदवार देण्याबरोबरच सत्ता कशी काबीज करता येईल, यासाठी गुप्त बैठकांना जोर आला आहे. ५० टक्के महिलांचा समावेश असल्याने महिला राज सर्वच गावांत दिसून येणार आहे. कोणत्याही दिवशी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांनी लागणारी कागदपत्रांची जमाजमव करण्यास सुरूवात केलेली आहे. उमेदवारीसाठी इच्छुक असणारी मंडळी गटनेत्यांचे हुंबरे झिजवत आहेत. एकूणच ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच वाजू लागले आहेत.निवडणूक होणाऱ्या ३३ पैकी १७ महिला वर्गाकडे सरपंचपद निश्चित झाले आहे. आरक्षण सोडतीमुळे या गावातील इच्छुक पुरूष उमेदवारांची मोठी निराशा झाली. असे असले तरी आपल्या सौभाग्यवतींना या निवडणुकीत उतरविण्यासाठी पतीराजाकडून आत्तापासून फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. सरपंचपद आरक्षण निश्चितीमुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकिय ईर्षा पेटणार आहे. (प्रतिनिधी)३३ ग्रामपंचायतींची निवडणूकसरपंच पदाची लॉटरी फुटल्यानंतर निवडणुकीच्या आचार संहितेकडे ३३ गावांचे लक्ष्य लागून राहिले आहे. आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये या ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार आहेत. जुलै महिन्यात निवडणुका जाहीर होतील, असेही संकेत मिळत आहेत. यामुळे ती शक्यता गृहीत धरून प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.