शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता दोन लाखांची जोखीम

By admin | Updated: March 20, 2017 00:56 IST

‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना’ : तब्बल ११०० आजारांचा समावेश

गणेश शिंदे -- कोल्हापूर---राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे लवकरच ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य’ असे नामकरण होणार असून, या नवीन योजनेत राज्य सरकार दोन लाखांपर्यंतची जोखीम घेणार आहे. या नवीन योजनेत तब्बल ११०० आजारांचा समावेश केला असून, तालुकास्तरावरील खासगी रुग्णालयांनाही यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात घसघशीत १३१६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.तत्कालीन काँग्रेस आघाडी राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी पहिल्या टप्प्यात आठ, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्णांत ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. कोल्हापूर जिल्ह्णात दुसऱ्या टप्प्यात म्हणजे २१ नोव्हेंबर २०१३ रोजी ही योजना सुरू झाली. या योजनेत सध्या जिल्ह्णातील ३२ रुग्णालयांचा समावेश आहे. त्यासाठी ३० बेड व अतिदक्षता विभागाचा निकष आहे. राज्य सरकार पूर्वी या योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये साडेआठशे कोटी रुपयांची तरतूद करीत होेते. मात्र, आता ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य’ या नवीन योजनेत ती वाढविण्यात आली. ती ४६६ कोटी रुपयांनी वाढविली आहे. याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. सध्याच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेत एका रेशनकार्डधारकामागे नॅशनल इन्श्युरन्स कंपनीला ३३३ रुपये मिळत आहेत. तसेच ९७१ आजार व दीड लाख रुपयांचे विमा संरक्षण पॅकेज, किडनी प्रत्यारोपणासाठी अडीच लाख रुपये व काही आजारांचे पॅकेजीस कमी आहेत. दरम्यान, भाजप-शिवसेना सरकारने या राजीव गांधी योजनेचे नाव बदलण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेतला. मात्र, प्रीमियम कंपनीचा करार, विमा हप्त्याचा गोंधळ अशा विविध तांत्रिक कारणांमुळे हे नामकरण लांबणीवर पडले. साधारणत: आता तीन-चार महिन्यांत नवीन योजना कार्यान्वित होणार असून, तिचा लाभ रुग्णांना होणार आहे.ही योजना खऱ्या अर्थाने गोरगरिबांच्या दृष्टीने आधारवड ठरत असल्याने सरकारनेही याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १३१६ कोटींची तरतूद करून योजना अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे.- डॉ. अशोक देठे, जिल्हा समन्वयक, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, कोल्हापूर. तात्पुरती मुदतवाढ...विमा कंपनीला पूर्वी प्रत्येक रेशनकार्डधारकामागे सरकारकडून ३३३ रुपये मिळत होते. पण, २० नोव्हेंबर २०१६ रोजी विमा कंपनीचा करार संपला आहे. त्यामुळे सरकारने या विमा कंपनीला तात्पुरती मुदतवाढ दिली आहे. या कंपनीला आता ३३३ रुपयांवरून ५०१ रुपये मिळत आहेत. नवीन योजना झाल्यास हे फायदे मिळणार...दीड लाखाचे विमा संरक्षण दोन लाखांवर किडनी प्रत्यारोपणाचे पॅकेज अडीच लाखांऐवजी साडेतीन लाख रुपये ९७१ आजारांची संख्या वाढवून ती ११०० होणार