शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

आता पुढची ‘झेप’ स्थानिक निवडणुकांत

By admin | Updated: May 26, 2015 00:48 IST

भाजपचे अधिवेशन : कोल्हापूर महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष्य

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने प्रदेश कार्यकारिणी बैठक व राज्य परिषदेसाठी कोल्हापूर शहर निवडून साखरपट्ट्यात मुसंडी मारण्याची तयारी केली आहे. ही परिषद यशस्वी झाल्याने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला आहे. त्यातून त्यांना ऊर्जा मिळाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याला विशेष महत्त्व आहे.केंद्र व राज्यातील पक्षाच्या यशानंतर पहिली प्रदेश कार्यकारिणीची बैठक थेट पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरात घेऊन भाजपने सहकार पट्ट्यात शिरकाव करण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. तीन दिवसांत पक्षाची ध्येय-धोरणे, पक्षावर जनतेने टाकलेला विश्वास, पक्षाची झालेली अभूतपूर्व सदस्य नोंदणी, भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारने केलेली जनताभिमुख कामे व विविध निर्णय तळागाळांत पोहोचविण्याची कार्यकर्त्यांची जबाबदारी आदी विषयांवर ऊहापोह करण्यात आला. त्यामुळे राज्यभरातून आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते रिचार्ज झालेच त्याचबरोबर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्येही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषदेसह इतर निवडणुकांसाठी त्याचा कितपत लाभ उठविता येईल हे पाहावे लागणार आहे. शहरी भागात पक्षासाठी चांगले आणि पोषक वातावरण आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत त्याचा फायदा होऊ शकतो, परंतु ग्रामीण भागात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापुरात अलहिदा पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचे मोठे जाळे आहे. साखर कारखाने, दूध संघ, जिल्हा बँक यासह गावपातळीवरील सेवा संस्था, दूध संस्थांच्या माध्यमातून असलेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामीण भागातील प्रभाव नाकारून चालणार नाही. तो पक्षासाठी निश्चित आव्हानात्मक असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींसह सहकारी संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना चांगलाच कस लागणार आहे.त्याचबरोबर केंद्रातील मोदी सरकारने एक वर्षभरात केलेली कामे व राज्यातील फडणवीस यांच्या सरकारने सहा महिन्यांत केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा शिवधनुष्यही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदींनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या खांद्यावर दिला आहे. प्रत्येक घराघरांत हे काम पोहोचविताना चांगलीच दमछाक होणार आहे. कारण भाजपच्या क्रियाशील कार्यकर्त्यांचे जाळे कमी आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात सुमारे पावणेदोन लाख सभासदपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘सशक्त भारत’ करण्यासाठी सदस्यता नोंदणीत भाजप हा जगातील एक क्रमांकाचा पक्ष झाला आहे. राज्यातही १ कोटी नोंदणी व जिल्ह्यात सुमारे पावणे दोन लाख सभासद झाले आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचून पक्ष धोरण व सरकारचे काम सांगण्याचे जबाबदारी आता कार्यकर्त्यांवर आली आहे.शिवसेनेला डिवचण्याचे कारण काय?एका बाजूला मुंबई महापालिकेसह सर्वच ठिकाणी शिवसेनेबरोबर युती करण्याची भूमिका घेत असताना दुसऱ्या बाजूला प्रदेश कार्यकारिणीच्या निमित्ताने भाजपने शिवसेनेला डिवचले आहे. त्यामागे नेमके कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.