शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

आता हयातीच्या दाखल्यासाठी ‘केवायसी’ अनिवार्य ठरणार

By admin | Updated: November 26, 2014 00:33 IST

महा-ई सेवा केंद्र : सेवानिवृत्तांना निवृत्ती मानधन

रत्नागिरी : सेवानिवृत्तांना निवृत्ती मानधन घेण्यासाठी बँकांकडून हयातीचा दाखला घ्यावा लागतो. मात्र, आता या हयातीच्या दाखल्यासाठी ई केवायसी अनिवार्य केली जाणार आहे. त्यामुळे ही सुविधा लवकरच महा-ई सेवाकेंद्रांमधून सुरू होणार आहे. मात्र, यासाठी आधारकार्ड अनिवार्य ठरणार आहे. सर्व शासकीय, निमशासकीय सेवानिवृत्तांना निवृत्तिवेतनासाठी बँकांकडून हयातीचा दाखला द्यावा लागतो. मात्र, आता हा दाखला मिळण्यासाठीही केवायसी अनिवार्य करण्यात येणार आहे. केवायसी असेल तरच बँकांकडून हयातीचा दाखला दिला जाणार आहे. यासाठी आधारकार्डही अनिवार्य आहे.आधारकार्ड असेल तरच केवायसी केली जाणार आहे. ही केवायसी आधार क्रमांकासोबत बँकांशी संलग्न केल्यानंतरच सेवानिवृत्तांना बँक हयातीचा दाखला देणार आहे. त्यामुळे आता हयातीचा दाखला ज्यांच्याकडे केवायसी असणार आहे, अशांनाच मिळणार आहे. त्यामुळे अशा सेवानिवृत्तांसाठी महा ई केंद्रातून ई केवायसी सुविधा पुरविली जाणार आहे. ई केवायसी आधार क्रमांकासोबत बॅँकांशी संलग्न केल्यानंतर त्यांना हयातीचा दाखला लगेचच मिळू शकेल.सेवानिवृत्तांसाठी हयातीच्या दाखल्यासोबत केवायसी अर्ज मागवण्यात आले आहेत.रत्नागिरीतही महा ई सेवा केंद्रांकडून ही सुविधा पुरविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून आधारकार्डचे काम करणाऱ्या स्पॅन्को कंपनीच्या माध्यमातून या कंपनीच्या अखत्यारितील सुमारे महा ई सेवा केंद्रांमधून ई केवायसी सुविधा आठवडाभरात सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)