शहरं
Join us  
Trending Stories
1
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
2
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
3
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

कारागृहांत आता कायद्याचे दवाखाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:23 IST

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकलेल्या कैद्यांची प्रकरणे लवकर निकाली निघावीत, व्यक्ती गुन्हेगार असेल ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकलेल्या कैद्यांची प्रकरणे लवकर निकाली निघावीत, व्यक्ती गुन्हेगार असेल तर शिक्षा आणि निर्दोष असेल तर गजाआडच्या जगातून लवकर मुक्तता व्हावी यासाठी राज्यातील कारागृहांमध्ये जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणच्यावतीने कारागृहात विधि सेवा संरक्षण व आधार केंद्र म्हणजेच कायद्याचे दवाखाने सुरू होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पिटीशन नंबर ४१६/१३ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार हे दवाखाना सुरू होत आहेत.शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. याचे कारण हेच असते की, एकदा प्रकरण न्यायालयात गेले की वर्षानुवर्षे न्यायालयाच्या चकरा मारण्यापलीकडे हाती काही पडत नाही. आजोबाने न्यायासाठी केलेल्या दाव्याचा निकाल नातू म्हातारा झाल्यावर लागतो, असे उपहासाने म्हटले जाते. न्याय उशिरा मिळणे किंवा वर्षानुवर्षे प्रकरण तिष्ठत राहणे ही देखील अन्यायाचीच एक बाजू असते. काहीवेळा कैदी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असतो, तर काही प्रकरणात व्यक्ती गुन्हेगार असली तरी वर्षानुवर्षे निकालच लागत नाही.कारागृहातील वास्तव्यादरम्यान अनेक कैदी आजारी पडतात, काहीजणांना हृदयविकाराचा तीव्र झटका येतो. अशा वेळी त्यांना कारागृहातून दवाखान्यात आणेपर्यंत मोठा कालावधी जातो, त्यामुळे कैदी दगावतो. आजारी पडताच कैद्यावर प्रथमोपचार व्हावे यासाठी कारागृहात स्वतंत्र वॉर्डची गरज आहे. त्यामुळे प्राधिकरणच्यावतीने कळंबा कारागृहात कायद्याचा दवाखाना सुरू करण्यात येत आहे.कळंबा कारागृहात मंगळवारी उद्घाटनकोल्हापूर जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणच्यावतीने कळंबा कारागृहात विधि सेवा संरक्षण व आधार केंद्र म्हणजेच कायद्याचा दवाखाना सुरू करण्यात येत आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते दि. २१ रोजी याचे उद्घाटन होत आहे. त्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. येथील कैद्यांनाच विधि सेवक, स्वयंसेवक म्हणून तयार करण्यात येत आहे, तर कायदा आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची टीम येथे काम करणार आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यातील कैद्यांची माहिती घेणे, चौकशीसह विविध प्रक्रिया पूर्ण करणे, न्यायालयात केस लवकर सुरू व्हावी, तारखा न पडता लवकर निकाल लागावा यासाठी ही टीम काम करेल. व्यक्ती निर्दोष असेल तर त्यांची लवकर सुटका होईल आणि दोषी असेल तर शिक्षा सुनावली जाईल; पण प्रकरण रेंगाळत पडणार नाही ही यामागील संकल्पना आहे.