शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहांत आता कायद्याचे दवाखाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:23 IST

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकलेल्या कैद्यांची प्रकरणे लवकर निकाली निघावीत, व्यक्ती गुन्हेगार असेल ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकलेल्या कैद्यांची प्रकरणे लवकर निकाली निघावीत, व्यक्ती गुन्हेगार असेल तर शिक्षा आणि निर्दोष असेल तर गजाआडच्या जगातून लवकर मुक्तता व्हावी यासाठी राज्यातील कारागृहांमध्ये जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणच्यावतीने कारागृहात विधि सेवा संरक्षण व आधार केंद्र म्हणजेच कायद्याचे दवाखाने सुरू होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पिटीशन नंबर ४१६/१३ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार हे दवाखाना सुरू होत आहेत.शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. याचे कारण हेच असते की, एकदा प्रकरण न्यायालयात गेले की वर्षानुवर्षे न्यायालयाच्या चकरा मारण्यापलीकडे हाती काही पडत नाही. आजोबाने न्यायासाठी केलेल्या दाव्याचा निकाल नातू म्हातारा झाल्यावर लागतो, असे उपहासाने म्हटले जाते. न्याय उशिरा मिळणे किंवा वर्षानुवर्षे प्रकरण तिष्ठत राहणे ही देखील अन्यायाचीच एक बाजू असते. काहीवेळा कैदी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असतो, तर काही प्रकरणात व्यक्ती गुन्हेगार असली तरी वर्षानुवर्षे निकालच लागत नाही.कारागृहातील वास्तव्यादरम्यान अनेक कैदी आजारी पडतात, काहीजणांना हृदयविकाराचा तीव्र झटका येतो. अशा वेळी त्यांना कारागृहातून दवाखान्यात आणेपर्यंत मोठा कालावधी जातो, त्यामुळे कैदी दगावतो. आजारी पडताच कैद्यावर प्रथमोपचार व्हावे यासाठी कारागृहात स्वतंत्र वॉर्डची गरज आहे. त्यामुळे प्राधिकरणच्यावतीने कळंबा कारागृहात कायद्याचा दवाखाना सुरू करण्यात येत आहे.कळंबा कारागृहात मंगळवारी उद्घाटनकोल्हापूर जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणच्यावतीने कळंबा कारागृहात विधि सेवा संरक्षण व आधार केंद्र म्हणजेच कायद्याचा दवाखाना सुरू करण्यात येत आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते दि. २१ रोजी याचे उद्घाटन होत आहे. त्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. येथील कैद्यांनाच विधि सेवक, स्वयंसेवक म्हणून तयार करण्यात येत आहे, तर कायदा आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची टीम येथे काम करणार आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यातील कैद्यांची माहिती घेणे, चौकशीसह विविध प्रक्रिया पूर्ण करणे, न्यायालयात केस लवकर सुरू व्हावी, तारखा न पडता लवकर निकाल लागावा यासाठी ही टीम काम करेल. व्यक्ती निर्दोष असेल तर त्यांची लवकर सुटका होईल आणि दोषी असेल तर शिक्षा सुनावली जाईल; पण प्रकरण रेंगाळत पडणार नाही ही यामागील संकल्पना आहे.