शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहांत आता कायद्याचे दवाखाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:23 IST

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकलेल्या कैद्यांची प्रकरणे लवकर निकाली निघावीत, व्यक्ती गुन्हेगार असेल ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकलेल्या कैद्यांची प्रकरणे लवकर निकाली निघावीत, व्यक्ती गुन्हेगार असेल तर शिक्षा आणि निर्दोष असेल तर गजाआडच्या जगातून लवकर मुक्तता व्हावी यासाठी राज्यातील कारागृहांमध्ये जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणच्यावतीने कारागृहात विधि सेवा संरक्षण व आधार केंद्र म्हणजेच कायद्याचे दवाखाने सुरू होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पिटीशन नंबर ४१६/१३ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार हे दवाखाना सुरू होत आहेत.शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. याचे कारण हेच असते की, एकदा प्रकरण न्यायालयात गेले की वर्षानुवर्षे न्यायालयाच्या चकरा मारण्यापलीकडे हाती काही पडत नाही. आजोबाने न्यायासाठी केलेल्या दाव्याचा निकाल नातू म्हातारा झाल्यावर लागतो, असे उपहासाने म्हटले जाते. न्याय उशिरा मिळणे किंवा वर्षानुवर्षे प्रकरण तिष्ठत राहणे ही देखील अन्यायाचीच एक बाजू असते. काहीवेळा कैदी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असतो, तर काही प्रकरणात व्यक्ती गुन्हेगार असली तरी वर्षानुवर्षे निकालच लागत नाही.कारागृहातील वास्तव्यादरम्यान अनेक कैदी आजारी पडतात, काहीजणांना हृदयविकाराचा तीव्र झटका येतो. अशा वेळी त्यांना कारागृहातून दवाखान्यात आणेपर्यंत मोठा कालावधी जातो, त्यामुळे कैदी दगावतो. आजारी पडताच कैद्यावर प्रथमोपचार व्हावे यासाठी कारागृहात स्वतंत्र वॉर्डची गरज आहे. त्यामुळे प्राधिकरणच्यावतीने कळंबा कारागृहात कायद्याचा दवाखाना सुरू करण्यात येत आहे.कळंबा कारागृहात मंगळवारी उद्घाटनकोल्हापूर जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणच्यावतीने कळंबा कारागृहात विधि सेवा संरक्षण व आधार केंद्र म्हणजेच कायद्याचा दवाखाना सुरू करण्यात येत आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते दि. २१ रोजी याचे उद्घाटन होत आहे. त्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. येथील कैद्यांनाच विधि सेवक, स्वयंसेवक म्हणून तयार करण्यात येत आहे, तर कायदा आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची टीम येथे काम करणार आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यातील कैद्यांची माहिती घेणे, चौकशीसह विविध प्रक्रिया पूर्ण करणे, न्यायालयात केस लवकर सुरू व्हावी, तारखा न पडता लवकर निकाल लागावा यासाठी ही टीम काम करेल. व्यक्ती निर्दोष असेल तर त्यांची लवकर सुटका होईल आणि दोषी असेल तर शिक्षा सुनावली जाईल; पण प्रकरण रेंगाळत पडणार नाही ही यामागील संकल्पना आहे.