शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

आता शंभर पटास मुख्याध्यापक मिळणार

By admin | Updated: August 31, 2015 00:17 IST

अतिरिक्त शिक्षक प्रमाण कमी होणार

कोल्हापूर : राज्यातील उच्च प्राथमिक शाळांना २८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार आता शंभर पटास मुख्याध्यापकपद मंजूर होणार आहे. या शासन निर्णयात पटाचे निकष बदलल्यामुळे राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण कमी होऊन नवीन भरती करावी लागणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील व सरचिटणीस विजय भोगेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.बालकाचा शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ नुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांना १५० पटास आणि सहावी ते आठवीच्या वर्गांना शंभर पटास मुख्याध्यापकपद अनुज्ञेय आहे. मात्र, इयत्ता पहिली ते सातवी अथवा पहिली ते आठवीच्या संयुक्तीकरीत्या पटसंख्या शंभरच्या वर असेल तर, मुख्याध्यापक पद द्यावे की देऊ नये याबाबत स्पष्ट निर्देश नव्हते. इयत्ता सहावी ते आठवीला शंभर पटास मुख्याध्यापक पद अनुज्ञेय असेल तर, इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांनाही शंभर पटाच्या वर मुख्याध्यापकपद मिळालेच पाहिजे, याबाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण सचिव नंदकुमार, प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्याकडे गेल्या दीड वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. शासन निर्णयानुसार पहिली ते पाचवीच्या वर्गांना ६० पर्यंत दोन व त्यापुढील प्रत्येक ३० पटास एक शिक्षक व सहावी ते आठवीच्या वर्गांना ३५ ला एक शिक्षक मिळणार आहे, तसेच मुख्याध्यापकपद कमी करताना दहा टक्के पटाची सवलत दिली आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक व मुख्याध्यापकांचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत फार कमी होणार असून, उलट राज्यात सुमारे १५ ते २० हजार शिक्षक पदे निर्माण होणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष पाटील, सरचिटणीस भोगेकर यांनी पत्रकाद्वारे दिली. (प्रतिनिधी)शासन निर्णयानुसार पहिलीते पाचवीच्या वर्गांना६० पर्यंत दोनत्यापुढील प्रत्येक ३० पटास एक शिक्षक व सहावी ते आठवीच्या वर्गांना ३५ ला एक शिक्षक मिळणार