शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आता हातोडाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:22 IST

कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील अवैध बांधकामांवर कारवाईला दिलेली स्थगिती राज्य सरकारने मागे घेतली आहे शिवाय महापालिका प्रशासनाने योग्य व कायदेशीर पद्धतीने संबंधित बांधकामधारकांवर कारवाई सुरू केली असल्याने यासंदर्भात वेगळे काही आदेश देण्याची गरज नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने महापालिकेला या अवैध बांधकामांवर कारवाई करण्याची वाट मोकळी करून दिली. गुरुवारी ...

कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील अवैध बांधकामांवर कारवाईला दिलेली स्थगिती राज्य सरकारने मागे घेतली आहे शिवाय महापालिका प्रशासनाने योग्य व कायदेशीर पद्धतीने संबंधित बांधकामधारकांवर कारवाई सुरू केली असल्याने यासंदर्भात वेगळे काही आदेश देण्याची गरज नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने महापालिकेला या अवैध बांधकामांवर कारवाई करण्याची वाट मोकळी करून दिली. गुरुवारी सुनावणीवेळी राज्य सरकारने स्थगिती आदेश मागे घेत असल्याचे सांगितल्यामुळे दाखल झालेली याचिकाही न्यायालयाने निकाली काढली.तावडे हॉटेल परिसरातील अवैध बांधकामांवर कारवाईची तयारी महापालिका प्रशासनाने केल्यानंतर राज्य सरकारने या कारवाईला स्थगिती दिली होती. त्याच्या विरोधात येथील भरत सोनवणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती आदेश उठवावा आणि महापालिका प्रशासनाने कारवाई पूर्ण करावी, अशी मागणी केली होती. त्यावर न्या. अभय ओक व न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अवघ्या दोन आठवड्यांत या याचिकेचा निकाल लागला.बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने स्थगिती संदर्भातील सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते तसेच स्थगिती आदेश सरकार रद्द करणार की न्यायालयाने करावेत, अशा शब्दांत दम दिला होता. गुरुवारी दुपारनंतर झालेल्या सुनावणीवेळी सरकारी वकील निखिल साखरदांडे यांनी सरकार स्थगिती आदेश मागे घेत असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले तसेच महानगरपालिकेला योग्य व कायदेशीर आदेश देण्याची सूचना करावी, अशी विनंती केली. त्यावेळी महानगरपालिकेने योग्य व कायदेशीर कारवाई यापूर्वीच सुरू केली आहे. त्यात आम्ही काही वेगळे आदेश देण्याची आवश्यकता नाही. जर सरकारने स्थगिती आदेश रद्द केला नसता तर आम्हाला हस्तक्षेप करावा लागला असता, असे न्यायालयाने सांगितले.याचिकाकर्ते भरत सोनवणे यांच्यावतीने न्यायालयात अ‍ॅड. भूषण मंडलिक यांनी काम पाहिले. मंडलिक यांनी अनेक महत्त्वाची कागदपत्रे सादर करून नेमक्या शब्दांत युक्तिवाद करून सरकारची मनमानी न्यायालयासमोर आणली.३६ बांधकामे पाडावी लागणारराज्य सरकारने स्थगिती आदेश मागे घेतला असल्याने तसेच उच्च न्यायालयाने कारवाई करण्यासंदर्भात वेगळे आदेश देण्याची आवश्यकता नाही, असा शेरा मारल्यामुळे आता गांधीनगर रस्त्यावरील अवैध बांधकामे तोडण्यास महानगरपालिकेला कोणतीच आडकाठी राहिलेली नाही. सन २०१४ पूर्वीच्या बांधकामधारकांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी १० आठवड्यांची मुदत देण्यात आली असली तरी सन २०१४ नंतरच्या बांधकामांवर कारवाई करता येणार आहे. सन २०१४ नंतर २५ अवैध बांधकामे झाली आहेत तसेच आरक्षित जागेवर ११ बांधकामे झाली आहेत अशी एकूण ३६ बांधकामे तोडण्याकरिता नव्याने तयारी करावी लागेल.कोण आहेत सोनवणे, अ‍ॅड. मंडलिक ?उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे भरत सोनवणे हे विचारेमाळ येथील असून ते राष्टÑवादी पक्षाचे सदस्य आहेत. नगरसेविका सूरमंजिरी लाटकर यांची प्रभागातील महानगरपालिकेशी संबंधित सर्व कामे पाहतात. तर अ‍ॅड.भूषण मंडलिक यांनी योग्य व मजबूत पुराव्यांसह राज्य सरकारने दिलेला स्थगिती आदेश कसा चुकीचा आहे हे न्यायालयासमोर मांडले. अ‍ॅड. मंडलिक हे संभाजीनगर येथील रहिवाशी असून गेल्या चार वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत आहेत. अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक यांचे ते सुपुत्र आहेत.दोन सर्वसामान्य व्यक्तींनी सरकारला माघार घ्यायला भाग पाडले, अशीच भावना कोल्हापूरकरांची झाली आहे.