शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

मुंबईतील बैठकीकडे आता सर्वांच्या नजरा

By admin | Updated: August 28, 2016 00:43 IST

दोन पर्याय सरकारसमोर

कोल्हापूर : हद्दवाढ समर्थक आणि विरोधक आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक झाले असताना आणि दोन्हीही गट आपल्या मागणीवर ठाम असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंगळवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून निर्णयाबाबत उत्कंठाही लागली आहे. दरम्यान, तांत्रिक कारण देत हद्दवाढीचा निर्णय प्रलंबित ठेवणे किंवा शहरालगतची आठ ते दहा गावे देऊन हद्दवाढ जाहीर करणे, असे दोन पर्याय सरकारसमोर असल्याचे सांगण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पहिल्यापासूनच सकारात्मक आहेत. वेळोवेळी त्यांनी शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच महानगरपालिकेकडून सुधारित प्रस्ताव मागविणे, दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या समितीकडून अहवाल मागवून घेणे, हद्दवाढ समर्थक व विरोधक यांच्याशी चर्चा करणे आणि तज्ज्ञांशी व्यक्तीश: भेटून चर्चा करणे, आदी मुद्द्यांवरून मुख्यमंत्री व पालकमंत्री सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे; परंतु तरीही सरकारने एकतर्फी निर्णय घेण्याचे टाळले आहे. मुंबईत १ आॅगस्ट रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हद्दवाढीचा निर्णय कोणावर लादणार नाही, तो सर्वमताने घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. तेव्हापासून दोघांनीही आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक व आमदार सुजित मिणचेकर यांच्याशी वेगवेगळ्या पातळीवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. हद्दवाढीच्या मुद्द्यावर दोन्ही गटांनी एक-एक पाऊल मागे येऊन समजूतदारपणाने तडजोड स्वीकारावी, अशी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांची भूमिका आहे. मुळात फडणवीस व पाटील हे दोघेही वादग्रस्त निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. एकमत करूनच निर्णय घ्यावा या विचारात आहेत. मंगळवारी मुंबईत पुन्हा दोन्ही गटांशी एकत्र चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केली आहे. त्यामागचा हेतूसुद्धा हाच आहे. त्यामुळे मंगळवारच्या बैठकीत निर्णय झालाच, तर एकमताने केला जाऊ शकतो. अशी आहेत गावे... १) सरनोबतवाडी २) मुडशिंगी ३) गोकुळ शिरगाव ४) नागाव ५) पाचगाव ६) मोरेवाडी ७) उजळाईवाडी ८) नवे बालिंगे ९) कळंबे तर्फ ठाणे १०) उचगाव १२) वाडीपीर १३) वडणगे १४) शिये १५) शिंगणापूर १६) नागदेववाडी १७) वळिवडे १८) गांधीनगर. शिरोली एमआयडीसी व गोकुळ शिरगाव एमआयडीसीचाही नव्या हद्दवाढीत समावेश व्हावा, असा महापालिकेचा आग्रह आहे. मंगळवारी काय होऊ शकते? मंगळवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत समर्थक आणि विरोधक यांना तडजोड स्वीकारण्याबाबत आग्रह धरला जाऊ शकतो. करवीर आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील गावे हद्दवाढीच्या प्रस्तावातून वगळून कोल्हापूर दक्षिणमधील गावांचा समावेश करून हद्दवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. साधारणपणे आठ ते दहा गावांचा त्यामध्ये समावेश केला जाऊ शकतो. या गावांच्या विकासासाठी जादा निधी देण्याची हमी राज्य सरकार देऊ शकते. जर एकमत झालेच नाही, तर मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे तांत्रिक कारण देत हा निर्णय प्रलंबित ठेवला जाऊ शकतो.