शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

आता केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांनाही जून महिन्यात सवलतीच्या दरात रास्त भाव धान्य दुकानातून धान्य मिळणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांनाही जून महिन्यात सवलतीच्या दरात रास्त भाव धान्य दुकानातून धान्य मिळणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ११ लाख लोकांना होणार आहे. हे धान्य मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्या नागरिकांना प्राधान्य या पद्धतीने त्याचे वाटप होणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट नसलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात सवलतीच्या दरात अन्नधान्य देण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. याचा अध्यादेश मंगळवारी प्रसिद्ध झाला आहे. गेल्यावर्षी केशरी कार्डधारकांना मे ते ऑगस्ट २०२० या चार महिन्यांच्या कालावधीत प्रतिव्यक्ती ३ किलो गहू (८ रुपये किलो) व २ किलो तांदूळ (१२ रुपये किलो) याप्रमाणे ५ किलो धान्य देण्यात आले होते. या योजनेअंतर्गत धान्याचे वितरण करूनदेखील मोठ्या प्रमाणात धान्य शिल्लक राहिले आहे. त्यामुळे त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी शासनाकडे या धान्याचे वितरण करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली होती. त्यानुसार शासनाने हा अध्यादेश काढला आहे. हे धान्य मर्यादित प्रमाणात असल्याने जे कार्डधारक आधी येतील त्यांना त्याचे वितरण केले जाईल.

--

जिल्ह्यात ५२६ टन धान्य शिल्लक

या योजनेअंतर्गत गेल्यावर्षी धान्याचे वितरण केल्यानंतरदेखील जिल्हयात २१२.२२० टन तांदूळ व ३१४.६८० टन गहू शिल्लक राहिले आहे. हे धान्य आता माणशी एक किलो याप्रमाणे सवलतीच्या दरात केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे. गेल्यावर्षी या योजनेला शहरातून खूप कमी प्रतिसाद मिळाला होता, यंदादेखील शहरातून धान्य खरेदी झाली नाही तर ग्रामीण भागात त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

---

काय मिळणार

१ किलो गहू (८ रुपये किलो)

१ किलो तांदूळ (१२ रुपये किलो)

--

केशरीच्या कुटुंबांना मिळणार लाभ

जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकाधारकांची २ लाख ७९ हजार ४२६ इतकी आहे. या योजनेचा लाभ या शिधापत्रिकांवरील ११ लाख ११ हजार ०६४ इतक्या लोकांना मिळणार आहे.

---

बीपीएलच्या साडेपाच लाख कुटुंबांना लाभ

कोरोना व लॉकडाऊनमुळे राज्य शासनाने मे महिन्याचे व केंद्र शासनाने मे व जून अशा दोन महिन्यांचे धान्य मोफत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप सुरू असून त्याचा लाभ जिल्ह्यातील ५ लाख ६५ हजार २३८ कुटुंबांना झाला आहे.

--

जिल्ह्यातील एकूण कार्डधारक

बीपीएल : ५३ हजार २२१

अंत्योदय : ५ लाख १२ हजार ०१७

केशरी : २ लाख ७९ हजार ४२६

---

गेल्यावर्षी जाहीर झालेल्या या योजनेअंतर्गत गहू व तांदूळ शिल्लक राहिले होते. अनेकजणांनी धान्य नेले नाही, त्यामुळे या उरलेल्या धान्याचे वितरण करण्याची परवानगी आम्ही मागितली होती. या धान्याचा साठा तुलनेने कमी असल्याने प्रथम येणाऱ्या केशरी शिधापत्रिकाधारक नागरिकांना त्याचे वितरण केले जाईल.

दत्तात्रय कवितके (जिल्हा पुरवठा अधिकारी)

--

फोटो नं २८०५२०२१-कोल-रेशन गर्दी

ओळ : कोल्हापुरातील रेशन दुकानांसमोर धान्य नेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. (छाया : नसीर अत्तार)

--