शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
2
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
3
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
4
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
6
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
7
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
8
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
9
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
10
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
11
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
12
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
13
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
14
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
15
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
16
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
17
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
18
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
19
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
20
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर मिळणार आता पिकाचा अंदाज

By admin | Updated: May 28, 2017 01:17 IST

शिवाजी विद्यापीठात ‘अ‍ॅप’ विकसित : बी.टेकच्या विद्यार्थ्यांचे संशोधन; शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येणार

तानाजी पवार । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय गाजत आहे. शेतातून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले आहे; पण भविष्यात कोणते पीक घ्यावयाचे याचा अंदाज आला तर शेतकऱ्यांचे भविष्यातील नुकसानही मोठ्या प्रमाणात टाळता येणे शक्य आहे. त्याप्रमाणे शिवाजी विद्यापीठातील ‘बी.टेक’च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’ विकसित केले आहे. याद्वारे हवामान, पाणी, माती आणि पावसाचे प्रमाण याचा विचार करून पुढील सहा महिन्यांत कोणते पीक घेता येईल हे शेतकऱ्यांना ठरविता येणार आहे. राज्यात शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागल्याने त्यांची आर्थिक कचाट्यातून मुक्ती न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्येचे लोण दिवसेंदिवस वाढतच आहेत, त्यामुळे कर्जमुक्ती करा म्हणून अनेक नेत्यांचा नारा सुरू आहे; पण शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पीक नुकसानीवर उपाययोजना काढल्यास कर्जमाफीची गरजच भासणार नाही, तसा प्रयत्न शिवाजी विद्यापीठातील ‘बी. टेक’च्या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यांनी ‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’ तयार करून अडचणीतील शेतकऱ्यांना एक दिलासा दिला जाणार आहे. अ‍ॅपमुळे शेतकऱ्याला आपल्या परिसरातील लागवड केलेल्या विविध पिकांची आवश्यक आणि मूलभूत माहिती पुरवून त्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल. मातीची गरज, लागवडीची प्रक्रिया, हवामानातील गरज, पिके, रोग व कीड, खते आणि कीटकनाशके याविषयी या अ‍ॅपद्वारे माहिती शेतकऱ्यांना देता येणे सोपे होणार आहे. विशिष्ट पिकांसाठी किती क्षेत्र लागवड करायचे हे तो शेतकरी ठरवू शकतो, या अ‍ॅपद्वारे पिकांचे नियोजन करता येते, त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या संकटांना सामोरे जावे लागणार नाही. बाजारपेठेची माहिती मिळणारशेतकऱ्यांना विविध पिकांच्या बाजारातील किमतीची आवश्यक आणि मूलभूत माहिती पुरवून त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होणार आहे. अ‍ॅपवरील माहितीमुळे शेतकऱ्यांला पेरणी करणाऱ्या पिकांची निवड करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला अधिक नफा मिळेल, अशाप्रकारे शेतकऱ्यांना जीवनशैली सुधारण्यास मदत होईल. या ‘अ‍ॅप’वरील नकाशाच्या मदतीने शेतकऱ्याला आपले उत्पादन विक्रीसाठी नजीकची बाजारपेठ शोधण्यास मदत होणार आहे.सरकारी योजनांचीही अद्ययावत माहितीया अ‍ॅपद्वारे आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे ध्येय, अद्ययावत माहिती पुरवून शेतीमालामध्ये पारदर्शकता वाढविता येते. कृषी संबंधित कोणतीही योजना सरकार सुरू करत असल्यास त्याची अद्यायावत माहिती या अ‍ॅपद्वारे शेतकऱ्याला पुरवली जाणार आहे तसेच नवीन खते किंवा पीक रोगाबाबत माहिती पुरवली जाणार आहे.शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने हे ‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’ विकसित केले आहे. त्याबाबत अनेक शेतकऱ्यांशी चर्चा करून हे अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप येत्या पंधरा दिवसांत ‘गुगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध होईल. - प्रसन्न करमरकर, सहायक प्राध्यापक, संगणक शास्त्र विभाग‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’साठी या विद्यार्थ्यांचे योगदान‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’ विकसित करण्यासाठी सहायक प्राध्यापक प्रसन्न करमरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, तर त्यासाठी शिवाजी विद्यापीठ ‘बी.टेक’च्या अंतिम वर्षातील विवेक कुरूवडे (रा. खांबित, ता. आस्ती, जि. वर्धा), कोमल हाबीवंत (रा. विटा, ता. खानापूर, जि. सांगली), श्रद्धा निंबाळकर (सातारा), शीतल कुलकर्णी (रा. हिंगणगड, ता. खानापूर, जि. सांगली), शहदमनी मोमीन (रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.