शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

आता ‘सीएचबी’धारकांचा एल्गार : एप्रिलअखेर डेडलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:53 IST

कोल्हापूर : सहायक प्राध्यापकांच्या रिक्त पदांच्या भरतीबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील नेट, सेट आणि पीएच.डी. धारक मुंबईमध्ये धरणे आंदोलनाच्या माध्यमातून लढा देणार आहेत.

संतोष मिठारी ।कोल्हापूर : सहायक प्राध्यापकांच्या रिक्त पदांच्या भरतीबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील नेट, सेट आणि पीएच.डी. धारक मुंबईमध्ये धरणे आंदोलनाच्या माध्यमातून लढा देणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे आंदोलन करण्याची तयारी नवप्राध्यापक पदभरती आंदोलन कृती समितीद्वारे सुरू आहे.याबाबत आंदोलन कृती समितीचे समन्वयक संदीप पाथ्रीकर यांनी सांगितले की, सरकारने सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीवर बंदी घातल्याने सीएचबीधारकांचे मोठे नुकसान होत आहे.

सरकारने पदभरती सुरू करावी, अन्यथा आम्हाला आत्महत्या करायला परवानगी द्यावी, अशी मागणी सीएचबीधारकांकडून होत आहे. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, वित्तमंत्री, आदींना पदभरती बंदी उठविण्याबाबत अनेक निवेदने दिली आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांना पुन्हा निवेदन दिले आहे. त्यावर सकारात्मक कार्यवाही होणे अपेक्षित आहे. याबाबत एप्रिल अखेरपर्यंत आम्ही प्रतीक्षा करणार आहोत. अन्यथा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील सीएचबीधारक धरणे आंदोलन करणार आहेत. सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन भरतीबाबत सकारात्मक कार्यवाही करावी.

बार्शी येथील उमेश शिंदे म्हणाले, उच्चशिक्षण घेऊन पीएच.डी.धारक, सेट-नेट उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींना सी.एच.बी.धारक म्हणून तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. आर्थिक स्थैर्य नसल्याने आणि भरती बंदी असल्याने एकप्रकारे या सी.एच.बी.धारकांची मानसिक आत्महत्या होत आहे. त्याची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन भरतीची प्रक्रिया सुरू करावी.

कोल्हापूरचे मकरंद ऐतवडे यांनी सांगितले की, सहायक प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती त्वरित होणे आवश्यक आहे. सध्या एक-दोन महाविद्यालयांत सीएचबीवर काम करूनदेखील नेट-सेट, पीएचडीधारकांच्या हातात तुटपुंजे मानधन पडत आहे. भरतीची प्रक्रिया सुरू होईपर्यंत या सीएचबीधारकांना एका महाविद्यालयासाठी निश्चिती करून २५ हजार वेतन द्यावे. (समाप्त)आंदोलनस्थळी वडापाव, पकोडे विकणारनांदेड येथील डॉ. परमेश्वर पोळ यांनी सांगितले की, भरती बंदी उठवावी. सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे भरावीत आणि नवीन पदे निर्माण करावीत, आदी विविध मागण्यांसाठी मुंबई येथे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनस्थळी पात्रताधारक हे वडापाव, पकोडा विक्री स्टॉल लावणार आहेत. यासाठी राज्यातील पीएच.डी.धारक, नेट-सेट उत्तीर्ण पात्रताधारकांना संघटित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ' 

नेट-सेट परीक्षांमधील उत्तीर्णतेची टक्केवारी वाढली आहे. सध्या टक्केवारी सहा इतकी आहे. सहायक प्राध्यापकपदासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत दर सहा महिन्यांनी वाढ होत आहे. त्यातच भरतीबंदी असल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे. भरतीवरील बंदी उठविणे आवश्यक आहे.- अश्विनी पाटील, कोल्हापूर