शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

वीज पडून मृत्यू पावलेल्यांचा वारसांना मिळणार आता केंद्रातून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 19:37 IST

वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना आता थेट केंद्र सरकारकडून मदत मिळणार आहे. अशाप्रकारे वीज पडून होणाºया मृत्यूचा समावेश राज्य आपत्तीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे वारसांना मिळणारी ४ लाखांची मदत आता थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे. याबाबत महाराष्टÑ शासनाने निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देराज्य आपत्तीच्या यादीत समावेश

प्रवीण देसाई

कोेल्हापूर : वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना आता थेट केंद्र सरकारकडून मदत मिळणार आहे. अशाप्रकारे वीज पडून होणाºया मृत्यूचा समावेश राज्य आपत्तीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे वारसांना मिळणारी ४ लाखांची मदत आता थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे. याबाबत महाराष्टÑ शासनाने निर्णय घेतला आहे.

गेल्या काही वर्षांपासून राज्यात मान्सून कालावधीमध्ये मृत्युमुखी पडणाºया लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. बहुतांशी लोक हे वीज पडून मृत्युमुखी पडले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार वीज पडून होणाºया मृत्यूचा समावेश नैसर्गिक आपत्तींच्या यादीत नसल्याने संबंधितांच्या वारसांना मदत देता येत नव्हती.

केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीबाबत केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या यादीत ज्या आपत्तींच्या यादीत समावेश नाही, परंतु राज्यांना त्या आपत्तीस वारंवार तोंड द्यावे लागते त्या आपत्तीस ‘राज्य आपत्ती’ घोषित करावी. त्यानंतर नैसर्गिक आपत्तीच्या निकषांनुसार देय असलेली मदत आपत्तीग्रस्तांना तसेच मृतांच्या नातेवाईकांना देणे बांधील राहील, अशी शिफारस केली होती.

त्यानुसार वीज पडून होणाºया मृत्यूचा राज्य आपत्तीत समावेश करण्याची मान्यता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दि. ३१ मे २०१७ रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून राज्य शासनाने या आपत्तीचा राज्य आपत्तीच्या यादीत समावेश केला आहे. दि. ४ आॅक्टोबरला तसा शासननिर्णय काढण्यात आला आहे. त्यामुळे आता संबंधितांच्या वारसांना थेट केंद्र सरकारकडूनच मदत मिळणार आहे.

सध्या वीज पडून मृत झालेल्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून ४ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जात होती; परंतु या निर्णयामुळे ही मदत आता थेट केंद्र सरकारकडून संबंधितांच्या वारसांना मिळणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अशी मिळणार मदत

  1.  वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ४ लाख रुपये
  2.  ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ५९ हजार १०० रुपये
  3. ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असल्यास २ लाख रुपये
  4.  एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी रुग्णालयात दाखल असल्यास ४ हजार ३०० रुपये
  5.  एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी रुग्णालयात दाखल असल्यास १२ हजार ७०० रुपये