शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आबा-आप्पांनंतर आता भाऊंची मोर्चेबांधणी

By admin | Updated: June 4, 2014 00:00 IST

शाहूवाडीचे रणांगण : महायुतीच्या उमेदवारीसाठी चढाओढ

राजाराम लोंढे, कोल्हापूर पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढविण्यासाठी सत्यजित पाटील (आबा), भारत पाटील (आप्पा) यांनी पेरणी सुरू केली आहे. त्यात कॉँग्रेसचे अमरसिंह पाटील (भाऊ) यांनी चाचपणी सुरू केल्याने आगामी काळात या मतदारसंघात बहुरंगी लढत पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होण्यासाठी या तिघांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. अमरसिंह पाटील यांचेही शिवसेनेकडूनच उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न आहेत. पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघाने आजपर्यंत संमिश्र कौल दिला आहे. या मतदारसंघात सध्या सत्यजित पाटील, कर्णसिंह गायकवाड, मानसिंगराव गायकवाड, आमदार कोरे, माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे गट कार्यरत आहेत. आमदार कोरे यांनी विकासकामांच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला आहे. सत्यजित पाटील यांनी ‘गोकुळ’ व पंचायत समिती, तर कर्णसिंह गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपर्क ठेवला आहे. मानसिंगराव गायकवाडही आता सक्रिय झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील सर्वच गट कॉँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या पाठीशी राहिले होते. तरीही खासदार राजू शेट्टी यांनी एकाकी झुंज देत सर्व नेत्यांना चारीमुंड्या चीत केले. दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांनी आमदार कोरे यांच्यापासून फारकत घेत खासदार शेट्टी यांच्याबरोबरची सलगी वाढवली आहे. त्यांनी व त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांनी पन्हाळा तालुक्यात महिला संघटन केले आहे. त्याचबरोबर कॉँग्रेसचे अमरसिंह पाटील यांनीही शड्डू ठोकला आहे. दरम्यान दोनवेळा पराभव झालेल्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी अगोदरच घेतला आहे. त्यामुळे कॉँग्रेसमधून कर्णसिंह गायकवाड यांच्याऐवजी जिल्हा परिषदेचे सदस्य योगीराज गायकवाड यांना प्रमोट केले जाऊ शकते. शेट्टी यांच्या ‘शब्दा’ला महत्त्व... अमरसिंह पाटील यांनीही काँग्रेसवर अन्याय केल्याची तोफ डागत सर्व पक्षांचे पर्याय खुले असल्याचे जाहीर केले आहे. त्यांचाही प्रयत्न शिवसेनेच्या उमेदवारीसाठीच आहे. मात्र, खासदार शेट्टी कोणाच्या पारड्यात आपले माप टाकणार, यावरच महायुतीची उमेदवारी ठरणार आहे. त्यामुळे आगामी निवडणूक बहुरंगी होणार, हे निश्चित आहे.