शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

आता बंडखोरी टाळण्यासाठी जोडण्या!

By admin | Updated: February 7, 2017 00:53 IST

जिल्हा परिषद रणांगण : अर्ज भरण्याचा कालावधी संपल्यानंतर नेत्यांनी सोडला सुस्कारा; माघारीसाठी लागली फिल्डिंग

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेली अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. त्यामुळे सायंकाळी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आता काय तरी होऊ दे...म्हणून थोडा सुस्कारा सोडला. आता माघारीसाठी व छुपी बंडखोरी टाळण्यासाठीच्या जोडण्या करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली.जिल्हा परिषदेची निवडणूक २१ फेब्रुवारीस व मतमोजणी दि. २३ ला आहे. आज, मंगळवारी छाननी व अर्ज माघारीची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत आहे; परंतु ज्यांची उमेदवारी निश्चित आहे, अशांनी प्रचार सुरू केला आहे. गावातील ‘कारभारी’ कार्यकर्त्यांना भेटून प्रचाराचे नियोजन करीत आहेत. काहींनी सोमवारी सायंकाळीच प्रचार साहित्याच्या आॅर्डर दिल्या. प्रचारासाठी वाहनांचे बुकिंग करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली. डिजिटल फलक, प्रचारपत्रके, गाण्यांच्या सीडी करण्यासाठी कार्यकर्ते घुमू लागले आहेत. अलीकडील काही वर्षांत राजकीय जागरूकता जास्त झाली आहे. पक्षाच्या विचारधारेचा प्रभाव कमी झाला आहे. नेत्यांच्या ‘शब्दा’ला कार्यकर्ते किंमत द्यायला तयार नाहीत. त्यामुळे उमेदवार यादी निश्चित करताना नेत्यांना चांगलाच घाम फुटला. त्यातही मोठी वशिलेबाजी झाली. काहींनी तर माजी मुख्यमंत्र्यांपासून पाहुणे-रावळे शोधून त्यांचीही ताकद उमेदवारी मिळविण्यासाठी वापरली. पक्षांनीही तो आपल्याशी किती एकनिष्ठ आहेत याचा विचार न करता त्याच्याकडे पैसा किती आहे, यंत्रणा किती राबवू शकतो आणि निवडून येण्याची क्षमता, जाती-पातीचा, घराण्यांचा विचार करून उमेदवारी दिली आहे.उमेदवार निश्चित झाल्याने कुठे ताकद लावायला हवी आणि कुणाची माघार व्हायला हवी, यासाठीच्या जोडण्याही सुरू झाल्या आहेत.सत्ता कुणाची...?जिल्हा परिषद निवडणूक मध्यावर आली असताना आता लोकांना सत्ता कुणाची येणार याचे वेध लागले आहेत. त्यामुळे जाईल तिथे ‘काय हो..काय होईल यावेळी’ अशी विचारणा लोक उत्सुकतेने करीत आहेत; परंतु या टप्प्यावरील राजकीय चित्र कमालीचे गोंधळाचे आहे. कुणा एका पक्षाची सत्ता येणार नाही हे स्पष्टच आहे; परंतु सभागृहातील सर्वांत मोठा पक्ष कोण ठरतो, यासाठीच या वेळेला ताकद पणाला लावणार आहे.