शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

आता बंडखोरी टाळण्यासाठी जोडण्या!

By admin | Updated: February 7, 2017 00:53 IST

जिल्हा परिषद रणांगण : अर्ज भरण्याचा कालावधी संपल्यानंतर नेत्यांनी सोडला सुस्कारा; माघारीसाठी लागली फिल्डिंग

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेली अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. त्यामुळे सायंकाळी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आता काय तरी होऊ दे...म्हणून थोडा सुस्कारा सोडला. आता माघारीसाठी व छुपी बंडखोरी टाळण्यासाठीच्या जोडण्या करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली.जिल्हा परिषदेची निवडणूक २१ फेब्रुवारीस व मतमोजणी दि. २३ ला आहे. आज, मंगळवारी छाननी व अर्ज माघारीची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत आहे; परंतु ज्यांची उमेदवारी निश्चित आहे, अशांनी प्रचार सुरू केला आहे. गावातील ‘कारभारी’ कार्यकर्त्यांना भेटून प्रचाराचे नियोजन करीत आहेत. काहींनी सोमवारी सायंकाळीच प्रचार साहित्याच्या आॅर्डर दिल्या. प्रचारासाठी वाहनांचे बुकिंग करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली. डिजिटल फलक, प्रचारपत्रके, गाण्यांच्या सीडी करण्यासाठी कार्यकर्ते घुमू लागले आहेत. अलीकडील काही वर्षांत राजकीय जागरूकता जास्त झाली आहे. पक्षाच्या विचारधारेचा प्रभाव कमी झाला आहे. नेत्यांच्या ‘शब्दा’ला कार्यकर्ते किंमत द्यायला तयार नाहीत. त्यामुळे उमेदवार यादी निश्चित करताना नेत्यांना चांगलाच घाम फुटला. त्यातही मोठी वशिलेबाजी झाली. काहींनी तर माजी मुख्यमंत्र्यांपासून पाहुणे-रावळे शोधून त्यांचीही ताकद उमेदवारी मिळविण्यासाठी वापरली. पक्षांनीही तो आपल्याशी किती एकनिष्ठ आहेत याचा विचार न करता त्याच्याकडे पैसा किती आहे, यंत्रणा किती राबवू शकतो आणि निवडून येण्याची क्षमता, जाती-पातीचा, घराण्यांचा विचार करून उमेदवारी दिली आहे.उमेदवार निश्चित झाल्याने कुठे ताकद लावायला हवी आणि कुणाची माघार व्हायला हवी, यासाठीच्या जोडण्याही सुरू झाल्या आहेत.सत्ता कुणाची...?जिल्हा परिषद निवडणूक मध्यावर आली असताना आता लोकांना सत्ता कुणाची येणार याचे वेध लागले आहेत. त्यामुळे जाईल तिथे ‘काय हो..काय होईल यावेळी’ अशी विचारणा लोक उत्सुकतेने करीत आहेत; परंतु या टप्प्यावरील राजकीय चित्र कमालीचे गोंधळाचे आहे. कुणा एका पक्षाची सत्ता येणार नाही हे स्पष्टच आहे; परंतु सभागृहातील सर्वांत मोठा पक्ष कोण ठरतो, यासाठीच या वेळेला ताकद पणाला लावणार आहे.