शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

आता साऱ्या देशाचे लक्ष ‘तेजस्विनी’च्या कामगिरीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST

कोल्हापूर : टोकियो ऑलिम्पिक नेमबाजीतील ५० मीटर पिस्टल प्रकारातील कोल्हापूरच्या राही सरनोबत हिचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता सुवर्णकन्या तेजस्विनी ...

कोल्हापूर : टोकियो ऑलिम्पिक नेमबाजीतील ५० मीटर पिस्टल प्रकारातील कोल्हापूरच्या राही सरनोबत हिचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत हिच्या कामगिरीकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. शनिवारी सकाळी तिचा ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारातील पात्रता फेरीतील सामना होणार आहे.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय नेमबाजी संघात कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंत हिची ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात, तर राही सरनोबत हिची ५० मीटर पिस्टल प्रकारात निवड झाली होती. यासोबतच कोल्हापूरचा पॅरा नेमबाज स्वरूप उन्हाळकर याचीही पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. अशा प्रकारे कोल्हापूरच्या तिघांची एकाचवेळी ऑलिम्पिकसाठी निवड होण्याचा योग प्रथमच आला होता. त्यामुळे कोल्हापूरसह देशवासीयांच्या पदकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, ५० मीटर पिस्टल प्रकारात राहीकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. तिने शुक्रवारी सकाळी झालेल्या दुसऱ्या फेरीत ५७३ गुणांसह ३२ वे स्थान मिळविले. त्यामुळे तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. विश्व नेमबाजीमध्ये प्रथम स्थानावर असलेल्या राहीकडून शुक्रवारी गेल्या चार वर्षांतील सर्वांत कमी गुणांची नोंद झाली.

आता तेजस्विनीची शनिवारी सकाळी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारातील पात्रता फेरी आहे. तिला क्युबाच्या ई.वाय क्रूझ, झेकच्या एन. सोरोनोवा, एन. ख्रिस्टन, राॅकची करिमोवा, नार्वेची जे.एच. डस्टेड, इटलीची सिस्कारलो, अशा दिग्गज स्पर्धकांशी सामना करावा लागणार आहे. या प्रकारात भारताकडून दुसरी नेमबाज अंजूम मुडगिल हीही या स्पर्धेत नशीब अजमाविणार आहे.

प्रतिक्रिया

प्री क्वालिफिकेशनमध्ये गुरुवारी दोन शाॅट्स खराब झाले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या राउंडमध्ये गुणांची कमाई करण्याच्या नादात अपेक्षित कामगिरी झाली नाही. आता नव्याने पुढच्या ऑलिम्पिकसाठी तयारी करील.

- राही सरनोबत, भारतीय नेमबाज