शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बाजार समितीच्या सदस्यांना नोटिसा

By admin | Updated: October 17, 2014 23:35 IST

रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रकरण : अशासकीय सदस्य हादरले

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रकरण अशासकीय सदस्यांना भोवण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही या कर्मचाऱ्यांना कमी न केल्याने याचिकाकर्त्यांनी अवमान याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. याबाबतची नोटीस सचिवांसह १९ सदस्यांना देण्यात आल्याने सदस्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.बाजार समितीच्या बरखास्त संचालक मंडळाने ३७ जणांची बेकायदेशीर नोकरभरती केली होती. याविरोधात गेली अडीच वर्षे उच्च न्यायालयापर्यंत तक्रारी दाखल झाल्या होत्या. संजय बाबगोंडा पाटील यांनी याचिका दाखल करीत बेकायदेशीर नोकरभरती रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यात प्रशासक महेश कदम यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना कामावरून कमी का करू नये? अशी नोटीस बजावली होती. याविरोधात कर्मचाऱ्यांनी न्यायालयात जाऊन स्थगिती मिळविली होती; पण गेल्या महिन्यात यावर सुनावणी होऊन प्रशासकांच्या नोटिसीप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार कारवाई करावी म्हणून संजय पाटील यांनी बाजार समिती प्रशासनाला पत्र दिले. वास्तविक, ३ आॅक्टोबरपर्यंत प्रशासनाने यावर कारवाई करणे अपेक्षित होते; पण कारवाई न झाल्याने अशासकीय प्रशासक मंडळाविरोधात अवमान याचिका दाखल करण्याच्या हालचाली पाटील यांनी सुरू केल्या. अवमान याचिका दाखल करण्यापूर्वी संबंधितांना आपले म्हणणे सादर करण्यास संधी द्यावी लागते. यासाठी सचिवांसह सदस्यांना नोटिसा लागू केल्या आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यात १९ पैकी १४ सदस्यांनी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्याची लेखी सूचना सचिवांकडे केली होती, पण राजकीय दबावापोटी सचिवांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने संजय पाटील यांनी नोटिसा लागू केल्या आहेत. सात दिवसांत रोजंदारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही तर अवमान याचिका दाखल केली जाईल, असे नोटिसीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)माने झटका देणार ?पणन संचालक सुभाष माने यांनी पुन्हा पदभार स्वीकारला आहे. मुंबई बाजार समितीचे संचालक बरखास्त करून पणनमंत्र्यांसह सगळ्यांनाच त्यांनी झटका दिला होता. कोल्हापूर बाजार समितीतील अशासकीय मंडळ नियुक्तीविरोधात कृष्णात पोवार यांनी दाखल केलेल्या तक्रारींची सुनावणी माने यांच्यासमोर प्रलंबित आहे. या सुनावणीत माने अशासकीय मंडळाला झटका देतील, अशी चर्चा बाजार समिती वर्तुळात सुरू आहे. अशासकीय मंडळाविरोधात आणखी एक याचिकापणन मंत्रालयाने राज्यातील बाजार समितीवरील प्रशासकांना हटवून राजकीय सोयीसाठी जंबो अशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती; पण यवतमाळ जिल्ह्यातील नेस बाजार समितीमधील अशासकीय मंडळाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अशासकीय मंडळाला हटवून पूर्ववत प्रशासक ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येथेही याचिका दाखल केल्याचे समजते.